Friday, 3 November 2023

धानाची तातडीने उचल करीत शेतकऱ्यांना देय असलेले पैसे तत्काळ अदा करावेत

 धानाची तातडीने उचल करीत शेतकऱ्यांना

देय असलेले पैसे तत्काळ अदा करावेत

- मंत्री छगन भुजबळ

 

            मुंबईदि. 1 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय असलेले चुकारे विहित मुदतीत अदा करण्यात यावेत. तसेच धानाची घट होऊ नये याकरितातत्काळ धानाची उचल करण्याचे निर्देश अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

            शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी विषयी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावितमंत्री धर्मरावबाबा आत्रामविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारखासदार प्रफुल्ल  पटेलखा.सुनील मेंढेखा.अशोक नेते आमदार सर्वश्री नाना पटोलेआशिष जयस्वालविनोद अग्रवालविजय रहांगडालेराजू पारवेराजू कारेमोरेमनोहर चंद्रिकापुरेडॉ. देवराव होळीमोहन मतेकृष्णा खोपडेकृष्णा गजबेविकास कुंभारेमाजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके उपस्थित होते याचबरोबर जिल्हाधिकारीगोंदियाभंडारागडचिरोलीचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लिना बनसोडमहाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अधिकारी यांच्यासह विदर्भातील विविध शेतकरी प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

            मंत्री श्री.भुजबळ म्हणाले कीकेंद्र शासनाकडून हंगाम 2022-23 करिताच्या तात्पुरत्या दरपत्रकात २० रुपये ४० पैसे प्रती क्विंटल इतके सोसायटी कमीशन मंजूर केलेले आहे. तथापिहंगाम २०२३-२४ करिताच्या तात्पुरत्या दरपत्रकात ३१ रुपये २५ पैसे प्रती क्विंटल इतके सोसायटी कमीशन केंद्र शासनाच्या नियमान्वये देण्यात आलेल्या अटी व शर्तीच्या पूर्ततेच्या अधीन राहून मंजूर करण्यात आले. धानाची घट होवू नये याकरिता तात्काळ धानाची उचल करण्यात यावी. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय असलेले चुकारे तात्काळ विहित मुदतीत अदाकरण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.

            स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेला धान सहकारीखासगी गोदामामध्ये साठवणूक करण्यात येतो. मात्र ही गोदामे शास्त्रोक्त पद्धतीने नसल्याने त्यामध्ये उंदीर, घुस इत्यादी प्रादुर्भावामुळे धान साठवले की त्याचे नुकसान होऊन घट होते.  केंद्र शासनाने हंगाम २०२३-२४ करीता धान तात्पुरते दरपत्रकात एकूण एक टक्का घट मंजूर केलेली आहे. त्यात राज्य सरकार अर्धा टक्का एव्हढा भार उचलणार असून आणि केंद्र सरकारने अर्धा टक्का भार उचलावा अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती, मंत्री श्री. भुजबळ यांनी दिली.

            धान खरेदी केंद्र निवडीकरिता एक कोटी रु. बँक गॅरंटी व वीस लाख रु. ठेव जमा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघमुंबई यांनी काढलेले परिपत्रक रद्द करण्यात येत असल्याचे यावेळेस मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले. तसेच धानाचा गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            धानाच्या घटीसाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा विचार करताकेंद्र शासनाने मंजूर केलेल्या 0.5 टक्के घटीव्यतिरिक्त राज्यशासनाकडून 0.5 टक्के अतिरिक्त घट मंजूर करण्याचे निर्देश मंत्री श्री.भुजबळ यांनी दिले.

            विदर्भातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या या बैठकीत मांडल्या. सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

जमीन मोजणीची मागणी पालकमंत्र्यांकडून अवघ्या 12 दिवसांत मान्य ‘

 जमीन मोजणीची मागणी पालकमंत्र्यांकडून अवघ्या 12 दिवसांत मान्य

जनतेशी सुसंवाद’ सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीच

- पालकमंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 1 : अनेक वर्षांपासूनची जमीन मोजणीची मागणी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केवळ 12 दिवसात मान्य केल्याने माटुंगा येथील साई विसावा एसआरए सहकारी हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्ष पद्मा नायडू यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. मोजणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीचे नगर भूमापन अधिकाऱ्यांचे पत्र पालकमंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आज श्रीमती नायडू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीच जनतेशी सुसंवाद’ आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

            पालकमंत्री श्री.केसरकर दर बुधवारी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेशी सुसंवाद साधत आहेत. आजच्या कार्यक्रमप्रसंगी आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकरकॅप्टन तमिळ सेल्वनजिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरअपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंडनिवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारीजिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            दर बुधवारी होणाऱ्या जनतेशी सुसंवाद कार्यक्रमामुळे नागरिकांची कामे जलदगतीने होऊ लागल्याची भावना येथे येणारा प्रत्येक नागरिक व्यक्त करू लागला आहे. साई विसावा संस्थेमार्फत 18 ऑक्टोबर 2023 रोजीच्या सुसंवाद कार्यक्रमात जमीन मोजणीच्या मागणीचे पत्र देण्यात आले होते. ते तत्काळ मान्य करण्यात येऊन आज त्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे पत्र देण्यात आले. याबद्दल सर्व रहिवाश्यांच्या वतीने श्रीमती नायडू यांनी आनंद व्यक्त करून पालकमंत्री श्री.केसरकर यांचे आभार मानले.

            याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभाचे प्रमाणपत्रउत्पन्नाचे प्रमाणपत्र आदी मागण्यांची तातडीने पूर्तता होऊ लागली आहे. आज पालकमंत्र्यांच्या हस्ते या प्रमाणपत्राचे देखील वितरण करण्यात आले. आज आलेल्या अर्जांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावाज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मिळावेरहिवासी प्रमाणपत्र मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या. यापुढे प्रत्येक कामासाठीची कालमर्यादा निश्चित करून दाखले देण्याची कामे पूर्ण व्हावीत तसेच नागरिकांना तसे कळविण्यात यावेअसे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले. कुलाबा परिसरात नोटीस न देता घरे तोडल्याच्या एका तक्रारीच्या अनुषंगाने एसआरएच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून एका आठवड्यात अहवाल मागविण्याचे आदेश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले.

00000

सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारित होणार

 सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची

 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारित होणार मुलाखत

 

            मुंबईदि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात सायबर सुरक्षा’ या विषयावर राज्याचे सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

            तंत्रज्ञानाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटसंगणकासारख्या गॅजेट्सचा वापर वाढला आहे. त्याअनुषंगाने नागरिकांची ऑनलाइन होणारी फसवणूक व गुन्हे रोखण्यासाठी शासनाच्या सायबर विभागामार्फत वेळोवेळी दक्षता घेण्यात येत आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, फसवणूक झाल्यास तक्रार कुठे नोंदवावी अशा विविध विषयांबाबत पोलीस अधीक्षक श्री. शिंत्रे यांनी दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे. 

             दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार दि. 2शुक्रवार दि. 3, शनिवार दि. 4,  आणि सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00000

दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालवण्यास इच्छुक संस्थांनीअर्ज सादर करण्याचे आवाहन

 दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालवण्यास इच्छुक संस्थांनीअर्ज सादर करण्याचे आवाहन

            मुंबईदि. 1 : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यास इच्छुक अशा नामांकित नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था/ अशासकीय  संस्थांनी बातमी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसात सहायक आयुक्त समाज कल्याणमुंबई उपनगर कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे समाज कल्याण आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

            संस्थांनी पुढील अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे.

अटी व शर्ती

1)स्वयंसेवी संस्था हि संस्था नोंदणी अधिनियम1860 अंतर्गत आणि मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम1950अंतर्गत नोंदणीकृत असावी.

2) संस्थेकडे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम2016 कायद्यातील कलम 50 व 51 नुसार दिव्यांग क्षेत्रात पुनर्वसन विषयक काम करण्यासाठी आवश्यक असलेले नोंदणी (अनुज्ञाप्ती) (वैध)प्रमाणणपत्र असावे. (मा. आयुक्त,

दिव्यांग कल्याण आयुक्तालयपुणे यांचेकडील)

3) संस्थेच्या कार्यकारणीमध्ये कोणताही वाद धर्मादाय आयुक्त कार्यालयात नसावा.

4) जिल्ह्यातील रेड क्रोस सोसायटी /निमशासकीय संस्था यांना प्राधान्य देण्यात येईल.

5) संस्थेच्या ध्येय आणि उद्दिष्टामध्ये संस्था दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात कार्य करण्याबाबत उल्लेख असावा.

6)धर्मादाय आयुक्त यांचेकडील संस्थेच्या कार्यकारिणीस मान्यता देण्यात देण्यात आलेले शेड्यूल-1 व सध्या कार्यरत असलेल्या कार्यकारिणीची यादी

7) संस्थेने यापूर्वी दिव्यांग कल्याणविषयक कार्यक्रमकॅम्प आयोजित केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा. (कार्यक्रम आयोजित केल्याचे पुरावे जसेफोटोपेपर कात्रणेव्हिडिओ लिंक व लाभार्थी यादी  इत्यादी सोबत जोडावे.

8) दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यास संस्थेकडे किमान 400 चौ.मी जागा असणे आवश्यक आहे.

9) संस्थेने मागील ३ वर्षांचे वार्षिक कार्य अहवाल (Annual Reports) सादर करावा ज्यामध्ये दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात  कार्य केल्याचा उल्लेख असावा.

10) संस्थेचा कार्य अहवाल ( वार्षिक अहवाल) आणि वार्षिक उलाढालीचा लेखापरिक्षण अहवाल ऑडिट रिपोर्ट जोडावा.

11) संस्थेच्या बँकेचा तपशील व खात्यामधील जमा रक्कम तसेच विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ठेवीची माहिती.

12) संस्थेच्या अर्जासोबत खालील गोष्टीचा समावेश असावा:

(a) संस्था नोंदणी तथा संस्थेचे दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात कार्य करण्याचे प्रमाणपत्र.

b) संस्थेच्या वतीने अटी व शर्तीची स्वीकृती / संमतीचे अधिकृत स्वाक्षरीसह प्रमाणपत्र (संस्थेच्या लेटर हेड वर)

(c) कोणत्याही सरकारी एजन्सीने फर्म / कंपनीच्या काळ्या यादीमध्ये ठेवलेले नाहीअसे हमीपत्र (रु. 100/- च्या स्टम्प   पेपरवर).

(d) अर्जात नमूद केलेले सर्व नियम व शर्ती त्यांनी वाचल्या आहेत आणि समजून घेतल्या आहेत आणि अशा अटी व  शर्तीनुसार केंद्र चालविण्यास इच्छुक असल्याचे प्रमाणपत्र.

e) अर्ज सादर करतांना संस्थेचे आयकर प्रमाणपत्र किंवा पॅनकार्डव्हॅट / जी.एस.टी. प्रमाणपत्र याची छायांकित प्रत सोबत जोडावी

f) या अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्र खरी असल्याबाबतचे हमीपत्र / प्रतिज्ञापत्र.

13) या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकरिता आवश्यक असलेला निधी/ अनुदान हा टप्प्या-टप्प्याने कार्यांची समाधानकारक स्थिती आणि कामगिरी बघून दिव्यांग सक्षमीकरण विभागसामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयभारत सरकार यांकडून देण्यात येतोत्यामुळे संस्था शासनाच्या अनुदानाशिवाय स्वबळावर चालविण्यास समर्थ असल्याचे लेखी  हमीपत्र (रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर) सादर करावे.

14) ज्या संस्थेची या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यासाठी निवडीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर व त्यास सक्षम अधिका-याची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर संस्थेने कार्यादेश निर्गमित केल्याच्या 21 दिवसाच्या आत सदर केंद्राला सुरुवात करावी लागेल.

16) अर्जातील कोणत्याही स्वरुपातील त्रुटी आणि अपूर्ण अर्ज पूर्णपणे नाकारण्याचा अधिकार  जिल्हाधिकारीमुंबई उपनगर  यांना आहेत.

17) हे केंद्र स्थापने संबंधित कोणत्याही कलमाबाबत व अन्य कोणत्याही नियमांबाबत विवाद निर्माण झाल्यास जिल्हाधिकारीमुंबई उपनगर  यांचा निर्णय अंतिम राहीलत्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार / सूचनेची दखल घेतली जाणार नाही.

18 ) संस्थांनी बातमीच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत अर्ज या कार्यालयास सादर करावा.

****

शैलजा पाटील/विसंअ/


रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करण्यासाठी कामांना गती द्यावी

 रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी

कार्यान्वित करण्यासाठी कामांना गती द्यावी

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. 1 : रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करण्यासाठी मोबाईल टॉवर उभारण्याच्या कामांना गती देण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

              रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करण्याबाबत मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी रायगडचे अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवेरोहाचे उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकमउपवनसंरक्षक (ठाणे) अक्षय गजभियेरोहाचे सहायक वनसंरक्षक  विश्वजित जाधवअलिबागच्या उपवनसंरक्षक  गायत्री पाटीलसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. बी. कदम आदी उपस्थित होते.

              मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीरायगड जिल्ह्यात पनवेलपेणकर्जतखालापूरउरणअलिबागसुधागडमाणगावरोहामुरुडश्रीवर्धनम्हसळामहाडपोलादपूरतळा या तालुक्यातील संपर्कासाठी मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सोडविण्यासाठी मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या कामांसाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन तातडीने पूर्ण कराव्यात. कालबद्ध कार्यक्रम तयार करुन प्रशासनाने ही कामे गतीने करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केल्या. रायगड जिल्ह्यात आपत्कालिन स्थितीत टिकणारी अद्ययावत अशी यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

****

संध्या गरवारे/विसंअ/

भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

 भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

           

            मुंबईदि. 02 : देशभर 30 ऑक्टोबर  ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. 

            राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करतानाभ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागमुंबई विभाग91सर पोचखानवाला मार्गवरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064दूरध्वनी क्रमांक 022-24921212संकेतस्थळ acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा ईमेल acbwebmail@mahapolice.gov.inaddlcpacbmumbai@mahapolice.inफेसबुक www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप acbmaharashtra.net, एक्स (ट्विटर) - @ACB_Maharashtra आणि 9930997700 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विजय पाटील यांनी केले आहे.

००००

मुंबई लोकलचे धावते जग*

 *मुंबई लोकलचे धावते जग*


   मुंबई मध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांचे एक स्वतंत्र जग आहे.....प्रत्येकाचा एक ७.५९- 

९.१३, ५.२३, ६.०३ अशा लग्नाचा मुहूर्त असल्यासारख्या वेळा असलेल्या गाड्याचे ग्रुप असतात. आपली नेहमीची ट्रेन इंडिकेटरला लावलेली असली की तो एकदम कम्फर्टेबल असतो चढायला कितीही गर्दी असली तरी 

त्याला त्याची चिंता नसते....

आणखी एक खासियत असते. प्रत्येकाचा डबा ठरलेला, डब्याला तीन दरवाजे असतात, त्यातला दरवाजा ठरलेला, इतक्यावर थांबत नाही, त्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे मुसंडी मारायची की उजवीकडे हेदेखील ठरलेलं असतं.... अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत असतो तसं त्याला आपण पकडायची सीट दिसत असते....नेहमीची जागा पकडली की आजचा दिवस चांगला जाणार ह्याची त्याला 

खात्री पटते.....जागेवर बसल्या नंतर शेजारी आपले सखे सोबती आहेत ना याची खातरजमा केली जाते....मग गप्पा ,भंकस,तर काही ग्रुप मध्ये भजन,तर काही जण पत्ते काढतात....

Ladies डब्यात अशीच परिस्थितीअसते .....

भजन, पत्ते मात्र नसतात,

तिथेही आपला सगळा ग्रुप जमला की नाही ते बघितलं जातं.....गप्पा लगेचच सुरू होतात....त्यात एकमेकींच्या साड्या, ड्रेस, हेअर स्टाईल, मुलंबाळं, त्यांची आजारपणं,  

शिक्षणातली प्रगती.....अनेक विषय....क्वचित घरच्या,ऑफिसच्या कुरबुरी.....ह्या ग्रुप मध्ये वय वर्षे २० ते ६० एवढी 'रेंज'असते.....प्रत्येकीचा वाढदिवस साजरा करण्यात येतो, शिवाय केळवण,डोहाळेजेवण, कोणी रिटायर होणार असेल तिला सेन्डऑफ....त्याशिवाय हळदीकुंकू भोंडला....सगळं यथासांग पार पाडलं

जातं...... खायचं प्यायचं एकेक जण स्वतः करून किंवा विकत घेऊन येणार....पेपर डीश, चमचे, टिशू पेपर सगळं साग्रसंगीत.


आपल्या नेहमीच्या गाडी बद्द्ल प्रत्येकाला विशेष जिव्हाळा असतो.....दसऱ्याला लवकर येऊन त्या गाडीचे प्रवासी गाडी, आपला डबा सजवतात. गाडीचा मोटरमन, गार्ड रिटायर होतो तेव्हा गाडीचे नेहमीचे प्रवासी त्याला निरोप देतात.....प्लॅटफॉर्म वरच.....अतिशय हृद्य असा सोहळा असतो तो.....


लोकल मधलं शॉपिंग हा आणखी एक पैलू..... सकाळच्या वेळी,टिकल्या, रुमाल, पर्सेस, कानातले, बांगड्या, हेअरपीन्स ,थंडीत स्कार्फ, मफलर ह्या गोष्टी विकणाऱ्यांचा सुळसुळाट..... आणखी एक व्हरायटी स्टोरमध्ये मिळतात तेव्हढ्या वस्तू विकणारा असतो.... लायटर, बॅटरी, सेलोटेप, नेलकटर, कात्री, इअरबड्स, नाडी बंडल.....हे सगळं एका हुक वर अडकवलेले.....

चार साडे चार नंतर भाजीवाल्या, फळवाल्या, फ्रायम ,वेफर्स, चकल्या,राजगिरा लाडू यांची छोटी छोटी पाकिटं विकणारे.....त्यात भाजीवाल्यांना जास्त डिमांड.....कारण भाजी खरेदी झाली की मोठं काम झालं....अनेक बायका पालेभाजी घेतली तर ती निवडायचं काम पण गाडीतच उरकून घेतात....

फुलवाल्या, गजरेवाल्याचाही फेरा होतो .मुसळधार पाऊस पडत असतांना सोनचाफ्याची फुलं, मोगऱ्याचे, जाई जुई चे गजरे विकणारी चढली की अख्ख्या डब्याला वर्दी मिळते.....ह्या फेरीवाल्यांची चढायची उतरायची स्टेशन ठरलेली असतात .... सेंट्रल रेल्वे वर विद्याविहार, कांजूर, नाहूर..... जिथे एक आणि दोन प्लॅटफॉर्म एकत्र असतात.....एक चिकुवाली किंवा संत्र वाली असेल तर ती गाडीतूनच आवाज देणार "चिकुवाली हाय गं" म्हणजे प्लॅटफॉर्म वर कोणी चिकुवाली असेल तर ती गाडीत चढणार नाही......एकाच डब्यात दोन दोन चिकुवाल्यांचा 'बिझिनेस' कसा होणार? शाळेचं तोंड सुद्धा न पाहिलेल्यांची ही 'बिझिनेस मॅनेजमेंट'

कौतुकास्पदच......


या प्रवाशांची परिभाषा पण ठरलेली असते ..... किचन ..म्हणजे डब्यातील सगळ्यात टोकाचा छोटा भाग.

पूर्वी गाड्या बारा किंवा नऊ डब्याच्या असत.... सतत इंग्लिश मध्ये बोलणाऱ्या तामिळ ,केरळी बायका सुद्धा त्या गाड्यांना, बारा डब्बा, नऊ डब्बा' असेच म्हणणार....


समानता हे ह्या जगाचं वैशिष्ट्य रेल्वे स्टेशन बाहेर बायका कोणीही असोत एकदा का गाडीत चढल्या की सगळ्या 'प्रवासी'होतात....बँकेत मोठ्या हुद्द्यावर असणारी, कोर्टात वकिली करणारी, दुकानात सेल्स गर्लचं काम करणारी, कोणी प्रायव्हेट कंपनीत काम करणारी....सगळ्या जणी गुण्यागोविंदाने डब्यात नांदत असतात.....


 या जगात सचोटी तर ओतप्रोत भरलेली असते.... कुठल्याही विक्रेत्याचे पैसे बुडत नाहीत.....कानातले विकणारा, कानातल्याचे बॉक्स खरेदी करणाऱ्या बाई कडे देऊन दरवाज्यात हवा खायला जातो....आपण समोर नसताना एखादं कानातले कोणी पर्स मध्ये टाकेल अशी शंका सुद्धा त्याच्या मनात येत नाही ......त्याचा विश्वास अगदी सार्थ असतो..... उलट त्याला उतरायची घाई असेल आणि पैसे पर्स मधून काढेपर्यंत तो उतरला तर खिडकीतून त्याला हाका मारून, किंवा प्लॅटफॉर्म वरच्या एखाद्या दुसऱ्या विक्रेतीचं लक्ष वेधून तिच्याकडे ते पैसे कानातलंवाल्याला द्यायला सांगितले जातात....ती पण त्याचा शोध घेऊन त्याचे पैसे देते.....यातलं कोणीही फारसं श्रीमंत नसतं.... पैसे ढापले,बुडवले तरी पकडलं जाण्याची शक्यता नसते....तरी कोणी कोणाला फसवत नाही......चिकू वाली चिकूची मोठी टोपली एका ठिकाणी ठेवून डबाभर फिरत असते पण तिच्या टोपलीतून चिकू निवडून घेताना एखादा जास्त चिकू घेतला जात नाही....


परोपकार हा तसा मुंबईचाच गुण..... त्यामुळे तो गाडीत दिसतोच दिसतो.... तुफान गर्दी असलेल्या ट्रेन मध्ये एखादीला चक्कर आली तर तिला सावरायला अनेक हात पुढे येतात..... महत्प्रयासाने मिळालेली विंडो सीट तीला बसायला दिली जाते....मग पाणी,लवंग,वेलची, आवळा सुपारी,कॅडबरी ह्या गोष्टी ऑफर केल्या जातात...... ती कुठे उतरणार आहे ते विचारुन त्या स्टेशन वर उतरणारी कोणीतरी तिची जबाबदारी घेते.....तिला हाताला धरून स्टेशन वर उतरते.....ती सावरली असेल तर रिक्षात बसवून दिले जाते.....आणि हे सर्व नावगाव सुद्धा माहीत नसलेल्या बाई करतात....आणि कसलीही अपेक्षा न ठेवता.....त्याचा गाजावाजा न करता....


अजून अनेक गोष्टी,किस्से सांगता येतील....त्याला अंत नाही....पण आता आवरतं घेते.....


 चैतन्य, उत्साह, सचोटी,आपुलकी, निरपेक्ष परोपकार,अशा दुर्मिळ गुणांनी 

ठासून भरलेल्या ह्या धावत्या जगाला सलाम.


*मेधा दीक्षित*

Featured post

Lakshvedhi