Monday, 20 April 2026

देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक

 देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नारीशक्ती वंदन महिला संमेलन

 

मुंबईदि. १५ : देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाहीतोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाहीमहिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आवश्यक असलेले संविधान संशोधन झाले होते पण त्यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ठोस इच्छाशक्ती दाखवलीअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

नारीशक्ती विचार मंच आयोजित नारी शक्ती वंदन महिला संमेलन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेआमदार मनीषा चौधरीआमदार चित्रा वाघआमदार अमित साटमएसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.उज्वला चक्रदेवअभिनेत्री रविना टंडनप्राजक्ता माळीपार्श्वगायिका वैशाली सामंतफॅशन डिझायनर अर्चना स्नेहलका स्वामीग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित रुबल नेगी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीनारीशक्ती वंदन  विधेयकामुळे भविष्यात देशातील महिलांच्या राजकीयसामाजिक आणि आर्थिक गोष्टीत ऐतिहासिक बदल घडणार असून संसद व राज्य विधिमंडळात मोठ्या प्रमाणात महिला लोकप्रतिनिधी निवडून येतील. त्यामुळे महिलांच्या विकासाला आणि नेतृत्वाला नवी गती मिळेल, ‘नारीशक्ती वंदन विधेयकद्वारे  परिवर्तनासाठी सर्वांनी एकजुटीने पाठिंबा द्यावाअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

सध्या लोकसभेत ७३ महिला खासदार असून२०२९ मध्ये जवळपास 273 महिला खासदार असतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जर हे विधेयक तत्काळ आणले नसतेतर ते २०२९ नंतर किंवा अगदी २०३४-२०३९ पर्यंत लांबले असतेअसेही त्यांनी नमूद केले.

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi