सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा
मुंबई, दि. २३ : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा विजयादशमीचा पवित्र सण असून यानिमित्त आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटू, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्य शासनाने विविध क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेणं हेच ध्येय ठेवलं असून आपण आता पुढं निघालो आहोत. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करुयात असेही मुख्यमंत्री म्हणतात.
'नऊ दिवस देवी मातेची पूजा केल्यानंतर आता विजयादशमी आली आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा करतो. सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तकं अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचं पूजन करण्यात येते. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं आपण म्हणतो, कारण खरोखरच हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. आपल्या संस्कृतीत विजयादशमीला खूप महत्त्व आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, दुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे विजयादशमी आहे. वाईट गोष्टींना दूर करून पुढं जाण्याचा हा क्षण आहे. अज्ञानावर ज्ञानानं, शत्रूवर पराक्रमानं, वैऱ्यावर प्रेमानं विजय मिळवायचा, असा हा दिवस आहे. साडेतीन मुहुर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर आपण नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ करु या, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
0000
वृत्त क्र. 3519
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून
विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 23 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमी अर्थात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने समाजातील अनिष्ट प्रथांवर विजय मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, “नवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण आपल्या संस्कृतीचा उद्घोषक आहे. जे-जे उदात्त, चांगले त्याचा दुष्ट आणि अंधकारावर विजय याचीच जाणीव हा सण करून देत असतो. विजयादशमीनिमित्त होणारे रावणाचे दहन हे अहंकाराचे, अन्यायाचे आणि अविचाराचे होवो. राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने अग्रक्रमाने जात राहावे आणि सर्वांचे जीवन मंगलमय व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. गौतम बुद्धांची शिकवणूक अंगीकारणे आणि अहिंसेच्या मार्गावरून जाणे हाच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प करू या”, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
0000
वृत्त क्र. 3518
राज्यपाल रमेश बैस यांच्या विजयादशमी निमित्त शुभेच्छा
मुंबई, दि. २३ : राज्यपाल रमेश बैस यांनी विजयादशमी (दसरा) निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयादशमीचा सण अशाश्वतावर शाश्वताच्या व दुष्प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्
0000
Governor greets people on Vijaya Dashmi
Mumbai, Date 23 : The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people of Maharashtra on the auspicious occasion of Vijaya Dashmi (Dassera). In his message, the Governor has said:
“The festival of Vijaya Dashmi or Dussera symbolizes the victory of the eternal over the ephemeral and of good over the forces of evil. The festival reassures that Truth will always prevail. May the festival bring happiness, peace and prosperity to all. I extend my heartiest greetings on the joyous occasion of Vijaya Dashmi."
0000
वृत्त क्र. 3517
राज्यपालांची राजभवन नवरात्री मंडळाला भेट
मुंबई, दि. 23 : राज्यपाल रमेश बैस यांनी दुर्गाष्टमीनिमित्त राजभवन कर्मचारी निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांशी संवाद साधला.
Governor visits Navratri Mandal in the
Raj Bhavan staff quarters premises
Mumbai, Date 23 : Governor Ramesh Bais visited the Raj Bhavan Navratri Mandal in the Raj Bhavan staff quarters premises on the occasion of Durgashtami. The Governor performed the aarti and interacted with those present.
No comments:
Post a Comment