Monday, 19 January 2026

परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा · कृषी विभागाचा शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना

 परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा

·         कृषी विभागाचा शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना

 

मुंबई,दि.१९: कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनामधील रवाना झालेल्या शेतक-यांना  कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तो अनुभव राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावाअसे आवाहन केले.

शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनाअंतर्गत २०२५-२६ या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित आहेत. त्यामध्ये युरोपइस्राईल आणि मलेशिया,व्हिएतनामफिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत १७ जानेवारी २०२६ रोजी मलेशियाव्हिएतनाम व फिलिपाईन्स या तीन देशांचा एकत्रित अभ्यासदौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी पुणे येथून मुंबई मार्गे पुढे प्रस्थान केले असूनया दौऱ्यामध्ये राज्यातील १५ प्रगतशील शेतकरी१ कृषी विभाग अधिकारी तसेच १ प्रवासी कंपनी प्रतिनिधी हे सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमाच्या प्रभावी प्रचार-प्रसिद्धीसाठी इन्फ्ल्युएन्सर्सची भूमिका महत्त्वाची

 कार्यक्रमाच्या प्रभावी प्रचार-प्रसिद्धीसाठी इन्फ्ल्युएन्सर्सची भूमिका महत्त्वाची

– जिल्हाधिकारी

 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीबाबत मार्गदर्शन करताना सांगितले कीसध्याच्या काळात सोशल माध्यमे ही प्रभावी प्रसिद्धीची साधने ठरत असूनत्यामध्ये इंस्टाग्राम हे अल्प कालावधीत मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचणारे प्रभावी माध्यम आहे. कोणत्याही कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

नांदेड येथे आयोजित हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरइंस्टाग्रामसह विविध सोशल माध्यमांचा सकारात्मक व प्रभावी वापर करून हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. यासाठी स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील इन्फ्ल्युएन्सर्सनी पुढे येऊन सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहनही त्यांनी केले. हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्यसेवा आणि बलिदानाचा संदेश देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने समाज माध्यमातून त्याचा आशय प्रभावीपणे प्रसारित करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.

सर्वांच्या सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा कार्यक्रम यशस्वी करा

 सर्वांच्या सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा कार्यक्रम यशस्वी करा

– सचिव रुचेश जयवंशी

नांदेडदि. १८: नांदेड शहरातील मोदी मैदानावर आयोजित हिंद-दी-चादर कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असूनया भव्य कार्यक्रमाचे सूक्ष्म व सुसूत्र नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी २६ विविध समित्या गठीत करण्यात आल्या असूनया समित्यांमार्फत प्रत्येक लहान-मोठ्या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांच्या समन्वयाने व सहकार्याने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा हा कार्यक्रम यशस्वी होईलअशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभागराज्यस्तरीय समिती तसेच शीखसिकलीकरबंजारालबानासिंधीमोहयालवाल्मीकीउदासीनभगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हिंद-दी-चादर कार्यक्रमाचे आयोजन मोदी मैदाननांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज मोदी मैदानावर गठीत समित्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

ऑनलाईन माध्यमातून हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर

 ऑनलाईन माध्यमातून हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी शहीदी समागम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकछत्रपती संभाजीनगर माहिती विभागाचे प्र.उपसंचालक प्रशांत दैठणकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने (छत्रपती संभाजीनगर),अरुण सूर्यवंशी (जालना),गोपाळ साळुंखे (धुळे)सुनील सोनटक्के (सोलापूर)डॉ. रवींद्र ठाकूर (जळगाव) आणि छत्रपती संभाजी नगर विभागाचे सहायक संचालक गणेश फुंदे यांनी सहभाग नोंदविला. सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी आपापल्या जिल्ह्यातील प्रसिद्धी नियोजनाची सविस्तर माहिती सादर केली.

१० लाख भाविकांची उपस्थिती; आंतरराष्ट्रीय महत्त्व

 १० लाख भाविकांची उपस्थितीआंतरराष्ट्रीय महत्त्व

हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी शहीदी समागम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक ऑनलाईन माध्यमातून म्हणाले,की हा कार्यक्रम देश-विदेश पातळीवर अत्यंत महत्त्वाचा आहे.या महासोहळ्यात केवळ शीख समाजच नव्हे,तर सिकलीगर,बंजारा,लबानासिंधी,मोहयाल,वाल्मिकी,उदासीन आणि वारकरी संप्रदायातील भगत नामदेव समाज आदी समाजासह इतर समाज असे मिळून सुमारे १० लाख भाविक सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रसिद्धीची व्याप्ती मोठी असावी.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा

 सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नियोजनावर भर दिला.ते म्हणाले,की मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसोबतच सोशल मीडियाचा (समाज माध्यमे) प्रभावी वापर करून राज्यासह राज्याबाहेरही या कार्यक्रमाची माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.

'हिंद-दी-चादर'चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा

 'हिंद-दी-चादर'चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा

-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

नांदेडमधील ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

नांदेडदिनांक १८ (जिमाका) : शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादरश्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या ऐतिहासिक 'शहीदी समागमसोहळ्याचे विचार   खेडोपाडी आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजेत,असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले. 

येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या प्रसिद्धी कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत श्री.पापळकर यांनी प्रसिद्धी यंत्रणेला मार्गदर्शन केले.गुरुजींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पारंपरिक पद्धतींसोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर द्याअसेही ते म्हणाले.

            शिक्षण विभागासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी शिक्षण विभागाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे श्री.पापळकर यांनी नमूद केले.शाळांच्या माध्यमातून प्रभात फेरी,निबंध,चित्रकला,प्रश्नमंजुषा आणि समूहगान असे उपक्रम राबवून विद्यार्थी व पालकांपर्यंत कार्यक्रमाचा संदेश पोहोचवावा.तसेच,शासकीय कार्यालयेपेट्रोल पंप आणि सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्ज लावून वातावरण निर्मिती करावी,अशा सूचना त्यांनी दिल्या.

Featured post

Lakshvedhi