Thursday, 20 March 2025

पीक विमा योजना : विमा कंपनीच्या दायित्वात दिरंगाई आढळल्यास कारवाई करणार

 पीक विमा योजना : विमा कंपनीच्या दायित्वात

दिरंगाई आढळल्यास  कारवाई करणार

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

 

मुंबई दि. २०:-  पीक विमा योजनेतील विमा कंपनीच्या दायित्वात दिरंगाई आढळल्यास संबधित विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईलअसे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

सदस्य श्वेता महाले यांनी खरीप हंगाम २०२३-२४ मधील  खरीप  व रब्बी हंगामातील पीक विमा बाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. 

मंत्री कोकाटे यांनी सांगितले

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ही योजना राज्यात खरीप हंगाम २०१६ पासून राबविण्यात येते.  बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत करण्यात आली आहे. बुलढाणा व चिखली तालुक्यात खरीप २०२३ मध्ये १.४५ लाख विमा अर्जद्वारे शेतकऱ्याने १.२६ लाख हेक्टर  क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. १८ मार्च २०२५ अखेर २६ हजार ४८८ विमा अर्ज २१.१७ कोटी नुकसान भरपाई मंजूर झाले त्यापैकी १६  हजार ४५७ विमा अर्ज ८.८० कोटी नुकसान भरपाई वाटप झाले आहे. उर्वरित १० हजार ३१ विमा अर्जाची रक्कम १२.३७ कोटी नुकसान भरपाई प्रलंबित असल्याचेही कृषी मंत्री श्री.कोकाटे यांनी सांगितले.

बुलढाणा व चिखली तालुक्यात रब्बी २०२३- २४ मध्ये ८६ हजार विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी ७८ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. १८ मार्च २०२५ अखेर ६४ हजार १८६ विमा अर्जना ५०.७६ कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी १२ हजार ४०७  विमा अर्जांना २६.४८ कोटी नुकसान भरपाई वाटप झाली.  उर्वरित ५१ हजार ७७९ विमा अर्जांची रक्कम २४.२८ कोटी नुकसान भरपाई प्रलंबित आहे. 

मंत्री श्री.कोकाटे यांनी सांगितलेखरीप २०२३ व रब्बी २०२३-२४ जिल्हा समूह क्रमांक ७ (बुलढाणा जिल्ह्यासह वाशिम, सांगली व नंदुरबार जिल्हा) मध्ये पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा विमा हप्त्याच्या ११० टक्केच्या वर गेली असून  राज्य शासनाने ११० टक्केच्या वरील नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीस निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मंगरूळ येथील वृक्षतोड आणि उत्खनन प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून चौकशी

 मंगरूळ येथील वृक्षतोड आणि उत्खनन प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून चौकशी

– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. २० : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील गट क्रमांक ४१ ते ४९ मधील वनक्षेत्रात अंदाजे ८०० ते ९०० वृक्षतोड आणि ४० ते ४५ हजार ब्रास  गौण खनिज उत्खनन झाल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. या संदर्भात विभागीय आयुक्तांच्या मार्फत सखोल चौकशी करण्यात येईलअसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुनील शेळके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती

मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले कीया प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असूनसंबंधित क्षेत्राचे शासनाच्या वतीने पुन्हा सर्वेक्षण करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जातील. तसेचराज्यातील सर्व उत्खनन प्रकरणांची तपासणी नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात येणार असून पुढील तीन महिन्यांत संपूर्ण अहवाल तयार करण्यात येईलअसेही मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

भिवंडी पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण विभागासाठी स्वतंत्र शिधावाटप कार्यालय प्रस्तावित

 भिवंडी पूर्वपश्चिम आणि ग्रामीण विभागासाठी

स्वतंत्र शिधावाटप कार्यालय प्रस्तावित

- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईदि. २० : भिवंडी पश्चिम शिधावाटप कार्यालयाव्यतिरिक्त भिवंडी पूर्वभिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण विभागासाठी स्वतंत्र शिधावाटप कार्यालये प्रस्तावित असूनलवकरच ही कार्यालये सुरू करण्यात येतील. यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईलअशी माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य रईस शेख यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीशिधापत्रिकेसाठी असलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषात बदल करण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पत्र पाठवून विनंती करण्यात येईल. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्यात आले असूनसर्व रास्तभाव दुकानांमध्ये फोर-जी (४-G) तंत्रज्ञानासह आयरिस स्कॅनर असलेली ई-पॉस मशीन बसविण्यात आली आहेत. तसेचशिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली आणि आधार प्रमाणित सार्वजनिक वितरण प्रणालींचे राष्ट्रीय सूचना केंद्रच्या क्लाउडवर स्थलांतरण करण्याची प्रक्रिया डिसेंबर 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी येत होत्या. आता या अडचणी दूर करण्यात आल्या असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

राज्यातील डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत सरासरी 91 टक्के लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आलेतर भिवंडी शहरातील 37 शिधावाटप कार्यालयांद्वारे 95 टक्के लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. भिवंडी क्षेत्रातील शिधावाटप दुकानदारांना डिसेंबर 2024 पर्यंतचे कमिशन वितरित करण्यात आले असूनजानेवारी आणि फेब्रुवारी 2025 मधील कमिशनची प्रक्रिया वाटप करण्यात येत आहे. स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना अन्नधान्य वेळेत वाटप व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहेअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

0000

चांदोली व्याघ्र प्रकल्पातून गाव वगळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार

 चांदोली व्याघ्र प्रकल्पातून गाव वगळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार

- वनमंत्री गणेश नाईक

            मुंबईदि. २० : सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. या व्याघ्र प्रकल्पात असलेल्या खुंदलापूर, धनगरवाडी या गावांना व्याघ्र प्रकल्पातून वगळण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईलअसे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य सत्यजित देशमुख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर यांनीही सहभाग घेतला.

लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मंत्री श्री. नाईक म्हणालेवन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार चांदोली अभयारण्य घोषित करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय उद्यान आणि तिसऱ्या टप्प्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाले आहे. व्याघ्र प्रकल्पाची सीमा बदलण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. या व्याघ्र प्रकल्पातील गावे वगळण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाची मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर हा प्रस्ताव मान्यतेसाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठविला जाईल. शासन याबाबत पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेईल.

जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होत नाहीतोपर्यंत चांदोली व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या धनगरवाडी येथील नागरिकांच्या गुराढोरांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. तसेच अमानवीय वागणूक मिळणार नाहीयाची दक्षता घेण्यात येईल. त्या पद्धतीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. धनगरवाड्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावण्यात येईलअसेही वनमंत्री श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.

0000

गो हत्येचा वारंवार गुन्हा करणाऱ्यांवर कारवाई करणार

 गो हत्येचा वारंवार गुन्हा करणाऱ्यांवर कारवाई करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २० : कायद्यानुसार गो हत्या करणे गुन्हा आहे. मात्र गो हत्तेचा वारंवार गुन्हा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार यापुढे कारवाई करण्यात येईलअसा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला.

श्रीगोंदा येथील कायदा सुव्यवस्थेच्या बाबत सदस्य संग्राम जगताप यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणालेअहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे २ नोव्हेंबर २२४ रोजी दोन समाजामध्ये वाद झाला. या वादाचे नंतर मारहाणीत रूपांतर झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच मारहाणीत जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने अहिल्यानगर येथील खागी रुग्णालयात दाखल केलेल्या एका इसमाचा यात मृत्यू झाला. पोलिसांनी यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई केल्याचे दिसून येत नाही.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हेगाराला अटकही केली. मात्र न्यायालयातून जामिनावर त्याची सुटका झाली. श्रीगोंदा शहरातील प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात येन कोणालाही सोडण्यात येणार नाहीअसेही गृह राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.

