Thursday, 20 July 2023

सुयोग्य आहारात धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तूप या सर्व गोष्टी दर २४ तासाला घ्यायला हव्या.*

 *सुयोग्य आहारात धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तूप या सर्व गोष्टी दर २४ तासाला घ्यायला हव्या.*


 दिवसभरातून त्या विभागून घ्याव्यात. दुपारी व रात्री चौरस आहार तर सकाळी, संध्याकाळी हलका नाश्ता, दूध असणे महत्त्वाचे. हे सर्व घेऊनही अन्नघटकांची कमतरता होतेच.संतुलित आहार हे सर्व पुरवतो: तुम्हाला दिवसभर सक्रिय राहण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे. तुम्हाला वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले पोषक, तुम्हाला मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत करतातसंतुलित आहार म्हणजे सकस आहार, शरिराला पोषक आहार. यामध्ये प्रोटिन्स, व्हिटामिन्स तसेच शरिराला गरजेचे 

शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे.कारखान्यात यंत्रांनी तयार केलेला नसावा.


जो आहार आपल्याला शारीरिक मानसिक, बौद्धिक व रोगप्रतिकारक शक्ती; चपलता, स्मरणशक्ती, सौंदर्य, व्यक्तिमत्त्व, दीर्घायुष्य देतो, तोच सकस आणि योग्य आहार होय. आजचा आपला आहार या गोष्टी द्यायला असमर्थ आहे. कारण रोग्यांची आणि रोगांचीही संख्या वाढताना दिसत आहे.

प्रमोद पाठक.



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi