Wednesday, 8 April 2026

कोणतेही व्हिजन हे त्याच्या अंमलबजावणीच्या ठोस धोरणाशिवाय केवळ कागदावर राहते.

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीकोणतेही व्हिजन हे त्याच्या अंमलबजावणीच्या ठोस  धोरणाशिवाय केवळ कागदावर राहते. त्यामुळेच राज्य शासनाने व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन करून प्रत्येक विभागासोबत सखोल चर्चा केली असून2030 पर्यंत साध्य करता येतीलअशा उद्दिष्टांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे. राज्याच्या विकासासाठी प्रगत जिल्ह्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे अधिक वेगाने वाढ करणे आणि राज्यातील मागासलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची संधी आहे त्याच्यावर काम झाले पाहिजेअसे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने काम करणे गरजेचे आहे. काही जिल्हे अजूनही राष्ट्रीय सरासरीपेक्षा मागे आहेत. हेच जिल्हे पुढील काळात राज्याच्या वाढीचे प्रमुख केंद्र ठरू शकतात. विभागांनी तयार केलेले ॲक्शन प्लॅन हे केवळ महत्त्वाकांक्षी नसून ते अचूककालबद्धमोजता येण्यायोग्य (specific, measurable, time-bound) असणे आवश्यक आहे. चार वर्षांत 100 टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपल्या कामाच्या स्पष्ट कालमर्यादा आणि निर्देशक निश्चित करावेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi