Saturday, 12 October 2024

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. ११ पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी तसेचउत्पादनांचे काढणीनंतरचे व्यवस्थापननिर्यातीला चालना देणे या उद्देशाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत ३ ते ५ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास प्रति दिन एक हजार रूपये देण्यात येणार आहेत. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी केले आहे.

            एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०२४-२५ या वर्षासाठी मनुष्यबळ विकास घटकांतर्गत संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याकरिता ५६ लाख निधी मंजूर केला आहे.

या कार्यक्रमांतर्गत शेतकरीक्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिकांचे आयोजन तसेचयशस्वी व प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या जातात.            राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थाएनआयपीएचटीतळेगाव दाभाडे या संस्थेमार्फत ठाणे, पुणे व कोल्हापूर व अमरावती विभाग येथे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

            बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फतराष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), नाशिकच्या आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, नागपूर येथील वरोरादापोली येथील हापूस आंबा गुणवत्ता केंद्र,  पुणे येथील राहूरी डाळिंब गुणवत्ता केंद्र,  छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्रनागपूर येथील संत्रा गुणवत्ता केंद्र येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

            फळे व भाजीपाला रोपवाटीकाकृषी व्यापाराबाबत धोरण व निर्यातीबाबत माहितीजुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन (आंबाचिकूसंत्रा व मोसंबी)ड्रॅगन फ्रुट व जिरेंनियम व नाविण्यपूर्ण पिकांचे उत्पादनाचे तंत्रज्ञानऔषधीसुगंधी व मसाला पिकांचे उत्पादनप्रक्रिया व विपणनहरितगृह, पॉली हाऊस व्यवस्थापन,  हॉर्टीकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्सकाढणीपश्चात व्यवस्थापन (फळे व भाजीपाला)पीकनिहाय लागवड व प्रक्रिया (डाळींबहळद व आले)या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  

            शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमात साहित्यचहा पानभोजन व निवास व्यवस्था आदी सुविधा करण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या संस्थांना किंवा अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा (कंसात संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक)

            पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थाएनआयपीएचटी संस्था ( विश्वास जाणव०२११- ४२२३९८०/९४२३०८५८९४)कृषी विज्ञान केंद्रबारामती जि.पुणे (श्री. यशवंतराव जगदाळे०२११- २२५५२२७/९६२३३८४२८७)राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), चितगाव फाटादारणा. ता. निफाडजि. नाशिक(डॉ. पी. के. गुप्ता – ९४२२४९७७६४)आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय वरोराजि. चंद्रपूर (डॉ. अनिल भोगावे – ९५७९३१३१७९)हापूस आंबा गुणवत्ता केंद्रदापोली (डॉ. महेश कुलकर्णी – ८२७५३९२३१५),  डाळिंब गुणवत्ता केंद्रराहुरी (डॉ. सुभाष गायकवाड ९८२२३१६१०९)केशर आंबा गुणवत्ता केंद्रछत्रपती  संभाजीनगर (डॉ. जी. एम. वाघमारे – ७५८८५३७६९६)संत्रा गुणवत्ता केंद्रनागपूर (डॉ. विनोद राऊत – ९९७००७०९४६) यांना संपर्क साधण्याचे आवाहन फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी केले आहे.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi