Thursday, 15 February 2024

एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीचा सर्वसामान्यांना लाभ

 एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीचा सर्वसामान्यांना लाभ

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. 14 : राज्यात झपाट्याने नागरीकरण होत असताना त्यात विस्कळीतपणा न येता नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक विकासकामे होणे गरजेचे आहे. यादृष्टीने शासनाने तयार केलेल्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीचा सर्वसामान्यांना लाभ होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            नगर रचना दिनाचे औचित्य साधून स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी/ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरआमदार भरत गोगावलेमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणीनगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराजपर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आदी यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणालेनगर रचना विभाग नवीन शहरांना आकार देण्याचे काम करीत आहे. शहरांच्या विकासात विकासकांचे देखील मोठे योगदान आहे. विकासकांनी शहरांमध्ये गृहप्रकल्प उभारताना सर्वसामान्यांना सवलती द्याव्यातत्यांना परवडेल अशा किमतीत घरे उपलब्ध करून द्यावीतयासाठी शासनामार्फत विविध सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकासकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अधिमूल्य तसेच स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत देण्यात येत आहे. याचा लाभ सर्वसामान्यांना कमी किमतीत घरे मिळण्यासाठी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

            शासन सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्यात विविध विकास प्रकल्प राबवित असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेपायाभूत सुविधांचे सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. अटल सेतू सारखे प्रकल्प गेम चेंजर’ ठरणार असून यामुळे वेळइंधन आणि आर्थिक बचत होणार आहे. उद्योगात राज्य अग्रेसर असून दावोस येथे तीन लाख 73 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. परकीय थेट गुंतवणुकीमध्ये देखील महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू झाले असून शहरे सुंदर होण्यासाठी शहरांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे ते म्हणाले.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते नियोजन विचार अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध लोकोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्या सहायक नगर रचनाकार तसेच सहायक संचालक नगर रचना यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार प्रदान

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सांघिक पुरस्कार संवर्गात मंत्रालय (खुद्द) - नवि-०७ (मेट्रो सेल) कार्यासनातील उप सचिव विजय चौधरीअवर सचिव अजयसिंग पाटीलकक्ष अधिकारी शिरीष पाटीलकक्ष अधिकारी श्रीमती शिल्पा कवळेसहायक कक्ष अधिकारी महेश भामरेगणेश घाडगेअभिजीत काळे आणि लिपिक बाळासाहेब पवार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

            मंत्रालय (खुद्द) - नवि-१३ कार्यासनातील संचालक तथा सह सचिव डॉ. प्रतिभा भदाणेसहायक संचालक नगर रचना तथा अवर सचिव प्रणव कर्पेसहायक नगर रचनाकार धनंजय साळुंखेसहायक नगर रचनाकार धीरज मिलखेसहायक नगर रचनाकार श्रीमती तेजस्विनी भांगे आणि लिपिक विठ्ठल जऱ्हाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            सांघिक पुरस्कारामध्ये नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय - उपसंचालकनगर रचनामुख्य कार्यालयपुणे (नागरी संशोधन घटक) कार्यालयातील उप संचालक नगर रचना किशोर गोखलेसहायक संचालक नगर रचना श्रीमती माधवी चौगुलेनगर रचनाकार श्रीमती दीप्ती उंडेसहायक नगर रचनाकार श्रीमती शितल कांबळेसौरभ नावरकररचना सहायक निलेश गाडगेलघुलेखक (उ.श्रे.) रोहित चंद्रसवरिष्ठ लिपिक श्रीमती अनिता नारंगकरआणि लिपिक नितीन कंठाळे यांनाही पुरस्कार देण्यात आला. 

            वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मंत्रालय (खुद्द) नगरविकास - १ प्रकारात कक्ष अधिकारी लक्ष्मीकांत जाधवशिरीष पाटीलसहायक कक्ष अधिकारी सय्यद सोफियान रशीदनिम्नश्रेणी लघुलेखक सुजाता बाचललिपिक शुभांगी गायकवाड आणि अजित गोसावी यांना पुरस्कृत करण्यात आले.

            क्षेत्रीय स्तरावरील तांत्रिक संवर्गात सर्वश्री राजेंद्र पवारसुनील देशमुखकल्याण जाधवसंदीप जोशीअतुल गावंडेदेवराव चावरेविवेककुमार गौतमराजेश महालेश्रीमती प्रियंका खैरनारललित राठोडसागर मोगरेदिनेश पवारश्रीमती ज्ञानज्योती तरारश्रीमती आदिती न्हावकरशिवम घुलेरवींद्र टाकबाबुलाल उकरे यांना पुरस्कार देण्यात आला. तर क्षेत्रीय स्तरावरील अतांत्रिक संवर्गात रोहित चंद्रसरंगनाथ पाटोळेनिरज चावरेमाधव राजुरेअमोल सावरकरश्रीमती सविता सोनवणेचंद्रकांत राजे आणि दीपक वाजरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

            छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना रायगडावरील इमारतीतळीमनोरेरस्तेदेवळे इ. बांधकामे करण्याची जबाबदारी सोपविली होती. त्यात त्यांनी वापी-कूप-तडागप्रासादउद्यानेराजपथस्तंभगजशालानरेंद्रसदनबारामहाल अशा अनेक इमारती रायगडावर उभ्या केल्या. 30 जानेवारी 1913 रोजी सुरु झालेल्या नगर रचना विभागास 110 वर्षे पूर्ण झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतील गडकिल्ल्यांची निर्मिती करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांची प्रेरणा मिळावी यासाठी अधिकारी/ कर्मचारी यांना हे पुरस्कार दिला जातात.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi