Monday, 6 September 2021

 गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीयधार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे

मुख्यमंत्र्यांचे राज्यातील पक्ष - संघटनांना कळकळीचे आवाहन

·        जनतेचे आरोग्य महत्वाचेउत्सव नंतरही साजरे करू

·        कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती बिघडवू शकते

 

            मुंबई, दि. :  कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेतामी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो कीत्यांनी गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रमसभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकतामात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाहीजनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्याअसे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे.

            राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतचपण सत्ताधारीविरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे कीआता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सणउत्सव आले आहेतत्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेलपण शेवटी आपले आरोग्यप्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू.

तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणतात की, 'हे उघडा ते उघडाया मागण्या ठीक आहेतपण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहेआपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सणउत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतीलपण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तरशासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहागर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभासंमेलनांना उत्तेजन देऊ नकाहीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.

            मला वारंवार आपणांस  हे आवाहन एवढ्याचसाठी करावे लागते आहेकारण कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहेअसेही मुख्यमंत्री म्हणतात.

            दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते.

            महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. नव्हे नव्हेकोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केलीय. अमेरिकेत तिसऱ्या लाटेने जीवन अस्ताव्यस्त केले. चीनही विळख्यात सापडलाय. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज ३०,००० नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाहीतर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.  सरकार सुविधा निर्माण करीलपण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा असेही मुख्यमंत्री आवाहनात म्हणतात.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi