Wednesday, 20 September 2023

आयुष्मान भव:’ मोहिमेतून होणार आरोग्य सेवांचा जागर

 आयुष्मान भव:’ मोहिमेतून होणार आरोग्य सेवांचा जागर

              केंद्र शासन देशभर 17 सप्टेंबरपासून आयुष्मान भवमोह राबव आहेया मोहिमेच्या माध्यमातून विविधस्तरावर आरोग्य विषयक सेवा देण्यात येत आहेमोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहेदेशभर मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी करण्यात आलाराज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमाचे मुंबईतही 13 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले.  ही मोह 31 डिसेंबर 2023 पर्यंत राबविण्यात येत आहेआयुष्मान भवशब्दाप्रमाणे सर्वांना सुदृढ आरोग्य मिळावेया हेतूने शासन काम असून मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य सेवांचा जागर करण्यात येत आहे.

               आयुष्मान भवहा शिर्वादरूपी शब्द आपल्या आयुष्यात  महत्वाचा आहेया शब्दाच्या अर्थावरच ही मोह आधारि आहेमोहिमेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबरपासून झाला आहेराज्यातही राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आरोग्य मंत्री प्राडॉतानाजी सावंत यांच्या उपस्थितीत मोहिमेचा कार्यारंभ करण्यात आलामोहिमेदरम्यान क्षयरोग मुक्त भारत अभियान जोरकसपणे राबविण्यात येत आहेजास्तीत जास्त निक्षय मित्र बनवून क्षयरोग मुक्त भारत अभियानाला बळ देण्यात येत आहेदेशभरात मोहिमेदरम्यान घेतलेल्या उपक्रमांचीकार्यक्रमांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संकेतस्थळही विकसित केले आहेमोहिमेची संपूर्ण माहिती डॅश बोर्ड स्वरूपात https:// ayushmanbhav. mohfw. gov. in/public/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेया संकेतस्थळावर देशातील कुठल्याही जिल्ह्यातील माहिती उपलब्ध आहे.   

              मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभाआयुष्मान मेळावा,  अंगणवाडी  प्राथमि शाळांमधील मुलांची तपासणी आदी उपक्रम राबविण्यात येत आहेया मोहिमेदरम्यान सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहेया पंधरवड्याच्या समरोपप्रसंगी 2 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आयुष्मान आपल्या दारी 3.0 :

              ‘आयुष्मान आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आजपर्यं संपूर्ण देशात 25 कोटी आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात आले आहेया अनुषंगाने या उपक्रमामधून सर्व जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वाटप  करण्यात येणार आहेया उपक्रमाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काळजी घेण्यात येत आहेवैयक्तिकस्तरावर आयुष्मान कार्ड संपृक्तता प्राप्त करणे, आयुष्मान कार्डची छपाई आणि वितरण अशाप्रकारे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयुष्मान कार्ड वितरण मोहीम सुरू झालेली आहे.

आयुष्मान सभा :

               हा उपक्रम गावपातळीवर आरोग्य सेवा सुविधांची जनजागृती करण्याकरीता ग्रामपंचायत व व्हीएचएसएनसी (व्हिलेज हेल्थसॅनिटेशन अॅण्ड न्युट्रीशन कमिटी) यांच्यामार्फत राबविण्यात येतोया मोहिमेचे मूळ उद्दिष्ट आयुष्मान कार्ड व आभा कार्डबाबत जनजागृती करणेआरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य आजारसिकलसेललसीकरण व क्षयरोग आदीबाबत जनजागृती करणेतसेच आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर  मिळणाऱ्या सेवा सुविधांचे मूल्यमापन करणे हा आहेया सभेद्वारे आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करणेप्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची व प्रत्यक्षात लाभ घेतेलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणेसंलग्न रुग्णालयांची यादी प्रसिद्धी देणे, असंसर्गजन्य रोगसिकलसेलआयुष्मान कार्ड व आभा कार्ड यांची जनजागृती करण्यात येत आहेआयुष्मान भव: मोहिमेमध्ये 'निरोगी गावेआणि 'निरोगी ग्रामपंचायतीनिर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहेज्या पंचायती आरोग्य योजना यशस्वीपणे पूर्ण करतात, त्यांना 'आयुष्मान ग्रामपंचायतकिंवा 'आयुष्मान अर्बन वॉर्ड' म्हणून सन्मान देण्यात येणार आहेजे त्यांच्या न्याय आरोग्य सेवेच्या तरतुदीच्या समर्पणाचे प्रतीक आहे.

आयुष्मान मेळावा :

           आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवार किंवा रविवारला संकल्पनेनुसार उपक्रम राबविण्यात येत आहेपहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजारांविषयी तपासणीदुसऱ्या आठवड्यात क्षयरोगकुष्ठरोग आणि अन्य संसर्गजन्य आजारांची तपासणीतिसऱ्या आठवड्यात माता व बाल आरोग्यपोषण आहार व लसीकरणचौथ्या आठवड्यात डोळ्यांची तपासणी व डोळ्यांचे आरोग्य ही संकल्पना असणार आहेया मेळाव्यादरम्यान आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करण्यात येणार आहेसर्व समावेशक आरोग्य सेवाआयुषमानसिक आरोग्यवाढत्या वयातील आजार व उपचारमौखिक आरोग्यनेत्रकाननाक व घसा यांचे आरोग्यसमुपदेशन सेवायोगा व वेलनेस उपक्रममोफत औषधीप्रयोगशाळा तपासणी तसेच टेलीकन्सल्टेशन सेवा देण्यात येत आहेत.

     सामुदायिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्फत आठवड्याला किमान एक आरोग्य मेळाव्याचे आयोजनही करण्यात येणार आहेया मेळाव्यात तज्ज्ञ सेवांपासून वंचित रुग्णांना सेवा पुरविण्यात येणार आहेतसेच ज्या तालुक्यांमध्ये तज्ज्ञ सेवांचा अभाव आहेअशा तालुक्यांमध्ये रुग्णांना तज्ज्ञ सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.

अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी

            या उपक्रमांतर्गत सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहेमुलांची 32 सामान्य आजारांची वेळेवर तपासणी व उपचार करण्यात येणार आहेआवश्यकतेनुसार मुलांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेतसेच मोहिमेत रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहेअशाप्रकारे राज्यात 17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आयुष्मान भव : मोहिमेतून 31 डिसेंबरपर्यंत आरोग्यविषयक सेवांचा जागर सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi