Tuesday, 11 November 2025

ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काटेकार असावी यासाठी खबरदारी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काटेकार असावी यासाठी खबरदारी घेण्यात यावी. अत्याधुनिक यंत्रणा तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने एकात्मिक सुरक्षा प्रणाली विकसित करा, जेणेकरून तात्काळ आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत मिळेल.मंदिर व्यवस्थापनासाठी काटेकोर नियम असणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागानेही येथील प्रस्तावित कामे गतीने करावीत. आज सादर झालेल्या आराखड्यांना उच्चस्तरीय समितीकडून मंजूरीनंतर निधी मिळेल. पुरातत्व विभागाकडून घेण्यात येणा-या मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या अधिका-यांसोबत एक वेगळी बैठक आयोजित करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

 

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा - रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना :

 अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा

- रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना :

 

सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मुख्य सचिवांसमवेत बैठक;

हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर

 

मुंबईदि. 10 : सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तथा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार तसेच गृहपरिवहननगर विकाससार्वजनिक बांधकामसार्वजनिक आरोग्य आणि शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

सनितीचे अध्यक्ष अभय सप्रे 9 ते 14 नोव्हेंबरदरम्यान मुंबईपुणे दौऱ्यावर असूनरस्ता सुरक्षा सुधारणा आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.

राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शन ‘आदी चित्र’ चे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते उद्घाटन

 राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शन आदी चित्र चे

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते उद्घाटन


 

मुंबईदि. १० : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव वर्ष निमित्ताने केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालय आणि ट्रायफेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदी चित्र’ राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते झाले.

  यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेकेंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्या संचालक दीपाली मसीरकरप्रादेशिक व्यवस्थापकट्रायफेड डॉ. तारुल भावसार उपस्थित होते. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनात देशभरातील १०० हून अधिक पारंपरिक आदिवासी चित्रांचा समावेश असूनवारली (महाराष्ट्र)सौर व पट्टचित्र (ओडिशा)गोंड व भील (मध्य प्रदेश) आणि पिठोरा (गुजरात) या प्रमुख चित्रशैलींचे दर्शन घडविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे सहा आदिवासी कलाकारांकडून थेट वारली चित्रांकनाचे प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. हे प्रदर्शन दि. 10 ते 16 नोव्हेंबर 2025 दरम्यान दररोज सकाळी 11 ते सायं. 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

भारताच्या समृद्धविविध आणि रंगीबेरंगी आदिवासी कला-संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आपले सरकार सेवा केंद्र’ नागरिकांच्या विश्वासाचे प्रतिक व्हावे

 ‘आपले सरकार सेवा केंद्र’ नागरिकांच्या विश्वासाचे प्रतिक व्हावे

- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

·         मुंबई उपनगरात २३८ आपले सरकार सेवा केंद्रांचे वितरण

 

मुंबईदि. 10 : शासनाने सुरू केलेली आपले सरकार सेवा केंद्र’ ही योजना नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवांचा सुलभ लाभ मिळवून देण्यासाठी आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र हे नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक व्हावेअशी अपेक्षा माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली          

चेतना महाविद्यालय येथील सभागृहात आयोजित आपले सरकार सेवा केंद्र वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियारउपजिल्हाधिकारी सुभाष काकडे तसेच मुंबई उपनगरातील आपले सरकार सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

पालक मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीआज जगभर माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या युगात सायबर धोकेही वाढले आहेत. महाराष्ट्राचा सायबर सुरक्षा सेल सक्षम आहेतरीही प्रत्येक सेवा केंद्राने जबाबदारीने काम करून नागरिकांची माहिती सुरक्षित ठेवावी. तंत्रज्ञानाचा वापर काळजीपूर्वक करावा.

आपले सरकार सेवा वितरण अधिक कार्यक्षम करण्यासाठी तांत्रिक सुधारणा राबविण्यात येत आहे. व्हॉट्सॲपद्वारे

 मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले कीआपले सरकार सेवा वितरण अधिक कार्यक्षम करण्यासाठी तांत्रिक सुधारणा राबविण्यात येत आहे. व्हॉट्सॲपद्वारे प्रमाणपत्र पाठविणेअर्ज प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणे सर्व आपले सरकार’ तसेच आधार केंद्रांचे जिओ-टॅगिंग पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या जवळच्या सेवा केंद्राचे ठिकाण गुगल मॅप व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे सहजपणे कळू शकते.

जिल्हाधिकारी श्री.कटियार म्हणाले कीतहसील कार्यालयातील सेतू केंद्रांचे आधुनिकिकरण सुरू असूनजशी सुविधा पासपोर्ट कार्यालयात मिळते तशीच सुविधा नागरिकांना सेतू कार्यालयात मिळणार आहे. अंधेरी तालुक्यात प्रभागनिहाय 54, बोरीवली तालुक्यात प्रभागनिहाय 67 व कुर्ला तालुक्यात प्रभागनिहाय 117 आपले सरकार सेवा केंद्राचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासन लवकरच सेवा केंद्रांच्या ब्रँडिंगसाठी

 महाराष्ट्र शासन लवकरच सेवा केंद्रांच्या ब्रँडिंगसाठी व्यावसायिक संस्थेशी करार करणार असूनकेंद्रांच्या कामकाजात एकसंध आणि व्यावसायिकता आणली जाणार असल्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 238 सेवा केंद्रांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यात 7 दिव्यांग व्यक्तींना तर एका तृतियपंथीयाचासुद्धा सहभाग आहे.

ज्योतिर्लिंग स्थलों पर सुरक्षा व्यवस्था अत्यंत सशक्त होनी चाहिए। एआय और अत्याधुनिक तकनीक

 मुख्यमंत्री ने कहा कि ज्योतिर्लिंग स्थलों पर सुरक्षा व्यवस्था अत्यंत सशक्त होनी चाहिए। एआय और अत्याधुनिक तकनीक की मदद से एकीकृत सुरक्षा प्रणाली तैयार की जाएजिससे आपात स्थिति में तुरंत सहायता उपलब्ध हो सके। मंदिर प्रबंधन के लिए सख्त नियम आवश्यक हैं। पर्यटन विभाग को पर्यावरण संरक्षण और रोजगार सृजन के दृष्टिकोण से प्रस्तावित कार्यों को शीघ्रता से पूरा करने के निर्देश दिए गए।

 

उन्होंने कहा कि उच्चस्तरीय समिति की मंजूरी के बाद विकास योजनाओं को निधि प्राप्त होगी। पुरातत्व विभाग से मंजूरी के लिए केंद्र सरकार के अधिकारियों के साथ अलग बैठक आयोजित की जाएगी।

Featured post

Lakshvedhi