अन्नपुर्णेचे किंवा सुगरणीचे घरातले अन्नपदार्थ चांगले ठरविण्याचे काही निकष
★आमटी कशी एकसंध असावी....डाळ व पाणी फारकत झाल्यासारखे वेगळे -वेगळे नको.
★भात कसा मोगर्याच्या कळ्यांसारखा दिसावा. पांढराशुभ्र, मोकळा पण मऊ शीत असावे.
★भाजी नुसती तिखट व तेलकट म्हणजे चवदार नाही. योग्य तितका मसाला पण असावा.
★पुरणपोळी मधे अंगठ्याने दाबून मधे खळगा करता आला पाहिजे व त्यात तूप घेता आले पाहीजे .इतके पुरण असावे.
★भाकरीला पोट व पोळीला काठ असता कामा नये.
★हिरवी चटणी म्हणजे नुसता नारळाचा चोथा नको. पुरेसा तिखटपणा असावा.
★तूप कणिदार व रवाळच असलं पाहीजे नाहीतर डालडा किवा तेल वाढल्यासारखे वाटते.
★चहा दाट असला तरी चहा म्हणजे साखरेचा पाक नको (खडा चम्मच). त्याला चहाचा सुगंध आला पाहिजे,रंघी लाल किंवा काळपट नसावा. चहा योग्य तितका मुरलेला असेल तरच तरतरी येते.
★ताक कसं थोडे आंबट व मधुर असावे. नाहीतर नुसते नासवलेले दूध वाटते.
★जेवायला काहीही करा,पण जेवण चवदार व वेळेत बनवा. भूक परतली तर जेवणाची मजा जाते.
★जेवणाचे ताट इतके सुबक व स्वच्छ रीतीने वाढावे की,भूक नसणार्यालाही जेवावेसे वाटले पाहीजे. नाहीतर जेवणाचे अयोग्य पद्धतीने वाढलेले ताट म्हशीला अंबोण ठेवल्यासारखे दिसते.
★सगळ्यात शेवटी महत्वाचे म्हणजे, जेवणार्याने इतके आकर्षक पध्दतिने जेवावे की, तुम्हाला जेवताना कोणी पाहीले तर,त्यानाही भूक लागली पाहीजे. नाहीतर एकेकजण इतके किळस वाणे जेवतात की,शेजारी जेवणार्याची भूकच मरते.
★पदार्थ खाण्यापूर्वी मला आवडत नाही असं म्हणू नये आधी खाऊन पहावा आवडला नाही तर परत घेऊ नये पानात काही टाकू नये आज कोणती भाजी आहे विचारून नाक मुरडणे चांगले नाही.
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे।.
ज्ञानवैराग्य सिद्यर्थम्
भिक्षांदेहिच पार्वती ।।
No comments:
Post a Comment