Friday, 18 April 2025

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून पाहणी

 इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून पाहणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिकशैक्षणिक विचार तरुणांपर्यंत

पोहोचविणे महत्त्वाचे

- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबई, दि.१६  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाने तरुणांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

सामाजिक न्यायनगरविकासपरिवहनवैद्यकीय शिक्षणअल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केले.

यावेळी आमदार भाई गिरकरसहसचिव सोमनाथ बागुलसह आयुक्त प्रसाद खैरनारकार्यकारी अभियंता प्रदीप अहिरेनगरसेविका समिता कांबळेमाजी नगरसेवक शरद कांबळेराहुल कांबळेअशोक कांबळे आदीसहमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमुंबई महानगरपालिकासामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की,  स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक आणि सामाजिक इतिहास प्रभावीपणे मांडण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानऑडिओ-विज्युअल माध्यमेइंटरेक्टिव्ह डिस्प्लेलेझर शो इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. जगातील आणि देशातील विविध स्मारकाचा अभ्यास करून आपला इतिहास आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी नियोजन करावे.

तसेचस्मारकाच्या मार्गिकास्वच्छता व सुरक्षा व्यवस्था यावरही लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कामांची गुणवत्ता राखतइलेक्ट्रॉनिक कामे समांतरपणे (फेजनुसार)  सुरू ठेवावी जेणेकरून स्मारक लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेलअसेही त्यांनी सांगितले. स्मारकात उभारण्यात येणाऱ्या व्याख्यानगृहग्रंथालयसभागृहविपश्यना केंद्र अशा विविध सभागृहात स्वच्छता आणि सुरक्षा यास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.  सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये देखभाल दुरुस्तीसाठींच्या उपाययोजनांबाबत निर्णय घ्यावेत अशा सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

यावेळी समितीतील सदस्यकार्यकारी अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेतली व आवश्यक त्या सुधारणा सुचवल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi