Wednesday, 2 July 2025

खरीप हंगाम विमा योजनेत भाग घेता येणारी पिके pl share

 

खरीप 2025 साठी  सुधारित पीक विमा योजना

- विनयकुमार आवटे

    avinaykumar.30@gmail.com  

-------------------------------------------------------------------------------------------

विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणा-या नुकसानीपासून शेतकऱ्यांस आर्थिक संरक्षण  देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना  राबविण्यात येत आहे. या योजनेची ठळक वैशिष्टे 

·          खरीप हंगाम विमा योजनेत  भाग घेता येणारी पिके  

भात (धान)खरीप ज्वारी बाजरीनाचणी(रागी)मकातूरमुगउडीदसोयाबीनभुईमुगतीळ,  कारळेकापूस व कांदा या अधिसूचित पिकांसाठी ,अधिसूचित क्षेत्रातील  शेतकऱ्यांना भाग घेता येईल.

·         महत्वाच्या बाबी

o   योजनेत सहभागासाठी अंतीम मुदत  दि. ३१ जुलै २०२५

o   या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा agristack नोंदणी क्रमांक आणि ई पीक पाहणी बंधनकारक आहे.

o   अधिसूचित क्षेत्रातअधिसूचित पिके सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात.

o   कर्जदार  आणि  बिगर कर्जदार शेतकऱ्यांना  योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे .

o   ई-पीक पाहणी  आणि विमा घेतलेले पिक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल आणि भरलेला विमा हप्ता जप्त केला जाईल.

o   विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी  विभागास  रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क सीएससी चालक यांना देऊ नये.

o    एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही .

o   मंजूर नुकसान भरपाई अर्जदार यांचे आधार सलग्न बँक खात्यात थेट केंद्र शासन पोर्टल वरून जमा करण्यात येणार आहे .

o   सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के  आहे.

·         उंबरठा उत्पादन :- अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील सात वर्षातील  सर्वाधिक उत्पादनाची पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते.

·         विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत

पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत  विविध नैसर्गिक घटक, कीड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे पिक कापणी प्रयोग द्वारे येणारे  सरासरी उत्पादन हे त्या महसूल मंडळ साठीच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळ मधील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना सम प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे .

·         योजना राबविणारी विमा कंपनी व संबंधित जिल्हे

अ.क्र

विमा कंपनीचे नाव

जिल्हे

भारतीय कृषी विमा कंपनी 

अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा , वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार , परभणी, वर्धा, नागपुर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , हिंगोली,अकोला, धुळे, पुणे, जालना , गोंदिया, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर , भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली 

आयसीआयसीआय लोंबार्ड  जनरल इन्शुरेंस कंपनी 

लातूर , धाराशिव , बीड

 

·         पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि शेतकरी साठीचा विमा हप्ता रक्कम रु./हे .

यात  जिल्हानिहाय  फरक  असतो .

अ.क्र.

पिक

विमा संरक्षित रक्कम रु./हे.

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रु/हे

1

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi