Sunday, 8 February 2026

महाराष्ट्रात सामंजस्य करार केवळ कागदावर होत नसून ते प्रत्यक्षात साकारले जात

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहाराष्ट्र हे सध्या वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यातल्या त्यात विदर्भाचा प्रदेश झपाट्याने विकसित होत आहे. महाराष्ट्रात सामंजस्य करार केवळ कागदावर होत नसून ते प्रत्यक्षात साकारले जात आहेत. लॉजिस्टिक्सएआयसोलर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. सर्वाधिक विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये जीसीसी पॉलिसीजेम्स अँड ज्वेलरी पॉलिसीबांबू पॉलिसी जाहीर केली आहे. नवे औद्योगिक धोरण आले आहे.

यात भर घालून सात नवीन धोरणांची घोषणा येत्या दोन-तीन महिन्यांत होणार आहे. यामध्ये टेक्सटाइल्स अँड अॅपरललेदर अँड फूटवेअरइलेक्ट्रॉनिक्स अँड फॅबएरोस्पेस अँड डीफेन्सएमएसएमईफार्मास्युटिकल बायोटेक अँड मेडिकल डीव्हायसेससर्क्युलर इकॉनॉमीबायो प्लास्टिक या क्षेत्रांतील धोरणांचा समावेश असेल. या सातही धोरणांच्या निर्मितीचे काम सुरू असून येत्या तीन महिन्यांत ते जाहीर करण्यात येतील. यामुळे धोरणप्रेरित गुंतवणूकउद्योगवाढ आणि आर्थिक विकास हेच महाराष्ट्राचं प्रमुख सूत्र ठरेलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi