Monday, 26 June 2023

घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

                                             घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

- पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

 


मुंबई, दि.२६ :  पहिल्या पावसामुळे घाटकोपर पूर्व येथील राजावाडी कॉलनीमध्ये नुकतीच एक जुनी तीन मजली इमारत कोसळून दुर्घटनाग्रस्त झाली. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची व जखमींची मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट घेतली आणि दुर्घटनास्थळाची पाहणी केली. शासनातर्फे  सुरू असलेल्या बचावकार्याची पाहणी करून या  अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी  दिले. 

            "झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून पीडित कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. याबाबतची सर्व तपासणी सुरु आहे. यासाठी अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यावी आणि सरकारी यंत्रणांना सहकार्य करावे" असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केले.

        २५ जून रोजी झालेल्या या अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीराष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तुकडी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य करते वेळी देखील पालकमंत्री  श्री. लोढा घटनास्थळी उपस्थित होते. अपघातानंतर सुमारे १२ तासापेक्षा जास्त काळ बचाव कार्य सुरु होते.

  

000

तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल.....?*टिप्स

 *तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल.....?*


काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडेही जातात पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपण काही कारणे जाणून घेऊया.


*या कारणांमुळे तुम्ही हेल्दी आहात का? हे जाणून घेण्यास सोपी जाणार...*


*१) तुमचा आहार योग्य आहे का...?*


आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते.


*२) आपल्याला व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का...?*


आपल्या सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे.


*३) तुम्ही पुरेसे पाणी पिताय ना...?*


आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असते त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.


*४) तुम्हाला पुरेशी झोप मिळते आहे का...?*


आपले शरीर हे कोणत्याही रोगविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते.


*५) तुम्ही तोंडाची नीट स्वच्छता करता ना...?*


आपले तोंड हा अनेक बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक चांगले वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात.


*६) तुमच्या कुटुंबात कुणी सतत आजारी पडते का...?*


अनेकवेळा असे दिसून आले आहे की रक्तातील पांढऱ्या पेशी, ज्या कोणत्याही रोगाचा सामना करतात त्यांची संख्या जर कमी असेल तर तो माणूस सतत आजारी पडतो.


*७) तुम्हाला ताण आहे का...?* 


आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण-तणाव नसलेला माणूस मिळणे जवळपास अशक्य आहे. पण जर आपल्याला अतिरिक्त ताण असेल तर त्यामुळे आपल्या शरीराची खूप हानी होते. यापैकी जे काही कारण आपल्याला सापडेल ते दूर करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो


डॉ. प्रमोद ढेरे,


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*

हे काही नियम पाळलेत तरच निरोगी रहाल

 . हे काही नियम पाळलेत तरच निरोगी रहाल 

१)रोज ४०शी नंतर पाण्यात गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्या.

२)दिवसात कमीत कमी तीन लिटर पाणी घ्या.

३)भोजनाची वेळ पाळा.

४)चौरस आहार घ्या.जिभेचे चोचले टाळा,जाऊ तिथे खाऊ धोरण टाळा.

५)जेवणा पुर्वी अर्धातास व जेवणानंतर एक तासाने पाणी प्या.

६)रोज तुळस,बेल,कडुलिंबाची पाच पाच पाने कुटून गोळी गिळा.

७)जंकफूड, पाव,चहा ,बेकरी आयटम कमी खा.

८)रोज त्रिफळा सकाळी दुधा बरोबर पुरक व रात्री गरम पाण्या बरोबर रेचक म्हणून घ्या.

९)सकाळी उठल्या वर थोडे पाणी घेऊन तोडातली पहीली लाळ गुळण्या करुन प्या अँसिडीटी कमी होईल.

१०)सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना गरमपाणी घ्या.

११)महीन्यातून एकदा ऐरंडेल घ्या कोठा म ऊ होतो.

१२)जेवणात मेथीचा प्रयोग करा,सकाळी उठल्या उठल्या मेथीचे दाणे चाऊन खा.

१३)महीन्यातून एकदा तरी लंघन उपवास करा हलके अन्न खा.

१४)प्राणायाम, योगा,चालणे कमीत कमी ४५मिनिटे करा.

१५)मन एखाद्या ठिकाणी एकाग्र करा.

१६)संगीताचा शरीरावर पुर्ण पाँझिटिव्ह इफेक्ट होत असल्याने सकाळी इनस्ट्रुमेंन्टल धून ऐकत जा.

स्वतः ला तणाव विरहित ठेवा.

आणि आनंदी जगा.

   ..आणि हो मोबाईलच्या आहारी जाऊन जागरण करू नका.

 पहा पटतंय का मंडळी.

ता.क.दुपारी बिलकुल झोपू नका .डायबेटीस चा धोका वाढतो


वैद्य.गजानन


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





दापोली-हर्णे मार्गावर अपघात,

 दापोली-हर्णे मार्गावर अपघात, मुख्यमंत्र्यांकडून शोकमृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

            मुंबई दिनांक २६: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही त्यांनी याविषयी माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही दिले.


            या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला काही प्रवासी जखमी आहेत.जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आ

हेत.


युवा परिवर्तन


 

मन शुद्ध तुझे गोष्ट आहे लाख मोलाची

 ✍️ *अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाच नाही तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्वाचं आहे बोलताना जरा सांभाळून बोलावे शब्दांना तलवारी सारखी धार असते फरक फक्त एवढाच कि तलवारीने मान आणि शब्दांनी मन कापले जाते पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोडत नाही त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे शुल्लक गोष्टीसाठी खोटं बोलणारी माणसे ही जीवनात कधीही सुखी राहू शकत नाहीत जोपर्यंत आपण बेदम मेहनत करायला सुरू करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वप्नं झोपेतचं दिसतील प्रत्यक्षात नाही एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते आयुष्यात सर्व काही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही आयुष्य संपत जाते शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्ष्यात येते की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होते‌‌ समाधान तुमच्यात काही चांगलं करण्याची योग्यता हे तुमचा जन्म नव्हे तर तुमचं कर्म ठरवत असते कारण जन्मतः प्रत्येक व्यक्ती शून्यच असतो त्याला त्याच कर्मच योग्य दिशेला घेऊन जात असतं आणि शून्यातून तो घडत जातो देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो स्वतःची ओळख लपवणारी माणसं कधीच विश्वास पात्र नसतात शब्दकोडी सोडवताना बुध्दीची कसोटी लागते तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खुप हसतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून रडत असतो काही नाती अळवावरच्या पाण्यासारखी असतात साठतं पण लगेच वाहतं पण लगेच पूर्व जन्मातील नाती असतात ती राहीलेला हिशोब पूर्ण करतात कधी सुख देऊन तर कधी दुःख तुमच्यात असणारी जिद्द च तुम्हाला सिध्द करण्यास भाग पाडते नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं आयुष्य जास्त सुंदर वाटत प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला घालवण्याचा कारण आयुष्य राहत नाही पण आठवणी नेहमीच जीवंत राहतात मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही परमात्मा कधीच कुणाचं भाग्य लिहित नाही भाग्य लिहीतात ते आपले विचार व्यवहार आणि कर्म मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद दिसतो त्यामुळे आनंदी रहा खुश रहा स्वतः हसा व दुसऱ्यांनाही हसत ठेवा हेच यशस्वी जीवनाचे गमक होय साधेपणा ही काही साधी गोष्ट नाही रंग असे ऊधळा की नंतर त्यांचे डाग म्हणून नाही तर गोड आठवण असं अस्तीत्व राहील जे दिसतं ते सत्यात असतच असं नाही हसतोय म्हणून सुखी आहे पण तसं नाही*✍️


*👏विचारधन परिवर्तन👏*


    *🕉️शुभदिन 🕉️*

Yuva parivartan

] Yuva Parivartan Sharma: https://forms.gle/7486UmERNYtpTcX47


Yuva Parivartan Sharma: Hi Sir/ Madam

Good day



Please joined this link get more information on our Mobile Application and on YES TALK webinar, it is a free session.


कृपया या लिंकवर सामील व्हा आमच्या मोबाईल ऍप्लिकेशनवर आणि येस टॉक वेबिनारवर अधिक माहिती मिळवा, हे एक विनामूल्य सत्र आहे.



Thank you 

Shital Garud

8876893404

Featured post

Lakshvedhi