Thursday, 16 January 2025

महाराष्ट्र स्टार्टअप्सची राजधानी :

 महाराष्ट्र स्टार्टअप्सची राजधानी : मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कौशल्य विकास विभागाला गती दिली. राज्यातील स्टार्टअप्सला जगात पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस प्रयत्नशील आहेत. जगात देशाला नंबर एक बनविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. सर्व स्टार्टअप्स देशाला पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

राज्यात सर्वाधिक महिला स्टार्टअप्स : फाल्गुनी नायर

‘नायका’च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर म्हणाल्या की, महिलांनी उद्योगात आघाडीवर येण्यासाठी शासकीय नियमांचे कोणतेही अडथळे नाहीत. उद्योगाच्या अनेक संधी शासनामार्फत उपलब्ध आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात महिला सुरक्षित असल्याने महिलांचे सक्षमीकरण होत आहे.महाराष्ट्र हे स्टार्टअप्स कॅपिटल असून त्याचा राज्यातील महिलांनी नक्की लाभ घ्यावा, असेही सांगितले.

यावेळी डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स आयटीआय गोवंडीचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप्स विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील यांनी आभार मानले.

कार्यक्रमास कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईकव्यवस्थापक अमित कोठावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन अवाना दुबाशराखी तांबट यांनी केले.

000

स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण देशातील सर्वाधिक आधुनिक ठरेल

 स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण 

देशातील सर्वाधिक आधुनिक ठरेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिडबी (SIDBI) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

 

मुंबईदि. 16 : काळाची गरज ओळखून स्टार्टअप्स धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला असून हे देशातील आधुनिक धोरण ठरणार आहे. या माध्यमातून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच सिडबी (स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तर प्रत्येक प्रादेशिक  विभागासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बांद्रा-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशनएलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation,Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीप प्रज्वलन झाले.

कार्यक्रमात कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाकौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदीपकुमार डांगेव्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशीमेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवालाअपग्रेड अँड स्वदेस फाऊंडेशनचे सहसंस्थापक रॉनी स्क्रूवालानायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर, स्ट्राइड व्हेंचर्स आणि स्ट्राइडवनचे संस्थापक इशप्रीत सिंग गांधी, आयआयटीचे माजी विद्यार्थी कल्याण चक्रवर्तीगो इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्तामहाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञानकृषीसेवा क्षेत्रऔषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील एक हजार स्टार्टअप्स या कार्यक्रमात उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीनवं उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप्स सुरू झाले तेव्हा 471 स्टार्टअप्स होते, आज देशात एक लाख 57 हजार स्टार्टअप्स झाले आहेत. राष्ट्रीय स्टार्टअप्स दिनानिमित्त अभिमानाने सांगावेसे वाटते की, महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप्स क्रांतीत  सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात 26 हजार स्टार्टअप्स आहेत. देशात सर्वात जास्त महिला संचालक असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.  स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे.

            उद्योजकदूरदर्शी गुंतवणूकदार, धोरणकर्तेइन्क्युबेटर्सविद्यापीठे  हे उद्योग क्षेत्रातील बदलाचे प्रणेते आहेत. ‘इज ऑफ डूईंग’ बिझनेसमुळे उद्योग कमी वेळात सुरू करण्यामध्ये पारदर्शकता आली आहे. गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिला आहे. भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासना बरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे.  भांडवली सहभागाच्या दृष्टीने मुंबई आघाडीवर असूनपुणे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र  आहे. आपली टियर-२ आणि टियर-३ शहरे महाराष्ट्राच्या विकासात मोठा हातभार लावत आहेत.  नाशिकनागपूरछत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर ही शहरे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहेत आणि इकोसिस्टम निर्माण करतात, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

         विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स महाराष्ट्राच्या नवकल्पना स्टार्टअप्सला बळकटीकरण देणाऱ्या संस्था  आहेत. ग्रामीण भागातील नवकल्पना असलेल्या तरुणांचा उद्योगात सहभाग वाढवणार असून,   उद्योजकांना मार्गदर्शननेटवर्किंगकायदेशीर सहाय्य इत्यादी सेवा देणाऱ्या इन्क्युबेटर्सना स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. शासकीय आणि खासगी विद्यापीठे या भविष्यातील स्टार्टअप्सना बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे रोजगार निर्माण करणारे घटक असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

‘ए आय’ स्टार्टअप्सचे सक्षमीकरण करून उत्कृष्टतेचे केंद्र बनतील. एआय हे तंत्रज्ञानातील भविष्य असून स्टार्टअप्ससाठी मोठे योगदान देणारे ठरणार आहे. यामुळे केवळ उद्योगाच्या संधी नाही तर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. राज्याला स्टार्टअप्समध्ये आघाडीवर आणण्यासाठी राज्य शासनासोबत काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित उद्योजकांना केले.

महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे

,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या १८ वर्षे मुदतीच्या २,५०० कोटींच्या  (‘ ७.१४ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे ,२०४३ ’ ) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२१ जानेवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २१ जानेवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २२ जानेवारी२०२५ रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १८ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ८ जानेवारी२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ जानेवारी२०४३ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.१४ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जुलै ८ आणि जानेवारी ८  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे २,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे

,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या २,५०० कोटींच्या  (‘ ७.११ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे२०३८’) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२१ जानेवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २१ जानेवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २२ जानेवारी२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ८ जानेवारी२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ जानेवारी२०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.११ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जुलै ८ आणि जानेवारी ८  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

-li.आनंदी°पहाट.il-* 🌻 *संक्रांत सणाच्या आनंदाची*

 🌹⚜️❣️🔆🌅🔆❣️⚜️🌹

        

     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                  

       *संक्रांत सणाच्या आनंदाची*


🌹⚜️🌸🔆🌞🔆🌸⚜️🌹

        

        *भारतीय संस्कृती सणामुळे समाजात कुणालाही एकटेपण जाणवत नाही. कुटुंबातील नातेवाईक आणि  समाजातील सर्वजण यांच्यात संवाद राहतो.. आपुलकीचे नाते जुळते.*

        *असाच गोडव्याचा सण म्हणजे संक्रांत. या सणाला शेतकरीवर्ग आरोग्यदायी आहार पुरवतो. संक्रांतीचे हळदीकुंकू पर्व.. कुंकू लावण्याचे फायदे सर्वश्रुत आहेत. हे पर्व म्हणजे महिलावर्गाला पारंपरिक लुगडी.. शालू.. पैठण्या.. नवनवीन साड्या नेसण्याची, दागदागिने.. गजरे माळून नटण्याची, कलागुण प्रदर्शनाची पर्वणीच.*

        *नवविवाहितेचा पहिल्या वर्षी माहेरी.. सासरी संक्रांतसण किती उत्साहात साजरा करावा याची आई-सासू यांच्यात चढाओढ असते. हळदीकुंकू कार्यक्रमात जेष्ठांकडून कौतुक होते.. आशीर्वाद मिळतात.*

        *तिळगुळ वडी.. लाडू माझ्या मुलीने.. माझ्या सुनेने स्वतः तयार केलेत हे सांगताना अभिमान वाटतो. तर आजही काही मुली हलवा.. हलव्याचे दागिने स्वतः करतात. मग हळदीकुंकू कार्यक्रमात मुलगी-जावई हे हलव्याचे दागिने घालून वावरतात.*

        *तर घरातील बालकांनाही हलव्याचे दागिने घालून राधा कृष्णाप्रमाणे सजवले जातेय. त्यांचे हे रुप बघणे सर्वांनाच सुखावते. बालकांचे बोरं, ऊस, हरबरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, गोळ्या बिस्कीट एकत्रित बाळाच्या डोक्यावर टाकत बोरनहाण केले जाते. बच्चे कंपनी ते गोळा करत आनंद लुटतात. या सर्वांचे फोटो जन्मभर मर्मबंध ठेव ठरतात.*

        *हलवा तयार करणे हलव्याचे दागिने बनविणे ही अत्यंत किचकट.. अवघड कला. चूलीवर किंवा शेगडीवरच्या भांड्यात पांढरे तीळ.. वर साखरेचा पाक घालून काटेरी हलवा केला जातो. असा हलवा करणे.. त्याचे दागिने करणे म्हणजे संयम.. चिकाटी.. एकाग्रतेची परीक्षाच. अभ्यासक्रमात नसलेले हे धडे.. संस्कार संक्रांत हळदीकुंकू निमित्याने प्राप्त होतात.*

        *आजही हलवा.. हलव्याचे नाजूक.. सुबक.. सुंदर दागिने तयार करण्याची अवघड कला गावोगाव जोपासली जात आहे. सोन्याच्या दागिन्या एवढेच संक्राती हळदीकुंकवात त्याचे महत्त्व.*

        *कुंकू लावण्याचे भाग्य मिळाल्याचा.. हे सुख प्राप्त झाल्याचा आनंद नवविवाहीतेला होणारच. तिला ही पुर्वजन्म पुण्याई आणि अंबामातेची कृपाच वाटतेय, म्हणूनच हे संक्रांतीचे हळदीकुंकू थाटात संपन्न होत आहे.*

            

⚜️🌸🥀👁️❣️👁️🥀🌸⚜️


  *माझ्या कपाळीचं कुकु*

  *कवतिकानं किती बाई निरखू*

  *जीव भरंना, भरंना, भरंना*

  *खरं वाटंना, वाटंना, वाटंना*


  *कुण्या जल्मीची पावली पुण्याई*

  *झाली परसन आई अंबाबाई*

  *चिरी कुकवाची लखलख निरखू*


  *सुर्व्या सांजचा, चांद पुनवंचा*

  *सर्गाची गं सोभा, दारी आनंद हुभा*

  *चिरी कुकवाची लखलख निरखू*


  *टाकीन वोवाळून हिरं,*

  *मोती, सोनं*

  *पिरती मोलाचं कुकवाचं लेनं*

  *चिरी कुकवाची लखलख निरखू*


🌺🎶🥀👁️❣️👁️🥀🎶🌺


  *गीत : योगेश*  ✍

  *संगीत : आनंदघन*

  *स्वर : लता मंगेशकर*

  *चित्रपट : तांबडी माती*

  *(१९६९)*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१६.०१.२०२५-*


🌻🌸☘🎼🌻🎼☘🌸🌻

शेत वहीवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करा

 शेत वहीवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता करण्याबाबत

 मार्गदर्शक सूचना जाहीर करा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. १६ :- यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत तहसिलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यातअशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेत रस्त्याचा समावेश बंधनकारक करणे व शेत रस्त्यांच्या नोंदणी ७/१२ इतर हक्कात करण्याबाबत महसूल मंत्री यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस वित्त नियोजनकृषीमदत व पुनर्वसनविधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वालआमदार अभिमन्यू पवारमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारसहसचिव अजित देशमुख उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले कीशासनाने शेत रस्त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही होतात. शेत वहिवाट रस्त्याची  तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. त्यानंतर  त्यावर थेट अपील उच्च न्यायालयात केले जाते. थेट अपील होण्यापूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता यावे यासाठी एक स्टेप मधी असणे आवश्यक असून त्यानुसार नियमात सुधारणा करण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

वेंगुर्ला गवळीवाडा येथील रहिवाशांच्या जमिनीचा प्रस्ताव करा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेवू

 वेंगुर्ला गवळीवाडा येथील रहिवाशांच्या जमिनीचा प्रस्ताव करा

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेवू

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. १६ :-  वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील कॅम्प गवळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांना प्रती कुटुंब दीड हजार स्क्वे. फूट जमीन विनामूल्य देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावाअशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील कॅम्प गवळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांच्या कब्जा भोग्यातील जमिनीसंदर्भात महसूलमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस आमदार दीपक केसरकरमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारसहसचिव अजित देशमुख उपस्थित होते तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले कीमौजे वेंगुर्ला येथील शासकीय जमिनीमध्ये १९०५ पूर्वीपासून गवळ्यांची वसाहत आहे. गवळीवाडा येथील रहिवाशी ब्रिटीशकालापासून या जागेचा वापर करीत आहेत.  जमिनीवर अतिक्रमण केले नसलेबाबत व ब्रिटीशांनी सेवेकरिता वास्तव्यासाठी विनामूल्य जमिनी दिल्या असल्यानेवहिवटीखाली असणारी घरे व इतर जमिनी विनामूल्य मिळण्याची मागणी संबधित रहिवाशांनी केली आहे. त्यानुसार गवळीवाडा येथील रहिवाशांना  प्रती कुटुंब दीड हजार स्क्वेअर फुट जमीन विनामूल्य देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात  सादर करा. ज्या रहिवाशांच्या ताब्यात  दीड हजार स्क्वे. फुट पेक्षा अधिक जमीन आहे याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी 1980 च्या रेडीरेकनर दरानुसार संबंधितांकडून रक्कम घेण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावाअशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या.

००००

Featured post

Lakshvedhi