मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एकेकाळी संरक्षण सामग्रीच्या उत्पादन क्षेत्रात कुठलीही स्पष्टता नसताना सोलर समूह या क्षेत्रात कार्य करीत राहिला. आज या समूहाने देशातील आघाडीच्या संरक्षण उत्पादन कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. अत्याधुनिक ड्रोन असो की पिनाका रॉकेटसारखे तंत्रज्ञान असो, देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य या समूहाने केले आहे. बदलत्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, सेमी कंडक्टर परिसंस्था तसेच क्वांटम टेक्नॉलॉजी महत्त्वाची भूमिका बजावित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संरक्षण तंत्रज्ञान, एरोस्पेस आणि डीपटेक क्षेत्रासाठी नवे धोरण तयार केले. सोलरच्या माध्यमातून या धोरणांतर्गत झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.
‘राष्ट्रप्रथम’ या विचारातून सोलर इंडस्ट्रीजची वाटचाल सुरु असताना राज्य शासनाकडून त्यांना संपू्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment