Tuesday, 3 August 2021

 कोरोना तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून जबाबदार वर्तन अपेक्षित

- राज्यपाल कोश्यारी

प्रत्यक्ष क्षेत्र स्तरावर कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार

            मुंबई, दि. 2 : सर्वांच्या सहकार्यामुळे गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवर नियंत्रण प्राप्त करणे शक्य झाले आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून अधिक जबाबदार वर्तन अपेक्षित असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            युवकांमध्ये कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या साई लीला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कोरोना काळात प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करणाऱ्या ३० कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.

            कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री व गोरेगाव येथील आमदार विद्या ठाकूरलोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढासाई लीला फाउंडेशनच्या अध्यक्षा रश्मी उपाध्यायविश्वस्त महेश शेट्टी आदि उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, देश संकटात असताना देशातील सामन्यातील सामान्य व्यक्तीने परोपकाराची भावना दाखविली. डॉक्टर्सनर्सेसपोलीसस्वच्छता कर्मचारीवार्ड बॉय यांसारख्या कोरोना योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन काम केले. हे कार्य देशाला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर अग्रेसर करेल. कोरोनाचे आव्हान थोपविण्यासाठी निर्भय होऊन काम केले पाहिजे मात्र निष्काळजीपणा नको असे सांगताना सुरक्षित अंतरमास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर याबाबत जनजागृती व्हावीअशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

            जयपॅन इंडस्ट्रिचे जय नारायण अग्रवालइंडियन फिल्म्स एंड टीव्ही डिरेक्टर्स असोसिएशनचे  सचिव कुकू कोहलीईंडीयन मोशन पिक्चर्स असोसिएशनच्या सुषमा शिरोमणीसेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.शेफाली केशरवानीकेईएम हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ धीरज कुमारडॉ.सिद्धनाथ दुबेडॉ प्रज्ञा कुलकर्णीराज श्रीवास्तवमिहीर भोईरप्राध्यापक प्रशांत नवाथेआशा सेविका उज्वला नेमन आणि  उषा खराडेआरोग्य सेविका प्रियंका वाधवासीमा ओटेकरनीता काळडोकेवर्षा गरवारेउर्वशी बिहारे व उन्नती तोडणकरमुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रवी सोलंकीवॉर्डबॉय शंकर मुंसेसनदी लेखापाल अवधेश पटेलइम्रान गफ्फार पिराणीताराबाई राजवंशीप्रसाद कदमसंतोष वासुदेव नारकरमहेश पवारकमलेश सदानंद मौर्यलक्ष्मण नाडरअरविंद दुबे यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

**

Felicitation organized by Sai Leela Foundation

Governor felicitates ground level Corona Warriors

 

       The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari felicitated 30 Corona Warriors including ASHA workers, health workers, ward boys, doctors, social workers and other ground level staff at a felicitation held at Raj Bhavan, Mumbai on Monday (2 Aug).

       The felicitation of Corona Warriors was organized by the Sai Leela Foundation, an organization working in the areas of skill development and women empowerment.

       Former Minister Vidya Thakur, Chairperson of Lodha Foundation Manju Lodha, President of the Sail Leela Foundation Rashmi Upadhyay, Trustee Mahesh Shetty and others were present.

       Jaipan Industries  CMD Jai Narayan Agrawal, Indian Films and TV Directors’ Association Kuku Kohli, Indian Motion PIctures Association head Sushama Shiromani,  Dr. Shefali Kesharwani, Dr. Dhiraj Kumar,   Dr. Sidhnath Dubey,  Dr. Pradnya Kulkarni, Raj Shrivastav, Mihir Kisan Bhoir,  Prof Prashant Navathe,  Asha workers  Ujwala Neman and Usha Kharade, Aarogya Sevika Priyanka Wadhwa, Seema Otekar, Neeta Kaldoke,  Varsha Garware,  Urvashi Bihare,   Unnati Todankar,  Ravi Solanki, Shankar Munse,  CA Avdesh Patel, Imran Gaffar Pirani,  Tarabai Rajvanshi, Prasad Kadam, Santosh Vasudev Narkar, Mahesh Pawar, Kamlesh Sadanand Mourya, Laxman Nadar, Arvind Dubey  were felicitated by the Governor.

**

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi