रीवाइल्डिंग प्रकल्पाची वैशिष्ट्ये
या सामंजस्य करारानुसार पुढील उद्दिष्टे साध्य होणार आहेत :
· राखीव क्षेत्राभोवती ८०० एकरांहून अधिक अधोगती झालेल्या जमिनीचे पुनर्संचय
· पुनर्संचय उपक्रम, सामुदायिक रोपवाटिका आणि पर्यावरणीय देखरेखीद्वारे १५,००० पेक्षा अधिक ग्रामीण रोजगार दिवसांची निर्मिती
· १०० हून अधिक स्थानिक वृक्ष, झुडुपे व गवत प्रजातींची लागवड आणि संवर्धन, ज्यामुळे भक्ष्य प्रजाती व इतर वन्यजीवांना अधिवास उपलब्ध होईल
प्रकल्पाची रचना केवळ पारंपरिक वृक्षलागवडीपुरती मर्यादित नसून परिसंस्थेतील नैसर्गिक प्रक्रिया पुनर्संचयित करणे, अधिवासांची जटिलता वाढविणे आणि विविध भूप्रकारांमध्ये वन्यजीवांना मुक्तपणे वावरण्यास सक्षम करणे, या व्यापक उद्दिष्टांवर आधारित आहे.
No comments:
Post a Comment