Friday, 20 February 2026

पर्यावरण तज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज

 पर्यावरण तज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज

                                                - राज्यपाल आचार्य देवव्रत

राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकचा समारोप

 

            मुंबई, दि. 19 : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहेशिवाय गंभीर आजारांचे संकटही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण तज्‍ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. 

            मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडलेल्या मुंबई क्लायमेट वीकच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलारपर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडेमुंबईच्या महापौर रितू तावडेपर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोजराज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरेसहसचिव एस. राममूर्थीप्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशीजलज दानी आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi