Monday, 20 November 2023

कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज २४ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 कुणबीमराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज

२४ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

            मुंबई दि. २० : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबीमराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध दस्ताऐवज/ पुरावे आहेत त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष मोहिमेदरम्यान २१ ते २४ नाव्हेंबर या कालावधीत सादर करण्याचे आवाहन मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) कल्याण पांढरे यांनी केले आहे.

            मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे प्राप्त निर्देशानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे १९४८ पूर्वीचे तसेच १९४८ ते १३ ऑक्टोबर १९६७ या कालावधीतील कुणबीमराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले पुरावेवंशावळशैक्षणिक व महसुली पुरावेजुन्या सनदाराष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे उपलब्ध असल्यास अशा नागरिकांकडून याबाबतचे उपलब्ध अभिलेख मुंबई जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावरील नियोजन भवन येथे २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत विशेष कक्षात स्वीकारले जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्री. पांढरे यांनी दिली आहे. 

            अधिक माहितीसाठी ०२२-२२६६४२३८ किंवा gadmumbaicity@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधवा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

बाल स्नेही” पुरस्कारांचे २२ नोव्हेंबर रोजी होणार वितरण - राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन

 बाल स्नेही पुरस्कारांचे २२ नोव्हेंबर रोजी होणार वितरण

- राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा

 

            मुंबईदि.२० : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगमहिला व बाल विकास विभागयुनिसेफकम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT), होप फोर चिल्ड्रन इंडियापुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी 'बाल स्नेही" पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

            हा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहनरिमन पॉइंटमुंबई येथे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे उपस्थित राहणार आहेत.

             राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हा राज्यस्तरीय बाल हक्क संरक्षण अधिनियमान्वये स्थापित आयोग आहे. बाल हक्काच्या संरक्षणाची जपणूकप्रचार व प्रसार हा आयोगाचा उद्देश आहे. राज्यात बालकांचा सर्वांगीण विकासबाल हक्क संरक्षणत्यांची सुरक्षाआरोग्य इ. अनेक महत्त्वपूर्ण विषयावर जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हापरिषदजिल्हा महिला व बाल विकास अधिकारीबाल संरक्षण कक्षविशेष बाल पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारीबालगृहबाल कल्याण समिती इ. प्रशासकीय यंत्रणा व संस्था या सकारात्मक पद्धतीने मोलाचे कार्य पार पाडत आहेतअशा व्यक्ती व संस्थांना "बाल स्नेही" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

             राज्यात अशाप्रकारे बालकांसाठी काम करणाऱ्या सर्व यंत्रणांकरिता बालस्नेही पुरस्कार सोहळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यातील विविध बालगृहांमध्ये वास्तव्य करून शिक्षण घेतलेले व सद्य:स्थितीत विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या एकूण ७५ तरुण - तरुणींचा सत्कार करण्यात येणार आहे.

            या पत्रकार परिषदेला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (ठाणे) महेंद्र गायकवाड, मुंबई शहरचे बी. एच. नागरगोजे उपस्थित होते.

००००

बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे 'बालधोरण' आखणार

 बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे 'बालधोरण' आखणार

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. २० : चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी करणार तसेच बालकांच्या हक्क आणि सुरक्षेवर भर देणारे 'बाल धोरणही राज्यात तयार करण्यात येत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            कुलाबा येथील बेस्ट भवन येथे 'अर्पण'  स्वयंसेवी संस्था आणि बेस्टच्या  माध्यमातून १८ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत 'बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियानराबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगलअर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया उपस्थित होते.

            मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आपल्या रोजच्या प्रवासादरम्यान बालकांना येणारे वाईट अनुभव कसे टाळता येवू शकतात यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था हा जनजागृतीपर चांगला उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमातून लहान मुलांना चांगले आणि वाईट स्पर्श याची माहिती द्यावी. बेस्ट बरोबर परिवहन विभाग, शिक्षण विभागामार्फत बालकांचे हक्क आणि सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवावे. बालकांना लहानपणापासूनच लैंगिक शिक्षणासंदर्भात माहिती झालीत्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर उद्याची चांगली पिढी निर्माण होऊ शकेल. आम्ही नागरिकांसाठी मुंबईची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत. हा उपक्रम म्हणजे आमच्या मुलांचे सुरक्षित भविष्य संरक्षित करण्याच्या आमच्या सामूहिक बांधिलकीची साक्ष आहे असेही मंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.

             महाव्यवस्थापक विजय सिंगल म्हणाले की, बेस्ट बसमधील प्रवास सर्वांसाठीविशेषतः आमच्या सर्वात छोट्या प्रवाश्यांसाठी सुरक्षित अनुभव देण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. अर्पण सोबतआम्ही जागरूकता वाढवण्यासाठीकर्मचाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी आणि शहरातील मुलांच्या कल्याणासाठी योगदान देण्यासाठी  काम करत राहू अशी ग्वाही श्री. सिंगल यांनी दिली."

            अर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया यांनी बेस्टच्या  माध्यमातून 18 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियानात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.

            यावेळी बेस्टच्या बसेसमधून लहान मुलांच्या सुरक्षा आणि अत्याचार जनजागृतीपर पोस्टरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

००००

गोपाष्टमी सोमवार 20 नवम्बर 2023 ? गौ माता धरती की सबसे बड़ी वैद्यराज है।

 ।।श्रीगणेशाय नमः।।


गोपाष्टमी सोमवार 20 नवम्बर 2023 ?


गौ माता धरती की सबसे बड़ी वैद्यराज है।

भारतीय संस्कृति में गौमाता की सेवा सबसे उत्तम सेवा मानी गयी है, श्रीकृष्ण गौ सेवा को सर्व प्रिय मानते हैं।


शुद्ध भारतीय नस्ल की गाय की रीढ़ में सूर्यकेतु नाम की एक विशेष नाड़ी होती है जब इस नाड़ी पर सूर्य की किरणे पड़ती हैं तो स्वर्ण के सूक्ष्म कणों का निर्माण करती हैं, इसीलिए गाय के दूध, मक्खन और घी में पीलापन रहता है, यही पीलापन अमृत कहलाता है और मानव शरीर में उपस्थित विष को नष्ट करता है।


गाय को सहलाने वालों के कई असाध्य रोग मिट जाते हैं क्योंकि गाय के रोमकोपों से सतत एक विशेष ऊर्जा निकलती है।


गाय की पूछ के झाड़ने से बच्चों का ऊपरी हवा एवं नजर से बचाव होता है।


गौमूत्र एवं गोझरण के फायदे तो अनंत हैं, इसके सेवन से केंसर व मधुमेह के कीटाणु नष्ट होते हैं।


गाय के गोबर से लीपा पोता हुआ घर जहाँ सात्विक होता है वहीं इससे बनी गौ-चन्दन जलाने से वातावरण पवित्र होता है इसीलिए गाय को पृथ्वी पर सबसे बड़ा वैद्यराज माना गया है, सत्पुरुषों का कहना है कि गाय की सेवा करने से गाय का नहीं बल्कि सेवा करनेवालों का भला अधिक होता है।

कही उजला तो कही अंधेरा

 


पाहुणा बंगल्यात आलाय ग, बघून जीव घाबरला ग

 बिबट्या वाघाला बेडरूम मधुन पकडले पहा नाशिक मधे डॉक्टर अहिरे यांच्या घरात -- स्वःता जॉगिंगला गेले होते आणि दरवाजा उघडा राहीला आणि एक पाहूणा थेट बेड रूम मधे वॉर्डरोब वरती


गरिबी म्हणजे काय ❓*

 *🌺अत्त दिप भव 🌺*                --------------------

*गरिबी म्हणजे काय ❓*              

*माणूस ज्या कुटुंबांत जन्म घेतो त्या कुटुंबाप्रमाणे त्याला जात धर्म,आर्थिक परिस्थिति राहणीमान,वातावरण प्राप्त होत असतं.जसा तो मोठा होत जातो तसा जीवनाचा अर्थ समजु लागतो गरिब कुटुंबांत जन्म झाला म्हणून तो गरिबच राहिल असे नाही गरिब म्हणजे आर्थिक परिस्थिति कमकुवत.पण शिक्षण,कष्ट,जिज्ञासा, हिम्मत,साहस,कर्तव्य  जबाबदारी स्विकारुन गरिबीवर मात करता येते  आपले जे क्षेत्र असेल त्यात लक्षपूर्वक मेहनत करुन आर्थिक परिस्थिति सुधारु शकते.फक्त मनात निश्चय पाहिजे. काही न करता नशिबावर अवलंबुन राहता कामा नये नशिबाला दोष देण्यापेक्षा योग्यवेळी कर्म करायला पाहिजे अन्यथा गरिबी माजेल.दुसऱ्याच्या श्रीमंतीकडे बघून जळण्यापेक्षा स्वत:ची काया झिजवली तरच मंजिल प्राप्त होईल.गरिब असावे पण लाचार होऊन जीवन जगू नये स्वावलंबी,स्वच्छ,टापटिप जीवन जगले तरच समाजात सन्मानाने राहता येईल अन्यथा जनावरात आणि माणसांत काहीच फरक राहणार नाही म्हणून स्वतः आपलं आयुष्य घडवायचे सजवायचे मस्त आनंदी जीवन जगायचं.✒️*            --------------------

*🌺सुंदर दिवसाच्या               मंगलमय  शुभेच्छा 🌺*

Featured post

Lakshvedhi