Sunday, 7 September 2025

राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण; उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे

 राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण;

उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे

मुंबईदि. : राज्यातील दोन कोटी चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आधार क्रमांकाच्या प्रमाणीकरणाकरीता विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (आधार)(UIDAI) सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करुन अशा आधारधारक मुलांची नोंद संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत सरल प्रणालीअंतर्गत करण्यात येते. शिक्षण विभागाकडील विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षण विभागाने प्रत्येक गटसाधन केंद्रावर दोन असे एकूण 816 आधार संच उपलब्ध करुन दिलेले आहेत. विविध माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आवश्यक दुरुस्ती दोन्‍ही कामे सध्या गटस्तरावर सुरू आहेत. तथापिआधार प्राधिकरणामार्फत विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील माहितीमध्ये विसंगती आढळून येत असल्यामुळे पडताळणी प्रलंबित राहत आहे.

२८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानात मोफत आरोग्यसेवा :

 २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानात मोफत आरोग्यसेवा :

• एकूण आरोग्य शिबिरे : ७,१५९


• एकूण लाभार्थी रुग्ण : ३,२६,००१


• एकूण पुरुष लाभार्थी : १,५६,५६०


• एकूण महिला लाभार्थी : १,४१,१०८


• लहान बालक लाभार्थी : २८,३३३


• संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी पाठवलेले) : ९,६६०


• एकूण रक्तदान शिबिरे : ९५


• एकूण रक्तदाते : ६,८६२


महाराष्ट्रातील ३.२६ लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला असून, ६,८६२ दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान

• सर्वाधिक शिबिरे : सोलापूर - १२३६


• सर्वाधिक रुग्ण तपासणी : सोलापूर – ६२,१८१


• सर्वाधिक संदर्भित रुग्ण : पुणे -१५९९


• सर्वाधिक रक्तसंकलन : पुणे - १६५०


• बालकांचा सर्वाधिक सहभाग : पुणे – ७८५०


गणेशोत्सवासारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळाली. तपासणीदरम्यान आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार असल्याचे श्री. रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख यांनी कळविले आहे.


0000




श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

 वृत्त क्र. ३५८१

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून

आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

·         ,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

 

मुंबई, दि. ५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान ७१५९ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून तब्बल ३ लाख २६ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.

तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या ९,९६० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेचनागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून ९५ रक्तदान शिबिरांतून एकूण ६,८६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षमहात्मा फुले जन आरोग्य योजनाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयेजिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

 त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील

समिती सदस्यांची नियुक्ती

 

मुंबईदि. ५ : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० जून२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

या समितीमध्ये डॉ. सदानंद मोरे, (माजी अध्यक्षभाषा सल्लागार समिती)डॉ. वामन केंद्रे, (संचालकनॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD)), डॉ. अपर्णा मॉरिस, (शिक्षणतज्ज्ञपुणे)श्रीमती सोनाली कुलकर्णी जोशी, (भाषा विज्ञान प्रमुखडेक्कन कॉलेजपुणे)डॉ. मधुश्री सावजी, (शिक्षणतज्ज्ञछत्रपती संभाजीनगर)डॉ. भूषण शुक्ल, (बालमानसतज्ज्ञपुणे) हे सदस्य तरसंजय यादव, (राज्य प्रकल्प संचालकसमग्र शिक्षा अभियानमुंबई) हे सदस्य सचिव असतील.

 

उपरोक्त समिती दिनांक ३० जून२०२५ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यकक्षेप्रमाणे कामकाज करेल तसेच त्रिभाषा धोरणांसंदर्भातील अहवाल तीन महिन्यांच्या मुदतीत शासनास सादर करेल.


राजधानी दिल्लीत उमाजी नाईक जयंती साजरी

 राजधानी दिल्लीत उमाजी नाईक जयंती साजरी

 

            नवी दिल्लीदि. 7 इंग्रजाचे कर्दनकाळ आणि आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास व्यवस्थापक प्रमोद कोलपतेसहायक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी श्री. कोलपते यांनी उमाजी नाईक यांच्या कार्याचा परिचय सर्वांना करून दिला. 


महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल - पर्यटनमंत्री शंभुराज देसाई

 महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल - पर्यटनमंत्री शंभुराज देसाई

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारस्याचा अविभाज्य भाग आहे. परदेशी पर्यटकांना या उत्सवात सहभागी करून घेणेहा आपल्या परंपरांचा जागतिक पातळीवर प्रसार करण्याचा एक सशक्त प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल आणि आपल्या सांस्कृतिक वैभवाची ख्याती जगभरात पोहोचेल, असे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. तर, आम्ही पर्यटकांसाठी एक असे व्यासपीठ निर्माण केलेजिथे ते या उत्सवाचा थेट अनुभव घेऊ शकले. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ होईल, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे यांनी म्हटले आहे.

पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, आमच्या विशेष दालनामुळे पर्यटकांना केवळ मिरवणूक पाहण्याचीच संधी मिळाली नाहीतर ते गणेशोत्सवाच्या खऱ्या भावनेशी जोडले गेले. त्यांनी दाखवलेला उत्साह आणि प्रेम पाहून आम्ही प्रेरित झालो आहोत. ढोल-ताशांच्या गजरातभक्तिमय वातावरणात आणि गणरायाच्या निरोपाच्या हृदयस्पर्शी क्षणात सहभागी होऊन या पर्यटकांनी महाराष्ट्राच्या आतिथ्यशील संस्कृतीचा अनुभव घेतला. हा अनुभव त्यांच्या मनात आयुष्यभर कोरला जाईल.


परदेशी पर्यटकांच्या मनात रुजली महाराष्ट्राची संस्कृती

 परदेशी पर्यटकांच्या मनात रुजली महाराष्ट्राची संस्कृती

या उत्सवाचे साक्षीदार ठरलेल्या एका परदेशी पर्यटकाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलेहा सोहळा म्हणजे केवळ उत्सव नाहीतर श्रद्धाएकता आणि आनंदाचा संगम आहे. लाखो लोक एकाच स्वरात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करताना पाहून माझे मन थक्क झाले. अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळले. भारतात येऊन हा अनुभव घेणे म्हणजे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. अनेक पर्यटकांनी गणरायाच्या मनमोहक मूर्तींसोबत छायाचित्रे काढली आणि या अविस्मरणीय क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या पर्यटकांना गणेशोत्सवाची ऐतिहासिकसांस्कृतिक आणि आध्यात्मिक महती समजावून सांगितली.

Featured post

Lakshvedhi