मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील वन व वृक्षआच्छादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून पर्यावरणीय समतोल राखत शाश्वत विकास साधणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. आजच्या युगात विकास आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये संघर्ष नाही, तर दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पुढे नेणे हीच काळाची गरज आहे. राज्याचा विकास आवश्यक असला तरी पर्यावरणाच्या संरक्षणाशी कोणताही तडजोड होऊ शकत नाही.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 8 March 2026
पर्यावरण आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर
पर्यावरण आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर
तीनशे कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य; विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.८ : पर्यावरणाचे संर्वधन आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर आहे. राज्यात वृक्ष व वनक्षेत्राचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी (३ अब्ज) वृक्षलागवडीचा संकल्प राज्य शासनाने केला असून यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील हॉटेल सहारा येथे नानाजी देशमुख प्रतिष्ठान आणि अमेनिटी ट्री केअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुस-या आंतरराष्ट्रीय आर्बोरीकल्चर परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे,अमेनिटी ट्री केअर फाऊंडेशनचे वैभव राजे यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील वन व वृक्षआच्छादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून पर्यावरणीय समतोल राखत शाश्वत विकास साधणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. आजच्या युगात विकास आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये संघर्ष नाही, तर दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पुढे नेणे हीच काळाची गरज आहे. राज्याचा विकास आवश्यक असला तरी पर्यावरणाच्या संरक्षणाशी कोणताही तडजोड होऊ शकत नाही.
विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुणे शहरासाठी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. विद्यापीठ मुख्यद्वारा समोर व गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.
पुण्यात वाहतुकीसाठी जमिनीवर, आकाशात आणि जमिनीखाली
पुण्यात वाहतुकीसाठी जमिनीवर, आकाशात आणि जमिनीखाली अशा तिन्ही स्तरांवर एकाच वेळी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पुणे व परिसरासाठी दोन चक्राकार मार्ग (रिंग रोड) प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारले जात असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) आणि इतर सेवांना बळ दिले जात असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
पुणे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’चे (जीसीसी) महत्त्वाचे केंद्र
पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मोठ्या वाढीनंतर आता पुणे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’चे (जीसीसी) महत्त्वाचे केंद्र बनत आहे. गेल्या वर्षभरात देशातील सर्वाधिक जीसीसी स्पेस पुण्यात विकसित झाली असून त्यामुळे शहराचे आर्थिक व औद्योगिक महत्त्व आणखी वाढले आहे. या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे काही मोठ्या शहरांच्या विकासाची गती मंदावल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. त्यामुळे पुणे शहराला ‘डी-कंजेस्ट’ करणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते; मात्र सर्वांना विश्वासात घेऊन आणि विविध पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य मिळवून हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. या प्रक्रियेत दिवंगत अजित दादांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता, असे त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात काही माध्यमांनी आणि नागरिकांनी टीका केली होती; मात्र शहराच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात अजित दादा एका भाषणात म्हणाले होते, ‘आम्ही अभियंता नाही; मात्र अभियंत्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार प्रकल्प वेगाने पूर्ण करणे हे आमचे काम आहे,’ असे स्पष्टपणे सांगत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज त्याचे सकारात्मक परिणाम पुणेकरांना दिसत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत
वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा; पायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला गती
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. ८ (जिमाका) : पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, 'पीएमआरडीए'चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी उपस्थित होते
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...