केंद्र सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज शुक्रवारी (दि.31) मंत्र्यांची खातेनिहाय यादी अखेर प्रसिद्ध
खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे :
▪ पंतप्रधान नरेंद्र मोदी : कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण खाते, निवृत्तीवेतन (पेन्शन), अणुउर्जा विभाग, अंतराळ विभाग. तसेच खातेवाटपानंतर जी खाती रिक्त राहतील त्याचा कार्यभारही असेल.
▪ अमित शहा : केंद्रीय गृहखाते
▪ निर्मला सितारामन : केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार
▪ राजनाथ सिंह : संरक्षण मंत्रालय
▪ एस. जयशंकर : परराष्ट्र मंत्रालय
▪ नितीन गडकरी : परिवहन
▪ पीयुष गोयल : रेल्वे मंत्री
▪ धर्मेंद्र प्रधान : पेट्रोलियम
▪ रविशंकर प्रसाद : कायदा व न्याय, इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय
▪ स्मृती इराणी : केंद्रीय मनुष्यबळ खाते
▪ राम विलास पासवान : ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
▪ नरेंद्र सिंह तोमर : कृषी व शेतकरी
▪ प्रकाश जावडेकर : पर्यावरण आणि माहिती प्रसारण
▪ हरसिमरत कौर बादल : अन्न प्रक्रिया उद्योग
▪ रमेश पोखरियाल निशंक : केंद्रीय मनुष्यबळ खाते
▪ थावर चंद गहलोत : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
▪ अर्जुन मुंडा : आदिवासी व्यवहार
▪ डॉ. हर्षवर्धन : आरोग्यमंत्री
▪ किरेन रिजीजू : क्रीडा
▪ मुख्तार अब्बास नक्वी :अल्पसंख्यांक मंत्री
▪ प्रल्हाद जोशी : संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री
▪ डॉ. महेंद्रनाथ पांडे : उद्योजग कौशल्य विकास मंत्रालय
▪ अरविंद सावंत : अवजड उद्योग मंत्रालय
▪ गिरिराज सिंह : पशुसवंर्धन आणि मत्स पालन
▪ गजेंद्रसिंह शेखावत : जल मंत्रालय
खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे :
▪ पंतप्रधान नरेंद्र मोदी : कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण खाते, निवृत्तीवेतन (पेन्शन), अणुउर्जा विभाग, अंतराळ विभाग. तसेच खातेवाटपानंतर जी खाती रिक्त राहतील त्याचा कार्यभारही असेल.
▪ अमित शहा : केंद्रीय गृहखाते
▪ निर्मला सितारामन : केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार
▪ राजनाथ सिंह : संरक्षण मंत्रालय
▪ एस. जयशंकर : परराष्ट्र मंत्रालय
▪ नितीन गडकरी : परिवहन
▪ पीयुष गोयल : रेल्वे मंत्री
▪ धर्मेंद्र प्रधान : पेट्रोलियम
▪ रविशंकर प्रसाद : कायदा व न्याय, इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय
▪ स्मृती इराणी : केंद्रीय मनुष्यबळ खाते
▪ राम विलास पासवान : ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
▪ नरेंद्र सिंह तोमर : कृषी व शेतकरी
▪ प्रकाश जावडेकर : पर्यावरण आणि माहिती प्रसारण
▪ हरसिमरत कौर बादल : अन्न प्रक्रिया उद्योग
▪ रमेश पोखरियाल निशंक : केंद्रीय मनुष्यबळ खाते
▪ थावर चंद गहलोत : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
▪ अर्जुन मुंडा : आदिवासी व्यवहार
▪ डॉ. हर्षवर्धन : आरोग्यमंत्री
▪ किरेन रिजीजू : क्रीडा
▪ मुख्तार अब्बास नक्वी :अल्पसंख्यांक मंत्री
▪ प्रल्हाद जोशी : संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री
▪ डॉ. महेंद्रनाथ पांडे : उद्योजग कौशल्य विकास मंत्रालय
▪ अरविंद सावंत : अवजड उद्योग मंत्रालय
▪ गिरिराज सिंह : पशुसवंर्धन आणि मत्स पालन
▪ गजेंद्रसिंह शेखावत : जल मंत्रालय
खंडणीखोरांना समर्पणनिधी कसा समजणार: देवेंद्र फडणवीस
ReplyDelete- देश-विदेशात फिरताना मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दिसलाच नाही!
- सीमेवरील सैनिकांचा केला अपमान
मुंबई, 3 मार्च
राममंदिर समर्पण निधीवर शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जाते. पण, खंडणीखोरांना समर्पणनिधीतील भाव समजणार तरी कसा, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला.
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर सभागृहात दिले, त्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा झाली, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री आपल्या तासभराच्या भाषणात सर्वत्र प्रवास करीत असताना महाराष्ट्रात मात्र ते येऊ शकले नाही. चीन, पाकिस्तान, अमेरिका, उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार, काश्मीर आणि अगदी दक्षिणेपर्यंत ते गेले. पण, महाराष्ट्राबाबत मात्र ते बोलू शकले नाही. मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले. पूर्वी ते नवीन होते. पण, चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण या दोन्हींतील अंतर त्यांना अजूनही समजलेले नाही. शेतकर्यांसंदर्भात एकही मुद्दा मांडू शकले नाही. बोंडअळी, विमा, वीजतोडणी कशावरही बोलले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो शेतकर्यांची वीज तोडणार्या मुख्यमंत्र्यांना सिंधू सीमेवरील शेतकर्यांची चिंता आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे. ‘चीन समोर आले की पळे’ असे म्हणून त्यांनी भारतीय सैनिकांचा मोठा अपमान केला आहे. उणे 30 डिग्री तापमानात शत्रूचा मुकाबला करून चीन सैनिकांना मागे धाडणारे आपले शूर सैनिक आहेत. त्यांचा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळाले नाही, असे सांगताना सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणार्यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसलो आहोत, याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो. वीर सावरकर यांच्याबाबत ही टिपण्णी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यानंतर केली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सत्तेसाठी बसणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. यातूनच त्यांचे सावरकरप्रेम दिसून येते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात ते जे बोलले ते उसने अवसान आणून खोटे बोलले. सत्य त्यांना ठावूक आहे. या संपूर्ण भाषणात महाराष्ट्राच्या एकाही प्रश्नाला त्यांनी हात लावला नाही. शारजिलबाबत बोलण्याची त्यांची हिंमत नाही. तो पुण्यात येतो, हिंदूंना सडका म्हणून जाण्याची त्याची हिंमत होते. पण, त्याला पकडण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. शिवसेना स्वातंत्र्यसंग्रामात नव्हती, हे त्यांनी सांगितले हे बरेच केले. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. हेडगेवार हे स्वत: एक स्वातंत्र्यसैनिक होते, हे कदाचित त्यांना ठावूक नसावे. भाजपाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी बलिदान दिले, असे सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारने दिलेले राज्यपालांचे भाषण जसे दिशा देणारे नव्हते, तसेच आजच्या मुख्यमंत्र्यांचे भाषण सुद्धा दिशाहिन होते. त्यांनी महाराष्ट्राची संपूर्णपणे निराशा केली. आम्ही गैरप्रकार दाखविला, भ्रष्टाचार काढला तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणतात. आमच्यामुळे भ्रष्टाचार बाहेर आला तरच महाराष्ट्र वाचेल. आपल्या भाषणाची चीरफाड होऊ नये, म्हणून त्यांनी आम्हाला सभागृहात बोलू दिले नाही.
*********
अनिल देशमुख किमान आता तरी राजीनामा द्या"- आ. अतुल भातखळकर
ReplyDelete'सीबीआय चौकशीतून खंडणी रॅकेटचे गॉडफादर समोर येतील'
मुंबई, दि. 5 एप्रिल (प्रतिनिधी)
सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून, याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते. आता स्वतः उच्च न्यायालयानेच राज्याच्या गृहमंत्र्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे किमान आता तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, सीबीआय चौकशीतून या खंडणी रॅकेट मधील खरे गॉडफादर समोर येतील अशी अपेक्षा भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली आहे.
राज्याचे गृहमंत्रीच महिन्याला 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे आदेश देतात, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये करोडो रुपये घेतात, असे आरोप राज्याच्या इतिहासात कधीच झाले नव्हते. या प्रकरणी मी स्वतः समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार करून, न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. इतके गंभीर स्वरूपाचे आरोप होऊन सुद्धा गृहमंत्री अनिल देशमुख आपली खुर्ची सोडण्यास तयार नाहीत. इतकेच नव्हे तर या संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्यातील पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देतात तरी सुद्धा मुख्यमंत्री सत्ता वाचविण्याच्या नादात गृहमंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत, यातून महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेची तमा न बाळगता त्यांच्यात शिल्लक असलेला ठाकरीबाणा दाखवत गृहमंत्र्यांची मंत्रिमंडळातुन तात्काळ हकालपट्टी करावी, अशी आग्रही मागणी सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.
प्रसिद्धी