Tuesday, 14 April 2026

जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत

 जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत     

 

दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

 

मुंबईदि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचितपीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मानसमान संधीन्यायाचा मार्ग मिळाला आहे.   संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहेअसे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारविधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारकौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढासांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेमहापौर रितू तावडे उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणालेस्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतही डॉ. आंबेडकर अग्रणी होते. महिलांना शिक्षणसंपत्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच भारत प्रजासत्ताक झाल्यापासून महिलांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असूनया निमित्ताने जातीयतेपासून मुक्त आणि भेदभावविरहित समाज घडविण्याचा संकल्प करावाअसे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi