Monday, 13 April 2026

माजिक न्याय विभाग प्रभावीपणे करत असून, लोकोपयोगी उपक्रमांमुळे सकारात्मक संदेश

 विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले कीसमाजात परिवर्तन घडविण्याचे काम सामाजिक न्याय विभाग प्रभावीपणे करत असूनलोकोपयोगी उपक्रमांमुळे सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे. या सोहळ्यात  १०० हून अधिक व्यक्ती आणि १३ संस्थांचा गौरव होत असूनहे कार्य राष्ट्रनिर्मितीला बळ देणारे आहेअसे त्यांनी नमूद केले. व्यसन ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. व्यसनामुळे आर्थिक नुकसानउत्पादकतेत घटआरोग्य व्यवस्थेवर ताणगुन्हेगारीत वाढकुटुंबव्यवस्थेचे विघटन आणि शिक्षणातील गळती वाढतेअसेही त्यांनी सांगितले.

भारत हा जगातील सर्वात तरुण देश असून २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर युवाशक्तीचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराप्रमाणे  समाजात बदल घडवायचा असेल तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावीअसे आवाहन त्यांनी केले. समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध शांत न राहता सक्रिय भूमिका घेण्याची गरज आहे. समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पुढील काळात अधिक व्यापक उपक्रम राबविले जातीलअसा विश्वास विधानसभा अध्यक्ष अॅड नार्वेकर यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi