Wednesday, 3 July 2024

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील

 शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा

पुरविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील

दिलखुलास’ कार्यक्रमात संचालक विकास पाटील यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 2 : राज्यात खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा माफक दरात उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेअसे कृषी आयुक्तालयपुणे येथील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमात सांगितले.

            खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे व कृषी निविष्ठांची गरज भासत असते. अशावेळी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागामार्फत खरीप हंगामात होणाऱ्या पीक पेरणीचे नियोजनबियाण्यांबाबत होणारी फसवणूक टाळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या  उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती, संचालक श्री.पाटील यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत बुधवारदि.3गुरुवार दि. 4शुक्रवार दि. 5 आणि शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदिका श्रीयोगी मांगले यांनी ही मुलाखत घेतली आहे.

-----000----

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi