Wednesday, 25 October 2023

राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावावेत

 राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे

नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावावेत

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा

 

            मुंबईदि. 25 :- नागरिकांना विकास कामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेलीप्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकास कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवराउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपरिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्तापर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव जयश्री भोजपुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखउपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पुणे मेट्रोपीएमआरडीएसंबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

            बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीपुणे मेट्रो क्रमांक ३ चे कामाला वेग देतानाच शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयटाटा कंपनी आणि मेट्रो यांनी त्रिपक्षीय करार करण्याची कार्यवाही करावी. सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी चतुर्थ श्रेणी पदे मंजूर नसल्यास ती तत्काळ मंजूर करावीत. अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारा निधी येत्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर करून घेण्यात यावा. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेड्डी किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी स्वतंत्र बैठक लावण्यात यावी. पुणे बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादनासाठी लागणारा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. वडाळा येथील जीएसटी भवनामध्ये शासकीय कार्यालयांसाठी कार्यालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त बांधकामासाठीच्या परवानग्या घेण्याची कार्यवाही पूर्ण कराअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथीसंस्थेचे पुण्यातील मुख्यालयऔंधनाशिककोल्हापूरनागपूरअमरावतीतील सारथीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकामपुणे येथील कृषीभवनशिक्षण आयुक्तालयकामगार कल्याण भवनसहकार भवननोंदणीभवनसाखर संग्रहालयइंद्रायणी मेडिसिटी आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

००००


चांगलं द्या, चांगलंच मिळेल*

 *चांगलं द्या, चांगलंच मिळेल*  


एकदा श्रीकृष्ण व अर्जुन  एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णला बोलतो मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे, त्या साठी तू माझी मदत कर. कृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुला ते शक्य नाही. पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो तो श्रीकृष्णाच्या मागे सतत एकाच धोशा लावतो की मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे.

 कृष्ण म्हणतो ठिक आहे मी तुला एक संधी देतो पण माझी पण एक अट आहे मी तुला जी संधी देईन तीच संधी कर्णाला सुद्धा देईन अणि ह्या परीक्षेत तू कर्णा पेक्षा मोठा दानशूर असल्याचे सिद्ध करून दाखवायचे. अर्जुन कृष्णाची ही अट मान्य करतो. 

    कृष्ण आपल्या शक्तीने जंगलातल्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये करतो आणि अर्जुनाला म्हणतो ,आता हे सगळे सोने लोकांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.

  लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की...

  मी प्रत्येक गावकऱ्यांना सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.

लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.

  पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते.

   अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.

   लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.

 आता अर्जून अगदी दमून गेला होता.पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. 

 शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!आता यापुढे मी काम करू शकत नाही. 

  मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की.......

 या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या......

लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलवले आणि सांगितले की.....

  या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत. ज्याला जेवढे शक्य आहे त्याने तेवढे सोने निःसंकोच घेवून जावे. 

 एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले.

  अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही.....या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला..... 

 अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास.जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!  

   कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

  आपले कुणी कौतुक करतंय.....गुणगान गातंय......हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.

व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

  देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे.....

शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे.....

म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.

कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............                                                    *म्हणून निसर्गाचा एक नियम आहे जे तुम्ही देणार ते तुम्हाला नक्की परत भेटणार.कोणत्या रूपात परमेश्वर देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे चांगल द्या पदरी चांगलंच मिळेल.*

"काय चुकलं" हे शोधायला हवं,

 पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो.....

*🌷 राम कृष्ण हरी 🌷*

*घरात गेल्यावर कटकट/चिडचिड/ओरडाओरड का करू नये??* 👇🏼👇🏼👇🏼

 *घरात गेल्यावर कटकट/चिडचिड/ओरडाओरड का करू नये??*

👇🏼👇🏼👇🏼

*वास्तु*

केवढी *पवित्र जागा!*


जिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. 

*ती वास्तू फक्त आनंदी नसावी, समाधानी असावी. आनंद भौतिक पातळीवर असतो, समाधान आत्मिक पातळीवर असते.*

 *साखर, लिंबू, मीठ सारे आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते व मीठ, साखरेला विरघळून एकजीव व्हावे लागते.* 


*.* 


आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो. नाहीतर ती मनातल्या मनात कुढत राहतात.


*" CONDUCT OF PARENTS IS EDUCATION OF CHILDREN..!"*


मुले अनुकरणप्रिय असतात. *आईचा कडवट चेहरा, वडिलांचा आरडाओरडा घराचा “उकिरडा" करतो*

 आणि 

वास्तुतज्ज्ञ समस्येच्या मुळाशी न जाता फक्त *अतार्किक, अशास्त्रीय आणि बिनबुडाचे उपाय सुचवितो आणि निर्बुद्ध मंडळी त्यावर हजारो रुपये खर्चून मग पस्तावतात.* अरे 

*कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर पैसे घेऊन तुमच्या घरात शांती आणणे तुम्हाला शक्य वाटते का आणि पटते का?*

 *तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता.* 

ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृती साथ देत असेल तर अर्थार्जन करून मुलांना हातभार लावावा. 


*रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे.काहीही कारण नसताना सारखे लोळत पडलेली माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात.* माळ घेऊन जप करणारी वृद्ध माणसेही आदरणीय वाटतात. *मुलांनीही जन्मभर कष्ट केलेल्या आई-वडिलांशी खूप नम्रतेने वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये.* सून म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेम आणि आधार द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली आधुनिक मुलगी आहे. आपणच जनरेशन गॅप कमी करावी. *सुनेने सुद्धा सासरी साऱ्यांना असा लळा लावावा, की सून माहेरी गेली की सुनं सुनं वाटलं पाहिजे.* घरात मेणबत्या फुंकून आणि डोक्यावर कचरा पाडून घेऊन वाढदिवसाचा धांगडधिंगा करण्यापेक्षा मुलाचे निरांजन ओवाळून औक्षण करावे.  *भोजनाचे वेळी आनंदी वातावरण ठेवावे. पत्नी जेवली का विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप संयमाने बोलावे,* एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्या. एकजण चिडला तर दुसऱ्याने शांत बसावे. 

*गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसे सारे शांत होईल.चालतानाही घरात पाय आपटू नयेत. शांतपणे वस्तू हाताळाव्यात.* 


पुरुषांनीही घरात नीटनेटके राहावे. सतत फक्त बायकांनीच सदाफुलीसारखे टवटवीत राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही.


"  अशी राहाते *समाधानी वास्तु!*


*तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ आणि करा आपली वास्तुदेवता प्रसन्न अन् समाधानी..!!*


*👇🏻घरातील प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा मॅसेज जाऊ द्या आणि प्रत्येक घर सुखी समाधानी होऊ द्या👆*

धरणीमातेची दीन बालके*

 *धरणीमातेची दीन बालके* 

लेखिका - सुधा मूर्ती


कुष्ठरोग, नुसतं हे नाव काढले की बरेच लोक घाबरतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुष्ठरोगी व्यक्तीस लेपर म्हणून कधीही संबोधू नये अशी प्रथा आहे. कारण लेपर या शब्दाच्या मागे जो एक अभिप्रेत भाव आहे तो फार वाईट आहे. कुष्ठरोगाची शिकार झालेल्या व्यक्तीचा विचार आला की लगेच आपल्याला हातापायाची बोटे झडलेला भिकारीच आठवतो. कुष्ठरोगाने पीडित असलेल्या व्यक्तींना समाज सुद्धा वाळीत टाकतो.


पण इथे एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की वेळच्या वेळी योग्य उपचार घेतले तर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, तोही काहीही शारीरिक व्यंग मागे न सोडता. अर्थात हे उपचार दीर्घकाळ चालतात. रुग्णाला खूप संयम बाळगावा लागतो, धीराने घ्यावे लागतं.  कुटुंबीयांच्या आधाराची गरज असते. या भयावह रोगाविषयी कितीतरी गैरसमज आढळून येतात. तो संसर्गजन्य आहे, आनुवंशिक आहे इत्यादी. पण हे गैरसमजच आहेत. कुष्ठरोगाचे सर्वच प्रकार काही संसर्गजन्य नसतात.


या रोगाविषयीच्या अज्ञानामुळे त्याची लक्षणे लोकांच्या लवकर लक्षात येत नाहीत. खरंतर ही लक्षणे लवकर कशी ओळखावी याविषयी प्रसार माध्यमे अनेकदा जनजागरणाचं काम करत असतात. पण तरीही हे घडत नाही. अनेकदा लोक फिकीरच करत नाहीत. आपण नेहमी असाच विचार करत असतो की हा प्रश्न इतरांचा आहे, आपला नव्हे. आपण एक गोष्ट विसरतो या रोगाच्या जगात गरीब-श्रीमंत स्त्री-पुरुष असा भेदभाव नाही आणि कुष्ठरोग तर मानवजातीच्या अगदी प्रारंभीच्या काळापासूनच या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे. अगदी येशू ख्रिस्ताच्या काळापासून.


आमच्या संस्थेचे जे अनेक उपक्रम आहेत त्यातील एक उपक्रम कुष्ठरोग्यांना मदत करणे हाही आहे. या क्षेत्रात वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत.  काही लोकांच्या मते कुष्ठपीडित रूग्णानी आपल्या कुटुंबातच राहायला हवे,  तर काही लोक म्हणतात की त्यांनी वेगळ्या वस्तीत जाऊन राहिले पाहिजे. 


मी एकदा एका ओसाड प्रदेशात कामासाठी गेले होते. तेथे कुष्ठरोग्यांची वेगळी वसाहत होती. उन्हाळ्याचा ताप असह्य होत होता.  त्या वसाहत मधील दृश्य अत्यंत निराशाजनक होते. वसाहतीत राहणाऱ्या लोकांना त्या रोगाची घृणा वाटत होती. त्यांना यातना सुद्धा सहन होत नव्हत्या.


आम्ही तिथे त्यांना दया दाखवण्यासाठी किंवा आर्थिक मदत करण्यासाठी गेलो नव्हतो. त्या लोकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करावं हाच आमचा हेतू होता. ते अगदी लहानसाहान काम जरी करू शकले व पोटा पाण्यापुरतं मिळवू शकले तरी त्यासाठी लागेल ती आर्थिक मदत करायला आम्ही तयार होतो. त्यांचा आत्मविश्वास परत यावा म्हणून आम्ही असं करायचं ठरवलं होतं. कारण माणसाला जेव्हा स्वतःविषयी आत्मविश्वास वाटतो तेव्हाच तो उजळ माथ्याने समाजापुढे तोंड वर काढू शकतो.


त्या वसाहतीतील सर्वात लोक गरीब व असहाय होते. त्यांना मानसिक आणि वस्तूरूपाने अशी दोन्ही प्रकारची मदत हवी होती. काळजी करू नका, आम्ही आहोत ना. असे छोटेसे शब्दसुद्धा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. समाजाकडून स्वीकार आणि काही मर्यादित स्वरूपात का होईना पण आर्थिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींनी या लोकांचे आयुष्य बदलून गेले असते.


वसाहतीत बऱ्याच झोपल्या होत्या. प्रत्येक झोपडीत एक एक कुटुंब राहत होते. प्रत्येक कुटुंबातील निदान  एक तरी व्यक्ती या रोगाने पीडित होती. हवा फार त्रासदायक होती. पण मला माझं कर्तव्य पार पाडणं भागच होतं.  या झोपडीतून त्या झोपडीत भेटीसाठी जाणं गरजेचं होतं. झोपडीतील स्त्रिया त्यांच्या अडचणी मला सांगत होत्या. सर्वात दुःखाची गोष्ट अशी ती त्यांना झालेल्या या दुखण्यामुळे साधी धुणंभांड्याची कामेही त्यांना कोणी देत नव्हते. त्यांच्यातील काहींनी नशिबापुढे हार मानली होती. सकाळची वेळ असूनही तरुण मुले झोपून होती. लहान मुले मातीत खेळत होती.


वृद्धांची अवस्था तर अत्यंत दारूण होती. मुळात कुष्ठरोगासारखा दूर्धर रोग, त्यात वृद्धापकाळमुळे कमजोर झालेले शरीर, शिवाय या रोगामुळे समाजाकडून मिळणारी हेटाळणीची वागणूक… कधी कधी अशा परिस्थितीने गांजलेली व्यक्ती आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होऊ शकते.


तिथे एक लहानशी, गवताने शाकारलेली झोपडी होती. चिकणमातीच्या भिंती व बांबूचे दार होते. एक स्त्री तिथे राहत होती. ती त्या वसाहतीतील सर्वात वयोवृद्ध स्त्री होती. तिचे नाव वीराम्मा. मी तिला हाका मारून बाहेर बोलावलं. पण ती आली नाही. तिला कदाचित जरा कमी ऐकू येत असेल त्यामुळे आपणच आत जाऊन तिच्याशी बोलावं असं मला वाटलं. मी त्या दारावर अगदी हलकेच टकटक केली, न जाणो दारच मोडायचं. तरीही तिने ओ दिली नाही की बाहेर आली नाही. मग मीच दार ढकलून आत गेले.


झोपडीत काही सामानसुमान नव्हतं. छताला थोडे झरोके होते. त्यातून थोडी हवा व उजेड आत येत होता. दोन-तीन गाडगी-मडकी व एक मातीची थाळी होती. तीन दगडांची चूल मांडलेली होती. एक फाटकी चटई जमीनीवर अंथरलेली होती. जवळच दोन-तीन कांदे पडले होते व पाण्याने भरलेला माठ होता. 


मला झोपडीत वीरम्मा चटकन दिसेना, पण तिच्या श्वासोच्छवासाची चाहूल तर लागली. बाहेरच्या लख्ख प्रकाशातून एकदम आत शिरले होते त्यामुळे डोळे दिपले होते. काळोखाची डोळ्यांना सवय होण्यास वेळ लागला.


मी परत एकदा हलकेच हाक मारली, वीरम्मा मला तुमच्याशी बोलायचंय, कुठे आहात तुम्ही ?  


ती म्हणाली,  अम्मा मी इथे आहे. पण माझ्याजवळ नका येऊ. 


आता मला अंधारात, खोलीच्या कोपऱ्यात बसलेली ती कृश स्त्री दिसली. शरीर सुरकुतलेलं, अंगावर मांसाचा कण नाही. नुसतं कातडं आणि हाडांचा सापळा. ती हाताची घडी करून कोपऱ्यात पाय पण पोटाशी ओढून अंगाचे मुटकुळं करून बसली होती.


अम्मा, ती पुटपुटली, तुम्ही बाहेरून खूप हाका मारत होता ना ? पण मी तुमच्याशी बोलायला बाहेर कशी येणार ? मी एक स्त्री आहे. म्हातारी असले म्हणून काय झालं, अंगात कपडा नसताना इतक्या लोकांसमोर कशी येणार मी ?


तेव्हा मला कुठे जाणवलं की, तिच्या अंगावर जवळपास वस्त्रच नव्हतं. 


मी माझ्या कार्याच्या निमित्याने अनेक गरीब वस्त्यांमधून हिंडले आहे. अठरा विश्वे दारिद्र्य मी पाहिलंय. पण आजवर कधी अशी स्त्री पाहिली नव्हती. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाल्यानंतर गरिबीची ही दारुण अवस्था खरोखर मानवतेला काळीमा फासणारी होती. एका वृद्ध स्त्री जवळ अंग झाकण्यापुरता कपडा नसावा ? आणि तरीही ती तक्रार करत नव्हती. सहा वार साडी नेसल्याबद्दल मलाच अपराधी वाटलं.


काही क्षण मला माझी स्वतःची लाज वाटली. मी काहीच बोलले नाही. खरं तर थेट वस्तूरूपाने देणगी किंवा रोख रक्कम हातात द्यायची नाही, असं आमच्या संस्थेचे धोरण आहे. पण ते मी क्षणभर विसरले. ही परिस्थितीतच अशी होती की तातडीने काहीतरी उपाययोजना करणं अत्यावश्यक होतं.  मी माझ्या ड्रायव्हरला पाठवून त्या वस्तीतील स्त्रियांना देण्यासाठी शंभर साड्या मागवल्या. त्या स्वावलंबी होतील की नाही,  स्वतःच्या पायावर उभ्या राहतील की नाही ही दुरची बाब होती. स्त्रीला लज्जा रक्षणापुरतं वस्त्र तरी किमान असणं ही निकड होती. तेवढं पुरवून सुद्धा त्याने त्या स्त्रीयांच्या आयुष्यात फार मोठा फरक पडणार नव्हता.  पण इतकी गरिबी, इतकी दारूण  अवस्था मी पाहिली की काही वेळा आपण तातडीने काहीतरी कृती करून जातो, त्यातलीच एक गोष्ट. ही गरीब माणसे त्यांचा स्वतःचा काही अपराध नसताना अशी दुःखाच्या खाईत खितपत पडलेली दिसतात तेव्हा आपल्यासारख्या लोकांनी त्यांना जमेल तेवढी मदत केली पाहिजे. कारण ईश्वराने मुक्त हस्ताने आपल्यावर कृपेची उधळण केलेली आहे.


भारत म्हणजे काही नुसतं तंत्रज्ञान,  आधुनिकता, फॅशन, सिनेमे किंवा सौंदर्यस्पर्धा नव्हे.  खरा भारत तर आपल्या देशाच्या अंधाऱ्या कानाकोपऱ्यात वसलेला आहे. कोणत्याही सरकारी यंत्रणेचे हात देखील पोचू शकणार नाहीत, अशा कानाकोपऱ्यात आपण देश सेवा करणं म्हणजे या अशा लोकांची सेवा करणं. 


त्या दिवशी त्या कुष्ठरोगांच्या वसाहतीत जाऊन आल्यापासून आता मी नेहमी एक गोष्ट करत असते कधीही अशा वस्तीत भेटीसाठी गेले तर किमान दहा तरी साड्या बरोबर घेऊन जाते.




*समाप्त*

बर्थडे पार्टी

 एका मित्राच्या बर्थडे पार्टी होती. एका छानशा बँक्वे हॉलमध्ये ही पार्टी ठेवली होती. मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते. "हाय! हॅलो!!" वगैरे सगळं झालं. मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले. पार्टी रंगात येऊ लागली होती. मग जेवणाच्या आधी 'ड्रिंक्स & डान्स' चं आयोजन होतंच.


सगळ्यांचे हात ग्लासांनी भरले. डी.जे.चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. नाचायला पूर्ण तयार झालेली लोक, आता कुठलं गाणं हा डी.जे. लावेल आणि त्यावर कुठल्या स्टेप्सवर नाचायचं ह्यावर काही उत्साही मंडळी चर्चा करत होती... आणि गाणं सुरु झालं!


"गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया... मंगलमूर्ती..." सगळे आलेले लोक अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागले. बर्थडे पार्टी, हातात दारूचे ग्लास आणि कसलं हे गाणं ? गजानना गणराया ?" लोकांची कुजबुज जाणवण्याएवढी वाढली. शेवटी त्या उत्साहावर पाणी पडलेल्या एकाने विचारलं, "ऐ, हे काय, पार्टीत काय हे गाणं लावता ? कोई पार्टीवाला गाना लगाओ यार!" तसा माझा मित्र, ज्याचा वाढदिवस होता, हातात माईक घेऊन स्टेजवर चढला.


"मित्रांनो, माझी बर्थडे पार्टी आहे. आता पार्टी म्हंटली कि त्यात कुठचंतरी पार्टी सॉन्ग वाजेल अशीच तुमची अपेक्षा होती ना ? अर्थात असणारच! पण जसं एखाद्या पार्टीत हे 'गजानना गणराया' गाणं शोभत नाही ना, तसंच एखाद्या गणपतीच्या मांडवात देखील एखादं पार्टी साँग शोभत नाही. पण त्यावेळेस आपण आपला विरोध दर्शवतो का? नाही! 'आपल्याला काय करायचंय?' म्हणून सोडून देतो. पण हे चुकीचं आहे. गणेशोत्सव हा 'उत्सव' आहे आणि गणपती हा आपण देव मानतो. त्याला 'Show -Piece' करून ठेवू नका. आत्ता ह्या पार्टीत जसा विरोध दाखवलात ना, तसाचं विरोध एखाद्या गणपतीच्या मांडवातसुद्धा दाखवा. D.J. फक्त पार्टीची शोभा वाढवतो, उत्सवाची नाही! हे लक्षात ठेवा. हातात दारूचे ग्लास, पार्टीत बरे वाटतात, गणपतीच्या मिरवणुकीत नाही. विरोध दर्शवा. आपण गप्प बसतो म्हणून हे खूळ बोकाळलंय. सगळीकडे दारू आणि डी.जे चालणार नाही हे कळूदे ना गणेशोत्सव मंडळांना. जिथे असला थिल्लरपणा चालत असेल अशा उत्सव मंडळांना वर्गणी, देणगी, जाहिरात देऊ नका. मग बघा परिवर्तन होतं कि नाही ते. आणि, सो सॉरी. मला ही गोष्ट खटकते. गणपती यायला आता फक्त 10-12 दिवस उरलेत आणि आज तुमच्यापर्यंत माझा विचार पोचावा अशी माझी इच्छा होती, म्हणून हे सगळं मीच घडवून आणलं. Now enjoy your Party, Friends!" म्हणत हा खाली उतरला.,टाळ्यांचा कडकडाट झाला!


मी मात्र नाचण्याऐवजी ड्रिंकचा आस्वाद घेणं prefer केलं. हा माझा मित्र माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "लोकांना ना ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत समजवावं लागतं. कशी वाटली आयडिया ?" तसं मी हसत म्हटलं, "साल्या, डोक्याचा उपयोग अगदीच उशीवर ठेवण्याकरता करत नाहीस. ग्रेट! चियर्स!!"


कृपया हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप वर शेयर करा जेणेकरून किमान ह्या गणपति उत्सवात देवाचे पावित्र्य जपले जाईल  शेवटी मला जे योग्य वाटले ते मी सांगितले शेवटी प्रत्येकाला निर्णय स्वातंत्र्य आहे गणपत्ती बाप्पा मोरया🙏

माझी लाज तुला पांडुरंगा🚩

 🚩माझी लाज तुला पांडुरंगा🚩


🌻 🌻 संत दामाजी पंत 🌻🌻


"पंत दरवाजा खोलो"

"पंत दरवाजा खोलो'

दारावर जोरजोरात धक्के बसू लागले.

"पंत दरवाजा खोलो...."

पंत जेवायला बसले होते. दुष्काळ असल्यामुळे त्यांच्या पंक्तीला आणखी ही

काही अतिथी होते.

पंतांच्या पत्नीने दरवाजा उघडला. बाहेर हत्यारबंद दोन यवन शिपाई उभे होते.

"दामाजी पंत कहा है ? सरकार का हुक्म है..." ते यवन शिपाई गरजले.

"आपण आत यावे" पंतांची बायको म्हणाली

यवन शिपाई आत आले. आत मध्ये जेवणाची पंगत बसली होती. प्रथे प्रमाणे पंतांच्या पत्नीने गुळपाणी दिले. तसे ते शिपाई म्हणाले,"माई जी खाने को कुछ मिलेगा ?"

"हा हा, क्यू नही, बैठीए",पंत अदबीने म्हणाले आणि पत्नीला चार पानं मांडायला सांगितली,.

दुपारची वेळ होती, उन्हाचा कडाका होता. शिपायांना भूक लागली होती. दोघे जण जेवायला बसले. संतांच्या घरचे ते सात्विक अन्न पोटात गेले आणि शिपायांच्या वृत्तीत बदल होऊ लागला. ते शांत झाले.

त्यांनी थैलीतून एक कागद बाहेर काढला आणि पंतांच्या हातात ठेवला. पंतांनी तात्काळ जाणले त्या कागदात काय लिहिलेले आहे. तो कागद घेऊन पंत देवघरात गेले आणि तो कागद पांडुरंगाच्या मूर्ती पुढे ठेवला आणि म्हणाले,

"माझी लाज तुला पांडुरंगा".

कागद परत घेऊन पंतांनी तो उघडून वाचला. मंगळवेढ्यातले धान्य कोठार लुटल्याचा आरोप दामाजी पंतांवर ठेवून पंतांना काढण्या लावून दरबारात हजर करावे असा हुकूम होता.

दामाजी पंत पत्नीचा निरोप घेऊन त्या शिपायांबरोबर जायला निघाले. ही बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आणि पंतांच्या वाडयासमोर गर्दी लोटली.

पंतांना घेऊन ते शिपाई वाड्याबाहेर आले. आणि गावकऱ्यांनी शिपायांना वेढा घातला. पंत हात जोडून गावकऱ्यांना म्हणाले

"ते बादशहाचे शिपाई आहेत त्यांना सरकारी कामात अडथळा करू नका."

एव्हढ्यात पंतांची पत्नी शिपायांना म्हणाली,"तुम्ही एकदम बेदरला जाऊ नका आधी पंढरपूरला जा आणि मग बेदरला जा".

शिपाई म्हणाले "आम्हाला तसा हुकुम नाही".

पंतांच्या पत्नीने हातातून सोन्याच्या बांगड्या काढून शिपायांच्या हातात ठेवल्या तसे शिपाई म्हणाले," हां माईजी , जैसा आप कहेंगे वैसा होगा". 

त्याप्रमाणे शिपायांनी पंतांना आधी पंढरपूरला नेले.

पंत विठ्ठलाला म्हणाले,

 "लाज राख पांडुरंगा"

श्रीहरीला दंडवत घालून दामाजीपंत शिपायांबरोबर

बेदरला जायला निघाले.


इकडे श्रीविठ्ठल रुक्मिणीला म्हणाले," दामाजी पंत काही प्राणाची भीक मागणार नाही. मलाच काहीतरी केले पाहिजे. तू तुझे सर्व दागिने मला दे. परत देताना मी दुप्पट करून देईन."

तेंव्हा रुक्मिणी माता म्हणाल्या, " दागिने नेताना सर्व नवरे असेच म्हणतात".

रुक्मिणी मातेनी सर्व दागिने काढून पांडुरंगाच्या हवाली केले. पांडुरंगाने त्या दागिन्यांचे सुवर्ण मोहरात रूपांतर केले. स्वतःचा वेष बदलून ते महार बनले. आणि 

झाला महार पंढरीनाथ !

पंढरीनाथांनी सर्व मोहरा पागोट्यात गुंढाळल्या, पागोटे डोक्यावर ठेवले आणि क्षणात

बादशहाच्या दरबारात हजर झाले.

बादशहाने विचारले," कौन हो तुम ?"

पंढरीनाथ म्हणाले,"विठू महार म्हणत्यात मला. मी दामाजी पंतांकडे कामाला असतो. तसेच काम निघाले म्हणून मालकांनी मला पाठवले. आमच्या मालकांनी धान्यकोठार लुटलेलं नाही तर ते धान्य गावकऱ्यांना विकले. त्याचे हे पैसे आणले आहेत", असं म्हणून पंढरीनाथांनी डोक्यावरचे पागोटे काढून त्यातल्या सुवर्ण मोहरा बादशहापुढे ओतल्या.

बादशहा मनात म्हणाला माझा खजिना पण एव्हढा नाही. बादशहाने पैसे मिळाल्याची पावती विठू महाराचे हाती ठेवली.

आणि विठू महाराला बादशहाने विचारले की,

"दामाजीपंत तुला किती पगार देतात ?"

"एक लक्ष देतात" विठू महार म्हणाला.

मी तुला दोन लक्ष पगार देतो, माझ्याकडे काम कर".

यावर विठू महार म्हणाला,

"मला दोन लक्ष चालत नाही. एक लक्ष संसारात आणि एक लक्ष दरबारात मला चालत नाही. मला एकच लक्ष लागते".

बादशहाला काहीच उमगले नाही !

बाहेर येताच विठू महार अंतर्धांन पावला. 

पंढरीनाथांनी ती पावती पंतांच्या घरी जाऊन त्यांच्या देवघरातल्या पोथीत ठेवली.


इकडे दरबारात यवन शिपायांनी दामाजीपंतांना हजर केले. तेंव्हा 

बादशहांनी दामाजीपंतांना सांगितले तुमच्या विरूद्ध कोणताही आरोप नाही. तुम्ही ज्या विठू महाराला पाठवले होते त्याने सर्व रक्कम दरबारात जमा केली आहे. दामाजीपंतांना आश्चर्याचा धक्काच बसला.

हा कोण विठू महार ? त्याने कोठून पैसे भरले ?

बराच वेळ विचार केल्यावर दामाजीपंतांच्या लक्षात आले की विठू महार म्हणजे खुद्द पंढरीनाथ दरबारात येऊन गेले, पंतांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.बादशहाला स्वतः पंढरीनाथांनी दर्शन दिले., पंत मनात म्हणाले हे बरंय पंढरीनाथा ? वर्षानुवर्षे आम्ही तुझी भक्ती करावी आणि दर्शन मात्र तू बादशहाना दिलेस ?


पंत घरी आले आणि थेट देवघरात गेले. पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि त्यांना जाणवले पांडुरंग मिस्किलपणे हसताहेत.

त्यांचे लक्ष उघड्या पोथीकडे गेले त्यात एक कागद होता. तो हातात घेऊन वाचला, बादशहाच्या

शिक्क्याची ती पावती होती

"धान्याची रक्कम मिळाली"

पंतांना गहिवरून आले. पुन्हा डोळ्यातून पाणी वाहू लागले.


🔔🚩🌷🔔🚩🌷🔔🚩

अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            राज्यातील कारागृहांच्या बळकटीकरणासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. कारागृहांमधील कैद्यांचे पुनर्वसन करणेत्यांच्यात सुधारणा घडवून आणणे तसेच त्यांच्यातील गुन्हेगारीला प्रतिबंधासाठी कारागृह व सुधार सेवा विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये बंदिवानांच्या कलागुणांना वाव देणेविशेष माफीवेतनात वाढ शृंखला उपहारगृह हे उपक्रम काय आहेत तसेच राज्यातील कारागृहांमध्ये या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरु आहे. याबाबत जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून श्री. गुप्ता यांनी माहिती दिली आहे.

             जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवारदि. 26 ऑक्टोबर2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स (ट्विटर) - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Featured post

Lakshvedhi