Wednesday, 22 July 2026

भूसंपादन, कंटूर सर्व्हे आणि उद्योग गुंतवणुकीची कामे तातडीने पूर्ण करा

 भूसंपादन, कंटूर सर्व्हे आणि उद्योग गुंतवणुकीची कामे तातडीने पूर्ण करा

- उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

·         मंडणगड एमआयडीसीच्या विकासाला गती

 

मुंबई, दि. २१ : मंडणगड येथील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने करण्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया, कंटूर सर्व्हे, पायाभूत सुविधांचे नियोजन आणि उद्योग गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीची सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांना दिले.

 

उद्योगमंत्री डॉ.सामंत यांच्या मंत्रालयीन दालनात झालेल्या बैठकीस महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह आणि दूरदृश्यप्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंडणगड औद्योगिक क्षेत्रासंदर्भात भूसंपादन, पूर्वी अधिसूचित झालेल्या जमिनींची सद्यस्थिती, शेतकऱ्यांच्या मागण्या, कंटूर सर्व्हेचा प्रलंबित अहवाल तसेच नवीन औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

औद्योगिक क्षेत्रामध्ये एमएसएमई उद्योगांसाठी प्लॉटिंग करण्यास प्राधान्य

 


मंत्री डॉ. सामंत यांनी प्रारंभी या औद्योगिक क्षेत्रामध्ये एमएसएमई उद्योगांसाठी प्लॉटिंग करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले. त्यामुळे अल्पावधीत अधिक उद्योग उभे राहतील, स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि उद्योग विकासाला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. आवश्यक प्रतिसाद न मिळाल्यास पुढील टप्प्यात मोठ्या उद्योगांसाठीही जागा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले की, नाधवडे औद्योगिक क्षेत्र राष्ट्रीय महामार्गालगत असून प्रस्तावित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग तसेच विद्यमान रेल्वे स्थानकाच्या निकट असल्याने या परिसराला उत्कृष्ट रस्ते व रेल्वे संपर्काचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात हे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचा विश्वास उद्योग मंत्री डॉ.सामंत आणि पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्गच्या नाधवडे एमआयडीसीची पायाभूत विकासकामे तातडीने सुरू करावीत;

 सिंधुदुर्गच्या नाधवडे एमआयडीसीची पायाभूत विकासकामे तातडीने सुरू करावीत;

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

·         एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्यावे

 

मुंबई, दि. २१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून तेथे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्राधान्याने संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री डॉ.सामंत यांच्या मंत्रालयीन दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह तसेच दूरदृश प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

 

मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, सिंधुदुर्गच्या नाधवडे येथील सुमारे ११.१४ हेक्टर एमआयडीसीची जमीन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन महामंडळाच्या ताब्यात असून संबंधित शेतकऱ्यांना मोबदल्याचे वितरण पूर्ण झाले असून सातबारा नोंदीही एमआयडीसीच्या नावावर झाली आहे. २०२२-२३ मध्ये तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचे अंदाजपत्रक आता कालबाह्य झाल्यामुळे त्याचा तातडीने फेरआढावा घेऊन सुधारित अंदाजपत्रक तयार करावे आणि मंजुरीसाठी त्वरित सादर करावे. सुमारे १५ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांना विलंब न लावता प्रारंभ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरक्षित · सर्व टाक्यांची स्वच्छता, जलशुद्धीकरण यंत्रणांची सर्व्हिसिंग पूर्ण · पाण्याचे नमुने पिण्यास योग्य असल्याचा महापालिकेच्या प्रयोगशाळेचा अहवाल · तज्ज्ञ समितीमार्फत स्वतंत्र तपासणी सुरू

 मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरक्षित

·         सर्व टाक्यांची स्वच्छता, जलशुद्धीकरण यंत्रणांची सर्व्हिसिंग पूर्ण

·         पाण्याचे नमुने पिण्यास योग्य असल्याचा महापालिकेच्या प्रयोगशाळेचा अहवाल

·         तज्ज्ञ समितीमार्फत स्वतंत्र तपासणी सुरू

            मुंबई, दि. 21 : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना राबवल्या असून मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरक्षित असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

            सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 8 जुलै 2026 रोजी मंत्रालयातील जमिनीखालील एक पाण्याची टाकी तसेच मुख्य व विस्तार इमारतीवरील एकूण 30 पाण्याच्या टाक्यांची संपूर्ण साफसफाई करण्यात आली. पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता केली जात असून, यापुढे दर 15 दिवसांनी सर्व टाक्यांची साफसफाई करण्याच्या सूचनांनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

            मंत्रालयातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत करण्यात आली असून, 29 एप्रिल 2026 तसेच 10 जुलै 2026 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. तसेच महापालिकेमार्फत मंत्रालयात येणाऱ्या पाण्याचे आणि जमिनीखालील आरसीसी टाकीमध्ये साठविलेल्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले असून, 10 जुलै 2026 रोजीच्या अहवालानुसार तेही पिण्यास योग्य आहे.

            याशिवाय, मंत्रालयाच्या मुख्य व विस्तार इमारतीमधील एकूण 33 जलशुद्धीकरण यंत्रणांची (वॉटर प्युरिफायर) सर्व्हिसिंगची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

            पाणीपुरवठ्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 11 जुलै 2026 रोजी मुख्य सचिव यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने 13 जुलै 2026 रोजी मंत्रालयातील जमिनीखालील टाकी, टेरेसवरील टाक्या तसेच मुख्य आणि विस्तार इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील पाण्याचे नमुने सलग तीन दिवस तपासणीसाठी संकलित केले असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणे अपेक्षित आहे.

            दरम्यान, मंत्रालयाच्या मुख्य व विस्तार इमारतीतील एकूण 88 प्रसाधनगृहांची दैनंदिन स्वच्छता नियुक्त कंत्राटदारामार्फत निश्चित वारंवारतेनुसार नियमितपणे केली जात असल्याचे सार्वजनिक बांधका

Governor Interacts with Swayamsiddha coordinators of universities

 Governor Interacts with Swayamsiddha coordinators of universities

 

      Mumbai, 21 July : Maharashtra Governor and Chancellor of state universities Jishnu Dev Varma today interacted with the University Coordinators of the online women empowerment platform related to State Public Universities, ‘Swayamsiddha’, through online mode from Lok Bhavan.

            Addressing the meeting, the Governor said Swayamsiddha is a unique platform that aims to empower women through education, skill development, leadership, entrepreneurship and enhanced employability.  He called for making ‘Swayamsiddha’ the tool of women empowerment by making it participatory, interactive, interesting and innovative.

            He called upon the universities to enrol maximum girl students both from within and outside the State on the platform and further called for inviting role models to interact with the students. 

            Vice Chancellor of SNDT Women’s University Prof Ujwala Chakradeo, Vice Chancellor of Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Dr Manali Kshirsagar and State Coordinator of Swayamsiddha Anuradha Potdar gave their presentation on the occasion.

 

      Mumbai, 21 July : Maharashtra Governor and Chancellor of state universities Jishnu Dev Varma today interacted with the University Coordinators of the online women empowerment platform related to State Public Universities, ‘Swayamsiddha’, through online mode from Lok Bhavan.

            Addressing the meeting, the Governor said Swayamsiddha is a unique platform that aims to empower women through education, skill development, leadership, entrepreneurship and enhanced employability.  He called for making ‘Swayamsiddha’ the tool of women empowerment by making it participatory, interactive, interesting and innovative.

            He called upon the universities to enrol maximum girl students both from within and outside the State on the platform and further called for inviting role models to interact with the students. 

            Vice Chancellor of SNDT Women’s University Prof Ujwala Chakradeo, Vice Chancellor of Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Dr Manali Kshirsagar and State Coordinator of Swayamsiddha Anuradha Potdar gave their presentation on the occasion.

राज्यपाल ने ‘स्वयंसिद्धा’ विश्वविद्यालय समन्वयकों से संवाद किया

 राज्यपाल ने ‘स्वयंसिद्धा’ विश्वविद्यालय समन्वयकों से संवाद किया

            मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र के राज्यपाल एवं राज्य विश्वविद्यालयों के कुलाधिपति जिष्णु देव वर्मा ने लोकभवन से ऑनलाइन माध्यम द्वारा राज्य सार्वजनिक विश्वविद्यालयों से संबंधित महिला सशक्तिकरण मंच स्वयंसिद्धा’ के विश्वविद्यालय समन्वयकों से संवाद किया।

            बैठक को संबोधित करते हुए राज्यपाल ने कहा कि स्वयंसिद्धा’ शिक्षा, कौशल विकास, नेतृत्व, उद्यमिता और रोजगार क्षमता के माध्यम से महिलाओं को सशक्त बनाने का एक अनूठा मंच है। उन्होंने इसे सहभागितापूर्ण, संवादात्मक, रोचक और नवोन्मेषी बनाकर महिला सशक्तिकरण का प्रभावी साधन बनाने का आह्वान किया।

            राज्यपाल ने विश्वविद्यालयों से आग्रह किया कि वे अधिक से अधिक छात्राओं को, राज्य के भीतर और बाहर से, इस मंच पर नामांकित करें तथा छात्राओं के साथ संवाद के लिए प्रेरणादायी व्यक्तित्वों को आमंत्रित करें।

            इस अवसर पर एसएनडीटी महिला विश्वविद्यालय की कुलपति प्रो. उज्ज्वला चक्रदेव, राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय की कुलपति डॉ. मणाली क्षीरसागर तथा स्वयंसिद्धा’ की राज्य समन्वयक अनुराधा पोटदार ने अपने विचार एवं प्रस्तुतीकरण साझा किए।

स्वयंसिद्धा समन्वयकांशी राज्यपालांचा संवाद

 स्वयंसिद्धा समन्वयकांशी राज्यपालांचा संवाद

 

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी स्वयंसिद्धा या राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संबंधित महिला सक्षमीकरण पोर्टल संदर्भात राज्यातील विद्यापीठ समन्वयकांशी लोकभवन येथून ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला.

 

स्वयंसिद्धा हे महिलांना शिक्षण, कौशल्य विकास, नेतृत्व, उद्योजकता आणि रोजगारक्षमता वृद्धी यांच्या माध्यमातून सक्षम करण्याचे प्रभावी व्यासपीठ असून ते अधिक संवादात्मक, समावेशी, आकर्षक आणि नाविन्यपूर्ण बनवावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.  

 

विद्यापीठांनी या पोर्टलवर राज्यातील तसेच राज्याबाहेरील अधिकाधिक विद्यार्थिनींची नोंदणी करावी तसेच विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तींना या मंचावर संवादासाठी आमंत्रित करण्याचे राज्यपालांनी सांगितले.

 

यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्ज्वला चक्रदेव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मनाली क्षीरसागर तसेच स्वयंसिद्धाच्या राज्य समन्वयक अनुराधा पोतदार यांनी सादरीकरण केले.

Featured post

Lakshvedhi