Wednesday, 4 October 2023

अयोध्येत राम मंदिर बांधायचे असे ठरले,

 अलिबाग तालुक्यातील नागाव गावातील श्री मिलिंद रामचंद्र वाड व सौ मुग्धा मिलिंद वाड यांना अयोध्येत राम पुजेचा मान मिळाला. अयोध्येत राम मंदिर बांधायचे असे ठरले, तेव्हा नरेंद्र मोदींनी सांगितले नुसते मंदिर बांधायचे नाही तर त्या आधी प्रत्येक प्रतिपदेला पाच जोडप्याला आमंत्रित करुन त्यांच्या हस्ते पुजा करायच्या म्हणजे काही तरी चांगले कार्य करायचे असं काहीसं ठरवले.

  आणि त्या नंतर कसं करायचे वगैरे ठरले,नंतर एक फाॅर्म काढले ते भरुन द्यायचे,कोणाची इच्छा असेल पुजा करायची त्यांनी तो फाॅर्म भरायचा ज्यांचा नंबर लागेल त्यांना ते फोन करायचे आणि सांगायचे तुमचा अमुक तारखेला नंबर लागलाय तर तुम्ही येणार आहात का जोडीने पुजा करायला तर आपण हो सांगितले तर ती तारीख निश्चित आणि नसेल जमत आपल्याला तर आपण सांगायचे आम्हाला तारीख बदलुन मिळेल का,आमची यायची इच्छा खुप आहे पण त्या तारखेला जमत नाही तर तारीख बदलुन द्या,तर ती लोक सांगायची पुढच्या तारखेची माणस तयार असतील तर आम्हाला काहीच हरकत नाही,मग , श्री.मिलिंद वाड,सौ.उषा वाड चा हाच problem झाला होता त्यांना १७ तारीख आली होती पण गणपती असल्यामुळे त्यांना शक्य नव्हते तर त्यांनी तारीख बदलुन दिली आणि त्यांना ३० तारीख मिळाली त्यांचा योग चांगला होता आणि जबरदस्त इच्छाशक्ती होती त्यामुळे त्यांचा नंबर लागला आणि त्यांना पुजेचा मान मिळाला, त्यांनी दिवसभराचा कार्यक्रम आखून दिला होता त्याप्रमाणे पुजा,शरयु नदिची आरती, जेवण वगैरे असा सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला, त्यांनी त्यांची तिथे रहाण्याची वगैरे व्यवस्थित सोय केली होती.

खर सांगायच झाल तर श्री मिलिंद वाड व सौ उषा वाड यांना हा मान आज मिळाला फार मोठे भाग्य आहे त्यांचे.त्यांच्या बरोबर सौ.उषा वाड यांच्या मातोश्री श्रीमती लिमये या सुद्धा त्या वेळी त्यांच्या बरोबर उपस्थित होत्या.

जय श्रीराम 🚩🚩🚩🙏🏿🙏🏿🙏🏿💐💐💐

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi