Monday, 12 January 2026

राज्यात परिचर्या संचालनालय स्थापन करणे या विषयी

 राज्यात परिचर्या संचालनालय स्थापन करणे या विषयी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

राज्यात ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्यशहरी भागात नगरविकास आणि वैद्यकीय  महाविद्यालयांच्या रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत रुग्णांना वैद्यकीय सेवा दिल्या जात आहे. त्यामुळे राज्यात परिचर्या संचालनालय स्थापन करणे याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या विभागांची संयुक्त बैठक घेतली जाईलअसे आरोग्यमंत्री म्हणाले.

आरोग्य सेवेत परिचर्या सेवेला अधिक महत्व असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने परिचर्या संवर्गाबाबत स्वतंत्र बैठक घेतली असून या संवर्गासाठी स्वतंत्र संचालक देण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचेही मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

०००००

परिचर्या संचालनालयासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, नगरविकास विभागाची संयुक्त बैठक घेणार

 परिचर्या संचालनालयासाठी आरोग्यवैद्यकीय शिक्षण,

नगरविकास विभागाची संयुक्त बैठक घेणार

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

नागपूरदि. १२:-  परिचर्या संवर्ग हा आरोग्य सेवेचा आत्मा असून परिचर्या सेवा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. परिचर्या संचालनालय स्थापन करण्यासाठी आरोग्य विभागवैद्यकीय शिक्षण विभाग आणि नगरविकास विभाग यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली.

याबाबतची बैठक विधान परिषद सभापती यांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी अपेक्षा सदस्य उमा खापरे यांनी व्यक्त केली. सभापती राम शिंदे यांनी ही बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेण्याचे आरोग्य विभागाला निर्देश दिले.

शिवडी रेल्वे स्टेशनजवळील प्रकल्प बाधित लोकांच्या तसेच एल्फिस्टन परिसरातील प्रकल्प बाधित लोकांच्या पुनर्वसन

 मंत्री सामंत म्हणालेया रस्त्याचे कामास शिवडी रेल्वे स्टेशनजवळील प्रकल्प बाधित लोकांच्या तसेच एल्फिस्टन परिसरातील प्रकल्प बाधित लोकांच्या पुनर्वसन प्रक्रियेच्या कामामुळे विलंब झाला.

 

या रस्त्याच्या कामामुळे ८३ कुटुंब बाधित होत असून त्यापैकी ३ कुटुंबांना त्यांच्या मागणीनुसार आर्थिक मोबदला देण्यात आला आहे.  या प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या उर्वरित कुटुंबांचे त्याच परिसरात म्हाडाकडून एमएमआरडीएकडे प्राप्त होणाऱ्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

 शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत

 पूर्ण करण्याचे नियोजन

-उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर दि. १२ : शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या एकूण कामापैकी ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे उर्वरित काम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वरळी आणि शिवडी दरम्यानचा प्रवास अधिक जलद होईल. तसेच  वरळी ते अटल सेतू प्रवासात वेळेची बचत होण्यास मदत होईलअशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

 

सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी वरळी येथून जाणाऱ्या शिवडी जोडरस्त्याच्या कामास गती मिळणेबाबत विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भाई जगतापसुनील शिंदेप्रविण दरेकर आणि सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला

राज्यातील शाळांमध्ये ‘शिवचरित्र वाचन’ उपक्रमाची कल्पना सकारात्मक असल्याचे सांगत,

 राज्यातील शाळांमध्ये शिवचरित्र वाचन’ उपक्रमाची कल्पना सकारात्मक असल्याचे सांगतशिक्षण विभागाशी चर्चा करून हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईलअसेही राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर आधारित अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाछत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनाछत्रपती शिवाजी महाराज महा-राजस्व समाधान शिबिरे या योजनांच्या माध्यमातून सरकार प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय सुविधा पोहोचवण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

००००

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध

 छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी

राज्य शासन कटिबद्ध

-         राज्यमंत्री पंकज भोयर

 

नागपूरदि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत योग्य गौरवाने प्रसार व्हावायाबाबत राज्य सरकार कटिबद्ध असून यासाठी पाठपुरावा अधिक वेगाने केला जाणार असल्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना सांगितले.

सदस्य सत्यजित तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. यावेळी सदस्य अमोल मिटकरीज.मो.अभ्यंकर यांनी चर्चेत सहभागी झाले होते.

राज्यमंत्री पंकज भोयर म्हणालेछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांना भेटून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा योग्यसखोल व प्रेरणादायी परिचय मिळावा याचे महत्त्व सांगितले जाणार आहे.

तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण २०२४ मधील ०.७९ टक्क्यांच्या तुलनेत २०२५

 मंत्री अदिती तटकरे म्हणाल्यातीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण २०२४ मधील ०.७९ टक्क्यांच्या तुलनेत २०२५ मध्ये ०.४१ इतके कमी झाले आहे. मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये देखील कुपोषण मुक्तीला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

           

या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्यास्वस्थ मातासशक्त बालक जन्माला यावेत यासाठी शासनामार्फत विविध प्रयत्न करण्यात येतात. दुर्गम भागात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णालयांमध्ये चांगल्या सुविधा दिल्या जातात. स्वच्छतागृहे चांगली केली जात आहेत. सर्व प्रसूती रुग्णालयातच व्हाव्यात यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. आयसीडीएस मार्फत राज्यात ४२,६०२ गरोदर माता आणि बालकांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. तथापिराज्यात बालकांचे मृत्यू केवळ कुपोषणामुळे होत नसून त्यासाठी विविध कारणे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Featured post

Lakshvedhi