Monday, 6 July 2026

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जवाटप प्रक्रियेत पतसंस्थांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करा ·

 अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जवाटप प्रक्रियेत पतसंस्थांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करा

·         सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांचे निर्देश

मुंबई, दि. 6 : ग्रामीण भागासोबत पतसंस्थांची नाळ जुळलेली आहे. कर्जवाटप प्रक्रियेत पतसंस्थांचा समावेश झाल्यास अधिकाधिक युवकांना उद्योजकतेसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी आवश्यक अर्थसहाय्य मिळण्यास मदत होईल. त्यासाठी याबाबत सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बँकांसोबतच सक्षम पतसंस्थांचाही समावेश करण्यासंदर्भात सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

बैठकीस अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, दक्षिण कराडचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले, सध्या महामंडळामार्फत उद्योगासाठीचे अर्थसहाय्य बँकांद्वारे केले जाते. तसेच कर्जधारकांनी जमा केलेल्या व्याजाचा परतावाही संबंधित बँकांमार्फत दिला जातो. हेच काम सक्षम पतसंस्थांमार्फतही प्रभावीपणे करता येऊ शकते. पतसंस्थांची नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली असते. त्यामुळे कर्जवाटपाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि लाभार्थ्यांसाठी सोयीची होईल. यासाठी पतसंस्थांची निवड करताना विशिष्ट निकष निश्चित करण्याचे निर्देश मंत्री श्री भोयर यांनी यावेळी दिले.

महामंडळांच्या कर्ज योजनांसाठी पतसंस्थांचे आर्थिक निकष निश्चित करून विस्तृत प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री भोयर यांनी यावेळी दिले.

या सुधारणांमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम, पारदर्शक आणि शिस्तबद्ध सहकारी पतसंस्थांना प्राधान्य मिळेल. राज्यातील सक्षम आणि विश्वासार्ह पतसंस्थांकडे कर्जवाटपाची जबाबदारी सोपविल्यास कर्जधारक तरुणांना अधिक चांगली सेवा मिळेल आणि उद्योग उभारणीसह रोजगार निर्मितीसाठीदेखील आवश्यक अर्थसहाय्य अधिक सहज उपलब्ध होईल, असे सहकार मंत्री श्री भोयर यांनी सांगितले.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

 अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

 

मुंबई, दि. ६ : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

विशेष फेरी-१ अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटप झाले आहे, त्यांना संबंधित महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी 'Proceed for Admission' पर्यायाचा वापर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.

विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रियेतील सर्व कार्यवाही निर्धारित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

 

रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

 रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

 

·         रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क

·         नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ६ : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. भालचंद्र चव्हाण यांच्याकडून रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी आज व उद्या मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून रत्नागिरी जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ४८ तास दोन्ही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रशासनाला आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना तत्काळ राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच सुधागड व रोहा परिसरात आपत्कालीन परिस्थितीत अधिक वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देता यावा, यासाठी १४५ जवानांची अतिरिक्त तुकडी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पूर आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कर्जत, खोपोली येथील विविध सेवाभावी संस्थांशी आपण नियमित संपर्कात असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. या संस्थांना शासनाकडून आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जातील. तसेच जिल्ह्याच्या इतर भागांमध्येही त्यांच्या सेवांची आवश्यकता भासल्यास त्यांचे सहकार्य घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील पूरस्थितीवर प्रशासनासोबत स्वतः राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून सातत्याने लक्ष ठेवत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील सर्व नागरिकांनी अत्यंत आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा तसेच स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

संक्षेप में वर्षा की जानकारी

 संक्षेप में वर्षा की जानकारी

 

आज 6 जुलाई को सुबह 11:00 बजे तक मुंबई उपनगर जिले में 151.2 मिमी तथा मुंबई शहर में 105 मिमी वर्षा दर्ज की गई।

रायगढ़ जिले में 236.6 मिमी, ठाणे जिले में 158.7 मिमी तथा रत्नागिरी जिले में 152.3 मिमी वर्षा दर्ज की गई।


नासिक और त्र्यंबकेश्वर क्षेत्र में पर्यटकों की सुरक्षा के लिए विशेष सावधानी बरती जाए

 नासिक और त्र्यंबकेश्वर क्षेत्र में पर्यटकों की सुरक्षा के लिए विशेष सावधानी बरती जाए

 

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि अरब सागर में बन रहे गहरे निम्न दबाव क्षेत्र के कारण कल नासिक जिले के अधिकांश हिस्सों में बादल फटने जैसी अत्यधिक वर्षा होने की प्रबल संभावना है। विशेष रूप से त्र्यंबकेश्वर तथा आसपास के क्षेत्रों में लगभग 300 मिमी वर्षा होने का अनुमान है। ऐसी स्थिति में नासिक जिला प्रशासन पूरी तरह तैयार रहे तथा निचले इलाकों में जलभराव न हो, इसके लिए आवश्यक उपाय करे। साथ ही कहीं भी जनहानि न हो, इसके लिए भी विशेष सतर्कता बरती जाए।

उन्होंने कहा कि वर्तमान परिस्थिति को देखते हुए नासिक एवं त्र्यंबकेश्वर क्षेत्र में मौजूद पर्यटकों की सुरक्षा के लिए विशेष सावधानी बरती जाए। जिन मार्गों के बंद होने अथवा भूस्खलन की आशंका है, उन सभी पहलुओं को ध्यान में रखते हुए पर्यटकों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया जाए। मुख्यमंत्री ने पर्यटकों से भी अगले कुछ दिनों तक त्र्यंबकेश्वर क्षेत्र की यात्रा न करने की अपील की।

उन्होंने सभी संबंधित एजेंसियों को अत्यधिक सतर्क रहते हुए फंसे हुए नागरिकों के बचाव के लिए तत्काल कार्रवाई करने के निर्देश दिए। मुख्यमंत्री ने स्पष्ट किया कि अगले 48 घंटे तक शून्य जनहानिका लक्ष्य रखते हुए अधिकतम सतर्कता बरती जाए।

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय राजमार्ग पर आने वाली बाधाओं को तत्काल दूर कर यातायात सुचारु

 उन्होंने कहा कि मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय राजमार्ग पर आने वाली बाधाओं को तत्काल दूर कर यातायात सुचारु किया जाए। इसके लिए भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के साथ समन्वय स्थापित कर राजमार्ग पर जमा मलबा हटाया जाए। वर्षा की स्थिति को देखते हुए संभावित भूस्खलन वाले स्थानों पर बचाव दल पहले से तैयार रखें। साथ ही मुंबई-गोवा राजमार्ग पर भी इस बार अप्रत्याशित स्थानों पर भूस्खलन की घटनाएं हुई हैं। इसलिए संबंधित विभाग पूरी तरह सतर्क रहें तथा भूस्खलन का मलबा तुरंत हटाएं। किसी भी परिस्थिति में यातायात जाम न होने पाए, इसकी विशेष सावधानी बरती जाए।

बारिश की पृष्ठभूमि में सभी शासकीय तंत्र 24×7 ‘अलर्ट मोड’ पर रहें

 बारिश की पृष्ठभूमि में सभी शासकीय तंत्र 24×7 ‘अलर्ट मोडपर रहें

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         मुख्यमंत्री ने मंत्रालय स्थित आपदा प्रबंधन नियंत्रण कक्ष से राज्य में वर्षा की स्थिति की समीक्षा की

         अत्यावश्यक कार्य के अलावा नागरिक अगले दो दिनों तक घर से बाहर न निकलें

 

मुंबई, 6 जुलाई : मुंबई सहित तटीय जिलों में 50 से 70 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से तेज हवाएं चलने की संभावना है। इसके साथ ही आज दोपहर 3:00 बजे से 4:30 बजे के बीच समुद्र में उच्च ज्वार (हाई टाइड) आने की भी संभावना है। इस पृष्ठभूमि में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सभी संबंधित विभागों को 24×7 अलर्ट मोड पर रहने तथा किसी भी आपात स्थिति में तत्काल राहत एवं बचाव कार्य शुरू करने के निर्देश दिए हैं। राज्यभर में आज और कल भारी वर्षा की संभावना को देखते हुए मुख्यमंत्री ने नागरिकों से भी अपील की कि अत्यावश्यक कार्य के अलावा वे घर से बाहर न निकलें।

राज्य आपदा नियंत्रण कक्ष में आयोजित बैठक में मुख्यमंत्री फडणवीस ने राज्य में वर्षा से उत्पन्न परिस्थितियों की समीक्षा की। इस अवसर पर आपदा प्रबंधन मंत्री गिरीश महाजन उपस्थित थे।

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि मौसम विभाग के पूर्वानुमान के अनुसार मुंबई तथा तटीय क्षेत्रों में तेज हवाओं के साथ भारी वर्षा होने की संभावना है। संभावित उच्च ज्वार को देखते हुए राज्य आपदा प्रतिक्रिया बल (एसडीआरएफ) तथा राष्ट्रीय आपदा प्रतिक्रिया बल (एनडीआरएफ) को अलर्ट मोड पर रखा गया है। यदि बाढ़ जैसी स्थिति उत्पन्न होती है तो एसडीआरएफ और एनडीआरएफ की टीमों को तुरंत रवाना किया जाए। उन्होंने निर्देश दिए कि आपात स्थिति में नागरिकों को तत्काल सहायता उपलब्ध कराई जाए।

Featured post

Lakshvedhi