Monday, 12 August 2024

मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” चा वापर उपयुक्त ठरणार

 मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी

लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी चा वापर उपयुक्त ठरणार

 

            ठाणेदि. 09 (जिमाका) : रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीचे लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकावू असल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहेअशा सर्व ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी चा वापर करुन बुजविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर ठाणे-नाशिक महामार्गावरील रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीतअसे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना आज येथे दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज ठाणे- नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघातळवली ते शहापूर या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे पाहण्यासाठी तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात होत असलेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते  बोलत होते. 

            यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ रावएमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जीजिल्हाधिकारी अशोक शिनगारेएमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल गायकवाडपोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामीवाहतूक उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोडमहामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकरपोलीस उपायुक्त एस.व्ही.शिंदेरस्ते वाहतूक व महामार्ग मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तवएमएमआरडीए मुख्य अभियंता एस.के.सुरवसेअधीक्षक अभियंता रमेश किस्तेभारतीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक बी.एस.साळुंकेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.ए.तांबेकार्यकारी अभियंता सुनिल पाटीलयांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीठाणे-नाशिक हे अंतर पार करण्यासाठी सध्या नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. या मार्गावरील खडड्यांमुळे तसेच येथील अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सार्वजनिक बांधकाममहाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणएमएमआरडीएपोलीस या संबंधित विभागांची बैठक घेऊन यामध्ये अवजड वाहने पार्किंग लॉट मध्ये पार्क केल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात यावी. जेव्हा ट्राफिक कमी होईल तेव्हा अवजड वाहने सोडण्यात येतीलअशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रकारे जेएनपीए येथून येणाऱ्या वाहनांसंबंधी रायगडठाणे व पालघर या तीनही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारीपोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

            समन्वयाने वाहतुकीचे नियमन होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम साहित्य टिकत नाही. त्यामुळे  हे खड्डे बुजविण्यासाठी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड च्या अभियंत्यांनी शोध लावलेल्या लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये फायबर आहे. यावरुन अवजड वाहने सुध्दा जावू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करुन या महामार्गावरील मोठे मोठे पॅच भरुन काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. ठाणे-नाशिक व नाशिक-ठाणे या संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम या तंत्रज्ञानानेच करण्यात येणार आहे. ही पध्दत टिकावू आहे. त्यामुळे लोकांना प्रवासात खड्ड्यांचा त्रास होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

             या कामामध्ये अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावीअसे संबधितांना निर्देश देवून मुख्यमंत्री पुढे म्हणाले कीसर्वांनी टिम बनून हे काम पूर्ण करायचे आहे. नवीन  तंत्रज्ञानाचा उपयोग करुन लोकांना सुलभ प्रवास करण्यासाठी सहकार्य करायचे आहे. जिंदालवाशिंदआसनगाव रेल्वेपूल या सर्व पुलांवर या पध्दतीचा वापर करणार आहोत. भिवंडी आणि माणकोली मार्गावरील खड्डेही भरण्यात येणार आहेत. भविष्यात खडवली फाटा येथे पूल तयार होणार आहेत्यामुळे येथील वाहतूक कोंडीदेखील कमी होईल. मनुष्यबळ आणि यांत्रिक सामुग्री यांचा जास्तीत जास्त वापर करुन हे रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi