Tuesday, 1 July 2025

Appointment of a Panel of Presiding Officers for the Assembly

 Appointment of a Panel of Presiding Officers for the Assembly

 

Mumbai, Date:- June 30: For the Monsoon Session of the Legislature, Assembly Speaker Adv. Rahul Narwekar has announced the appointment of a panel of presiding officers for the Assembly.

MLAs Shri Amit Satam, Shri Kishore Appa Patil, Shrimati Sulabha Khodke, Shri Chetan Tupe, Shri Nitin Deshmukh, Shri Sanjay Meshram, Shri Abhijeet Patil, Shri Sameer Kunawar, and Shri Samadhan Avtade have been appointed to the panel of presiding officers.

-

दिलखुलास' कार्यक्रमात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मुलाखत

 

मुंबईदि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात 'आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले नियोजन व सोयी-सुविधाया विषयासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 2 आणि गुरूवार दि. 3 जुलै 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक कृपा कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाची अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला आणि सोयी-सुविधांना प्राधान्य देत राज्य शासनाने संपूर्ण नियोजन केले आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवापाणीपुरवठावाहतूक व्यवस्थापनआपत्कालीन यंत्रणास्वच्छता आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला असूनस्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यंदा वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री निवारा सुविधाही नवी संकल्पना राबवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने 'दिलखुलासकार्यक्रमात वारी मार्गावरील वैद्यकीय पथके, ॲम्ब्युलन्स सेवाआपत्कालीन प्रतिसाद पथकेस्वच्छतागृहेजल व्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी दिली आहे.

०००

विधान परिषदेमध्ये दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली : सभापती प्रा.राम शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

 विधान परिषदेमध्ये दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली :

सभापती प्रा.राम शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

 

मुंबईदि. 30 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरविधान परिषद सदस्य अरुण काका भिमराव जगताप आणि डॉ.रामदास भगवानजी आंबटकर यांच्या निधनाबाबत सभापती प्रा.राम शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला.

सभापती प्रा.शिंदे यांनी शोकप्रस्तावात डॉ. जयंत नारळीकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. कोल्हापूर येथे जन्मलेले नारळीकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केल्यानंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विभागप्रमुख म्हणून 16 वर्षे कार्य करत संस्थेला जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नंतर पुण्यात इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर स्ट्रोनॉमी अँड स्ट्रोफिजिक्सची स्थापना करून संशोधन क्षेत्रात मोलाची भर घातली. पद्मभूषणपद्मविभूषणमहाराष्ट्र भूषण यांसारखे अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. विज्ञानाचा सामान्यांशी संबंध जोडण्याचा त्यांचा प्रयत्न विशेषत्वाने उल्लेखनीय होता. त्यांच्या विज्ञानकथांच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचे कार्य केले.

सभापती प्रा.शिंदे यांनी अरुणकाका जगताप यांचे सामाजिक योगदानही अधोरेखित केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील भेंडी गावचे रहिवासी असलेले जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधान परिषदेमध्ये दोन वेळा निवडून येईपर्यंतचा राजकीय प्रवास केला. समाजकार्यशिक्षण संस्थाक्रीडा संघटना यामधून त्यांचा जनतेशी घनिष्ठ संबंध राहिला. त्यांच्या निधनामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आप्तस्वकीय हरपल्याची भावना आहेअसे सभापती म्हणाले.

डॉ. रामदास आंबटकर यांचा जीवनप्रवास आणि कार्यकर्तृत्वाचा आढावाही सभागृहात मांडण्यात आला. वर्धा जिल्ह्यात जन्मलेले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून कार्यरत असलेले आंबटकर यांचा सहकारी संस्थांमध्ये मोठा सहभाग होता. ते 2018 मध्ये विधान परिषदेवर निवडून आले. विद्यार्थी चळवळीतील त्यांचा 20 वर्षांचा अनुभव आणि कार्यकर्तावृत्तीने केलेले काम आजच्या काळासाठी प्रेरणादायी आहेअसे सभापतींनी नमूद केले.

या तिन्ही व्यक्तिमत्त्वांचे योगदान स्मरणीय असून त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेलअसा विश्वास सभापतींनी यावेळी व्यक्त केला.


रस्ते, मेट्रो, सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मिती, कुंभमेळ्याचे नियोजन मागास घटक विकासासाठी 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 रस्तेमेट्रोसिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मितीकुंभमेळ्याचे नियोजन

मागास घटक विकासासाठी

57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 

मुंबईदि. 30 :- विधीमंडळाच्या जून 2025 च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्तेमेट्रोसिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठीसिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणीमहात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनासंजय गांधी निराधार अनुदान योजनामागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच दुर्बलवंचित समाजघटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांपैकी 19 हजार 183 कोटी 85 लाख रुपये अनिवार्य तर 34 हजार 661 कोटी 34 लाख रुपये कार्यक्रमांतर्गत आणि 3 हजार 664 कोटी 52 लाख रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत. स्थूल पुरवणी मागण्या 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 40 हजार  644 कोटी 69 लाख रुपयांचा आहे.

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक 11 हजार 42 कोटी 76 लाख रुपये हे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदानांसाठी खर्च होणार आहेत. 3 हजार 228 कोटी 38 लाख रुपये हे मेट्रो प्रकल्पमहापालिकानगरपालिकानगरपरिषदाजिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिभार परताव्यापोटीचे आहेत. राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोनसाठी 2 हजार 182 कोटी 69 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला विविध विषयांचा आढावा कामे जलद गतीने करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

 जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

कामे जलद गतीने करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

 

मुंबई दि. 30 :- जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उजनी प्रकल्पाच्या वितरण प्रणालीची स्वच्छता मोहीमसांगली जिल्ह्यातील वारणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे बांधकामकोल्हापूर जिल्ह्यातील दुधगंगा डावा कालवा अंतर्गत विविध विषय आणि सातारा जिल्ह्यातील मौजे माथणेवाडी पुनर्वसनतारळी धरण प्रकल्पांतर्गत बाधित मौजे सावरघर पुनर्वसन प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या रोख रक्कम बाबत आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात घेतलेल्या विविध बैठकांवेळी पर्यटनखनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाईमदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटीलआमदार सुभाष देशमुखआमदार अमल महाडिकमाजी आमदार शिवाजीराव नाईकजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उजनी प्रकल्पाच्या वितरण प्रणालीचा आढावा प्रसंगी मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेकालव्यांची वहन क्षमता वाढीसाठी कालवे स्वच्छ व दुरुस्त करावेत. जी कामे तातडीने करणे आवश्यक आहेत. त्या संदर्भात वेळीच कार्यवाही करावी.

सांगली जिल्ह्यातील वारणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम संदर्भात या भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर सांगली जिल्हाधिकारी यांनी तातडीने निर्णय द्यावा. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दुधगंगा डावा कालवा अंतर्गत विविध कामासंदर्भात विभागाने योग्य ती कार्यवाही करावीअशा सूचना जलसंपदा मंत्री  श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

पाटण विधानसभा मतदारसंघातील मौजे माथणेवाडी गावातील 46 खातेदार यांची खास बाब म्हणून पुनर्वसन आणि तारळी धरणप्रकल्पांतर्गत बाधित मौजे सावरघर पुनर्वसन काटेवाडी (ता.पाटणजि. सातारा) येथील प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या रोख रक्कमेच्या संदर्भात पुनर्वसन विभागाकडून अहवाल प्राप्त होताच  त्यावर कार्यवाही करावी अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. तर  या संदर्भातील अहवाल पुनर्वसन विभागाने तातडीने जलसंपदा विभागास पाठवावा, असे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा ‘ईव्ही’ कारमधून विधानभवनापर्यंत प्रवास प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी दिला प्रतिकात्मक संदेश

 पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा ‘ईव्ही’ कारमधून विधानभवनापर्यंत प्रवास

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी दिला प्रतिकात्मक संदेश

 

मुंबई, दि. 30 : विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानभवन परिसरात इलेक्ट्रिक वाहनाने प्रवेश केला. प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी प्रतिकात्मक संदेश देत त्यांनी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

   पर्यावरण मंत्री या नात्याने दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा मनोदय व्यक्त करत तशा सूचना त्यांनी काही दिवसांपूर्वी विभागाला दिल्या होत्यात्यानुसार विभागाकडून इलेक्ट्रिक कार त्यांना उपलब्ध झाली. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असल्याने याच ईव्ही कारमधून त्यांनी रामटेक शासकीय निवासस्थान ते विधानभवन असा प्रवास केलात्यांच्यासमवेत नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ या देखील होत्या.

प्रदूषणमुक्तीचा दिला प्रतिकात्मक संदेश

विधानभवनात आल्यानंतर यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्यापर्यावरण मंत्री या नात्याने प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास करत प्रतिकात्मक संदेश देत आहे. या वाहनाने दूरचा प्रवास करणे मला थोडे कठीण जाईल पण मुंबईत तरी ते शक्य होईलत्यामुळे ईव्ही कार वापरण्याचे मी ठरवले. अनेकांना माझं हेच आवाहन असेल की त्यांनी अशा वाहनांचा वापर करावा जेणेकरून वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास फार मोठी मदत होईल.

0000

रस्ते, मेट्रो, सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मिती, कुंभमेळ्याचे नियोजन मागास घटक विकासासाठी 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 रस्तेमेट्रोसिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मितीकुंभमेळ्याचे नियोजन

मागास घटक विकासासाठी

57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 

मुंबईदि. 30 :- विधीमंडळाच्या जून 2025 च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्तेमेट्रोसिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठीसिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणीमहात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनासंजय गांधी निराधार अनुदान योजनामागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच दुर्बलवंचित समाजघटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांपैकी 19 हजार 183 कोटी 85 लाख रुपये अनिवार्य तर 34 हजार 661 कोटी 34 लाख रुपये कार्यक्रमांतर्गत आणि 3 हजार 664 कोटी 52 लाख रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत. स्थूल पुरवणी मागण्या 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 40 हजार  644 कोटी 69 लाख रुपयांचा आहे.

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक 11 हजार 42 कोटी 76 लाख रुपये हे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदानांसाठी खर्च होणार आहेत. 3 हजार 228 कोटी 38 लाख रुपये हे मेट्रो प्रकल्पमहापालिकानगरपालिकानगरपरिषदाजिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिभार परताव्यापोटीचे आहेत. राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोनसाठी 2 हजार 182 कोटी 69 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi