Saturday, 17 January 2026

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची श्रीमती वल्सा नायर - सिंग यांनी घेतली शपथ

 महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची

श्रीमती वल्सा नायर - सिंग यांनी घेतली शपथ

 

मुंबईदि. १७ : भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी श्रीमती वल्सा नायर- सिंग यांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची व गोपनीयतेची शपथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

 

कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेअपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेमुख्य सचिव राजेश अग्रवालऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आदींसह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

--------000

महिला लोकशाही दिनाचे १९ जानेवारी रोजी आयोजन

 महिला लोकशाही दिनाचे १९ जानेवारी रोजी आयोजन

 

मुंबईदि. १४ : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहर यांच्या वतीने महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार  महिला लोकशाही दिन सोमवार,  १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर येथे आयोजित करण्यात येणार आहेअसे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

या उपक्रमांतर्गत पीडित महिलांना त्यांच्या तक्रारी व अर्ज सादर करण्यासाठी जिल्हा पातळीवर सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय२१५ बी.बी.डी. चाळपहिला मजलावरळीमुंबई – ४०००२५ येथे तक्रार अर्जाचा नमुना उपलब्ध आहे.

तक्रार दाखल करताना अर्ज निर्धारित नमुन्यात भरावा. तक्रारी वैयक्तिक स्वरूपाच्या असाव्यात. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणेअपूर्ण अर्जधर्म व राजकारण विषयक बाबी अथवा वैयक्तिक स्वरूप नसलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीतअसेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर भारतीय मनुष्यबळ क्रियाशील ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कौशल्य विकासावर

 

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीजागतिक स्तरावर भारतीय मनुष्यबळ क्रियाशील ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कौशल्य विकासावर अधिक भर आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील कौशल्य विभाग कार्यरत असून विविध देशांमध्ये राज्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधनीद्वारे कौशल्य प्रशिक्षण आणि जपानी भाषेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचेही कौशल्य विकास  मंत्री लोढा यांनी सागितले.

जपानमध्ये कृषीवैद्यकीयविविध तंत्रज्ञबांधकाम आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहे. भारतीय युवक अधिक कार्यक्षमतेने काम करत असून भारतीय कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जगभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी सांगितले.

0000

सुधारित जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी घेतली कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सदिच्छा भेट

 सुधारित

जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी घेतली

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सदिच्छा भेट

 

मुंबई,दि. १४ :  राज्यातील कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येत्या तीन महिन्यात याबाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी मंत्रालयात कौशल्य विकास मंत्री लोढा यांची शिष्टमंडळासह भेट घेतली.

यावेळी कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची जपानमध्ये मोठी मागणी असल्याच्या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या संधीबाबत चर्चा करण्यात आली. कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा,कौशल्य विकास विभागाचे आयुक्त डॉ.अमित सैनीरतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकरव्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुखजपानच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे वरिष्ठ संचालक तोशिनोरी नाईतोपरदेशी मनुष्यबळ विभागाचे संचालक ईजी यामामोटो तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे संचालक माकोतो ताकाहाशीआंतरराष्ट्रीय व्यवसाय विनिमय विभागाच्या प्रमुख हिरोए मिकामी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाषांतराची जबाबदारी दुभाषी युका इगाराशी यांनी पार पाडली.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्जांसाठीचे पोर्टल २२ जानेवारीपर्यंत सुरू

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत

अर्जांसाठीचे पोर्टल २२ जानेवारीपर्यंत सुरू

 

मुंबईदि. १४ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएसएस) अंतर्गत २०२५-२६ साठी नुतनीकरणासाठी पात्र असलेले तसेच २०२४-२५ मधील डी-डुप्लिकेशन प्रक्रियेत समाविष्ट असलेले तथापि विहित कालावधीत अर्ज करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी एनएसपी २.० पोर्टल २२ जानेवारी २०२६ पर्यंत पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व संबंधित शाळांनी पात्र विद्यार्थ्यांचे नूतनीकरण अर्ज एनएसपी २.० पोर्टलवर २२ जानेवारीपूर्वी ऑनलाईन सादर करून घ्यावेत. त्याचप्रमाणे सर्व अर्जांची प्रथम स्तर आणि द्वितीय स्तर पडताळणी २२ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याने सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेत मिळेलयाची दक्षता घ्यावीअसे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

0000

घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या तरतूदीसंदर्भातील आदेश जुनाच

 घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या

तरतूदीसंदर्भातील आदेश जुनाच

 

मुंबईदि. 14 : महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने 14 फेब्रुवारी 2012 मध्येच निर्गमित केलेला आहे.

जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला असल्याचे वृत्त समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून प्रसारित होत आहेपरंतु हे वस्तुस्थितीला धरुन नाही. याबाबतचा आदेश जुनाच आहे. त्या 14 फेब्रुवारी 2012 रोजीच्या आदेशानुसार जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करु शकतीलपरंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहानेदेखील फिरता येणार नाही.

0000

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 19 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी 19 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

 मुंबईदि. १५ : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकयुवतींमुळे समाजात युवाशक्तीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. युवकांना मानव संसाधन विकासाचा प्रमुख स्रोत मानले जात असून विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या अनुषंगाने राज्याच्या युवा धोरण २०१२ नुसार राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र युवकयुवती व संस्थांनी २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीसाठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी १९ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करावेतअसे आवाहन मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी केले आहे.

 

पुरस्कारासाठीचे अर्ज भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलदुसरा मजलाजिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई शहर कार्यालयधारावी येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

समाजातील दुर्बल घटकअनुसूचित जाती-जमातीआदिवासी भागतसेच शिक्षणरोजगारआरोग्यपर्यावरणसंस्कृतीकलाक्रीडाविज्ञान-तंत्रज्ञानउद्योगमहिला सक्षमीकरणस्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधव्यसनमुक्ती आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकयुवती व संस्थांना जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी 9594369561 या क्रमांकावर संपर्क साधावाअसेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi