परदेशी पर्यटकांच्या मनात रुजली महाराष्ट्राची संस्कृती
या उत्सवाचे साक्षीदार ठरलेल्या एका परदेशी पर्यटकाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “हा सोहळा म्हणजे केवळ उत्सव नाही, तर श्रद्धा, एकता आणि आनंदाचा संगम आहे. लाखो लोक एकाच स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करताना पाहून माझे मन थक्क झाले. अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळले. भारतात येऊन हा अनुभव घेणे म्हणजे माझ्यासाठी स्वप्नवत आहे.” अनेक पर्यटकांनी गणरायाच्या मनमोहक मूर्तींसोबत छायाचित्रे काढली आणि या अविस्मरणीय क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या पर्यटकांना गणेशोत्सवाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महती समजावून सांगितली.
No comments:
Post a Comment