Wednesday, 29 April 2026

नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज

 नागरिकांना अधिक सुलभजलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज

-मुख्य सचिव राजेश अग्रवाल

 

मुंबईदि.28 : नागरिकांना अधिक सुलभजलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव होते व या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेकोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंहपुणे विभागाचे आयुक्त सुधाकर तेलंगछत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त किरण जाधव तसेच नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य सचिव अग्रवाल म्हणालेपासपोर्टसारख्या कार्यक्षम प्रणालींचा आदर्श घेत शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटल समन्वय वाढविण्याचे काम सुरू आहे. निकाल जाहीर होताच संबंधित माहिती आपोआप विविध विभागांकडे पोहोचून अल्पावधीत अहवाल तयार होईलअशी प्रणाली विकसित केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi