लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान
मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
वर्धा - ५६.६६ टक्के
अकोला - ५२.४९ टक्के
अमरावती - ५४.५० टक्के
बुलढाणा - ५२.२४ टक्के
हिंगोली - ५२.०३ टक्के
नांदेड - ५२.४७ टक्के
परभणी -५३.७९ टक्के
यवतमाळ - वाशिम - ५४.०४ टक्के
No comments:
Post a Comment