ट्रेड सर्टिफिकेट' प्राप्त न केलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवा

 'ट्रेड सर्टिफिकेटप्राप्त न केलेल्या वाहनांची 

विशेष तपासणी मोहीम राबवा

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १९ : केंद्रीय मोटार वाहन कायदा व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक आणि उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. केद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनांच्या विक्रीव्यापार किवा प्रदर्शनामध्ये गुंतलेले प्रत्येक विशिष्ट प्रतिष्ठानशोरूम किंवा डिलरशीप संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त न केलेले वाहन वितरक व उत्पादक यांनी अशी वाहने विकल्यास ते मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९२ नुसार दंडास पात्र असणार आहे. अशा वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

प्रितपाल सिंग अँड असोसिएटगुरुग्राम यांनी मेसर्स ओला इलेक्ट्रीक मोबालिटी लिमिटेड या कंपनीने एकच ट्रेड सर्टिफिकेट घेऊन राज्यातील विविध ठिकाणी शोरूम व स्टोअर कम सर्व्हिस सेंटरउभारण्यात आले असल्याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीबाबत तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

मंत्री सरनाईक यांच्या आदेशानुसार विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्यपश्चिमपूर्व)बोरीवली व पुणे या कार्यालयाच्या अंतर्गत ट्रेड सर्टिफिकेटबाबत ३६ वाहन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून ३४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ई-रक्तकोषद्वारे गरजू रुग्णांना मिळणार रक्त उपलब्धतेची माहितीwww.eraktkosh.mohfw.gov.in

 ई-रक्तकोषद्वारे गरजू रुग्णांना मिळणार रक्त उपलब्धतेची माहिती

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

            मुंबईदि. २० : राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठारक्तदान शिबीरे तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावीयासाठी केंद्र शासनाने www.eraktkosh.mohfw.gov.in हे संकेतस्थळ विकसित केले असून या पोर्टलवर सर्व रक्त केंद्रामार्फत माहिती अद्ययावत करण्यात येते. त्यामुळे ई-रक्तकोष पोर्टलच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त उपलब्धतेची माहिती वेळेत मिळणार आहे. गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावाअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

             मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्य रक्त संक्रमण परिषद संचलित जे. जे. महानगर रक्तकेंद्र यांच्यावतीने स्वैच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यावेळी आरोग्य मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन आंबाडेकरराज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक महेंद्र केंद्रेसर जे.जे. महानगर रक्तकेंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. हितेश पगारे यांच्यासह संबंधित डॉक्टर्स व रक्तदाते उपस्थित होते.

 सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेरक्ताशी निगडीत थॅलेसिमियाहिमोफिलीयासिकलसेल व इतर आजारांच्या गरजू रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागू नये यासाठी रक्त उपलब्धतेविषयक अनुषंगिक माहिती www.eraktkosh.mohfw.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आणि ई-रक्तकोष संकेतस्थळाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत व तात्काळ रक्त उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होणार आहे. सर्व नागरिकांनी या ई-रक्तकोष या संकेतस्थळाचा उपयोग करून जास्तीत जास्त रुग्णांना मोफत आणि तात्काळ रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावेअसे आवाहन आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.

राज्यामध्ये शासकीयनिमशासकीयसामाजिक संस्थाकार्पोरेशनखासगी अशा एकूण 395 रक्तपेढ्यांचे/रक्तकेंद्र आहेत. वारंवार रक्ताची गरज असणारे थॅलेसेमियासिकलसेलहिमोफिलियाकॅन्सर या रुग्णांसोबतच मोठ्या शस्त्रक्रियांच्या वेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील वेळेत रक्त उपलब्ध करून देणे सोयीचे होणार आहे. तसेच या संकेतस्थळाद्वारे रक्तदात्यांना जवळचे रक्त केंद्र रक्तपेढीरक्त शिबिराची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. राज्यात सुरक्षित रक्ताचा पुरेसा साठा योग्य दरात उपलब्ध होणे यासाठी राज्य रक्त संकलन परिषद नियमित कार्यरत आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयेसामाजिक संस्थाकार्पोरेट ऑफिसेस इत्यादींच्या माध्यमातून तसेच वारंवार रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात येते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान’ या संकल्पनेतून नागरिकांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi