Monday, 19 June 2023

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न

 महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न


शेठ वालचंद हिराचंद यांच्या व्याख्यानमालेत 50 वे पुष्प ओम बिर्ला यांनी गुंफले  


 मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अॅ ग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांचा नुकताच राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.


महाराष्ट्र चेंबरच्या इतिहासात ललित गांधी हे पहिलेच अध्यक्ष आहेत, ज्यांचा राजभवन मुंबई येथे पदग्रहण सोहळा झाला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे सुवर्णमहोत्सवी पुष्प शुक्रवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये गुंफण्यात आले. त्यावेळी हा पदग्रहण सोहळा झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अध्यक्षीय ट्रॉफी देऊन पदग्रहण सोहळा झाला. तर वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांना सन्माचिन्ह देऊन पदग्रहण सोहळा झाला. पदग्रहण सोहळ्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल रमेश बैस, विविध देशाचे कॉन्सुलेट, उद्योजक, व्यापारी यांनी शुभेच्छा दिल्या. चेंबरच्या वतीने महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते लोकसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांचा चांदीचा कलश, शाल देऊन सन्मापूर्वक सत्कार करण्यात आला.  


भारत ही संत, शूरवीर योद्धे आणि समाज सुधारकांची जशी भूमी आहे, तशीच ती महान उद्योजकांची देखील भूमी आहे. वालचंद हिराचंद यांनी बिकट परिस्थितीत उद्योग उभारणीसह नवीनता व संशोधनाचे काम केले. उद्योग विकासाची दूरदृष्टी असलेल्या वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे उदगार ओम बिरला यांनी याप्रसंगी काढले.


राज्यपाल रमेश बैस म्हणाले, स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अश्या तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके मोठे आहे. त्यांनी स्थापना केलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने राज्याचा विकास करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  


महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. महाराष्ट्र चेंबरच्या चौफेर प्रगतीसाठी अविरतपणे कार्यरत राहणार असल्याची ग्वाही अध्यक्ष निवडीनंतर त्यांनी दिली.


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शेठ वालचंद हिराचंद यांच्या कुटुंबातील सदस्य हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन को. लि. चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, प्रिमिअर ऑटो इलेक्ट्रीक लि. चे माजी अध्यक्ष अरविंद दोशी, वालचंदनगर इंडस्टीज लि. चे कार्यकारी संचालक चिराग दोशी, पद्मश्री सरयु दोशी, पल्लवी झा यांचा सत्कार झाला. अतिरीक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर , महाराष्ट्र चे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशन कुमार शर्मा, कौन्सिल दि रॉयल कॉन्सुलेट जनरल ऑफ सौदी अरेबियाचे सुलेमान इद एस अल्ताइबी, कौन्सिल जनरल कॉन्सुलेट जनरल ऑफ मलेशियाचे अहमद झुआरी युसुफ, कौन्सुल जनरल ऑफ कॉन्सुलेट जनरल ऑफ बेलारूसचे अन्टॉन पशकोव्ह, चार्ज डी अफेअर्स दि कॉन्सुलेट जनरल युएई चे हमीद अलधाभाई, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे पेट्रोन मेंबर्स नितिन धूत, रमाकांत मालू, संगिता पाटील, प्रकाश शहा, मुकेश खाबणी यांचा सत्कार झाला.चेंबरचे ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रविंद माणगावे, उपाध्यक्ष तनसुख झांबड, सेक्रेटरी जनरल सागर नागरे आदींनी संयोजन केले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद दोशी यांनी आभा

र मानले.

देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे

 देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे

- भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी. टी. रवी यांचे प्रतिपादन

- कांदिवली पूर्वमध्ये 'मोदी@९' कार्यक्रम उत्साहात

- आमदार अतुल भातखळकर यांचे नियोजन

मुंबई : भारताला विश्वगुरु बनवणे हे आमचे लक्ष्य आहे. सत्ता हे साधन मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानसेवक म्हणून काम करत आहेत.देशाला पुढे नेण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यासाठी एकजूट महत्वाची आहे. जातपात न बघता देशासाठी येणाऱ्या निवडणुकीत भाजपला मतदान करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय महासचिव तसेच महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी केले. कांदिवली पूर्व विधानसभेत भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 'मोदी@९' अंतर्गत बुद्धीजिवी संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री कृपा शंकर सिंग, खा. गोपाळ शेट्टी, संजय उपाध्याय यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


सी. टी. रवी म्हणाले, काँग्रेसच्या काळात सुमारे २०० घोटाळे झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून ९ वर्षाच्या काळात अनेक सुधारणा केल्या आहेत. विमानतळे, विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, मेट्रो, स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, स्टार्टअप, सागरमाला अशा अनेक सुधारणा मोदीजींच्या नेतृत्वाखाली झाल्या आहेत. देशाला स्वावलंबी बनवायचे आहे, हे मोदीजींचे स्वप्न आहे. देशासाठी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणे आवश्यक आहे, त्यासाठी सर्वांना निवडणूक योद्धा म्हणून काम करावे लागेल, असेही ते म्हणाले. 

आगली बारी नरेंद्र मोदी - आ. भातखळकर


देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून झालेला बदल दिसतोच आहे. कोविड महामारीत १३० कोटी लोकसंख्या असलेल्या एवढ्या मोठ्या देशात केलेली यशस्वी टाळेबंदी हे जगापुढे आदर्श ठरली. कोविड चाचण्या असोत किंवा लसीकरण असो मोफत आणि अत्यंत सुरळीत पार पडले. अत्यंत कुशलतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व परिस्थिती हाताळली. युक्रेन-रशिया युद्ध प्रसंगात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणले. जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम त्यांनी केले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक असून पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, ही देशातील सर्वसामान्य नागरिकांची इच्छा असल्याचे ते म्हणाले.



'मोदी@९' अंतर्गत विधानसभा मतदारसंघात मालाड येथे 'टिफिन बैठक' उत्साहात पार पडली. हनुमान नगर येथे महिला आधार भवनमध्ये बचत गट आणि लाभार्थी संमेलन पार पडले. लोखंडवाला येथे प्रभावशाली व्यक्ती संमेलनात परिसरातील नागरिक बंधू-भगिनी सहभागी झाले होते. त्यांच्याशी सी. टी. रवी यांनी संवाद साधला. यासह आमदार अतुल भातखळकर यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या कॅन्सर रुग्ण सेवा केंद्र, लोखंडवाला येथिल स्व. गोपीनाथ मुंडे उद्यान सुशोभीकरण, रोटी बँक अशा विविध उपक्रमांना सी. टी. रवी यांनी भेट देऊन या उपक्रमांचे कौतुक केले. यासह 'मोदी@९' अंतर्गत विविध कार्यक्रम पार पडले. 

साखर, गूळ, मध की ब्राउन शुगर; कोणता पदार्थ तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या डॉक्टरांचे मत.....*

 *साखर, गूळ, मध की ब्राउन शुगर; कोणता पदार्थ तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या डॉक्टरांचे मत.....*


आपल्यापैकी बहुतेकांची सकाळ ही एक कप चहा, कॉफी किंवा स्मूदीने होते. हे गोड पदार्थ असल्याने ते सकाळी उठल्यानंतर प्यावे की पिऊ नये यावरून गोंधळ आहे. अनेकजण आरोग्याविषयी जागरुक असल्याने ते याबाबत खूप काळजी घेतात.आपल्या निरोगी आरोग्याच्या दृष्टीने साखरेचे सेवन धोकादायक मानले जाते, विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखरचे सेवन हे अधिक धोकादायक असते. पण साखरेला आता गूळ, मध आणि ब्राउन शुगर हे पर्याय उपलब्ध झाले आहेत. पण 


*यातील कोणता प्रकार तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे जाणून घेऊ…*


साखरेला पर्याय म्हणून यातील एक पदार्थ निवडण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. ती म्हणजे, या सर्व प्रकारच्या गोड पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात सारखेच असते. फक्त याची पौष्टिक रचना आणि प्रक्रियांमध्ये थोडाफार फरक असतो, हे फक्त आम्हीच नाही, तज्ञही तेच सांगतात.


साखर, ब्राऊन शुगर, गूळ हे सर्व पदार्थ ऊसापासून तयार होतात हे तर सगळ्यांना माहितच असेल. पण यातील कोणता पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे हे आहारतज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले आहे.


ऊसाच्या रसापासून तयार होणारी साखर आणि गूळ हे मोलॅसिसपर्यंतचे अंतिम शुद्ध उत्पादन आहे. तर ब्राउन शुगर देखील रिफाइंड केलेली असते, परंतु त्यातील मोलॅसिस वेगळे केले जाते, पण याच गुळ नंतर टाकले जाते. म्हणूनच त्याचे पौष्टिक गुणधर्म थोडे वेगळे आहेत, असतात असे ती म्हणाली.


कॅलरीजबद्दल बोलताना आहारतज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले की, तुम्ही एक चमचा साखर घ्या, ब्राउन शुगर किंवा गूळ घ्या, हे तिन्ही पदार्थ जवळपास समान कॅलरीज प्रधान करतात. साखरेचे पदार्थ अति खाण्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढून वजन व चरबी वाढत असते. साखर किंवा ब्राउन शुगरच्या तुलनेत गुळामध्ये लोहन, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.


याशिवाय अगदी वेगळ्या स्त्रोतातून (मधमाशी) मिळणारे मध देखील तुम्हाला तेवढ्याच प्रमाणात कॅलरीज पुरवतात. परंतु त्यात काही ट्रेस मिनरल्स असतात.


यातील कोणता पदार्थ आपण निवडला पाहिजे?

हे सर्व गोड पदार्थांमध्ये गोडपणा एक समान गुणधर्म आहे.यामुळे त्यापैकी कोणताही पदार्थ निरोगी आरोग्यासाठी चांगला ठरतो असे म्हणता येणार नाही. कारण सर्वांमध्ये समान कॅलरीज आहेत, तसेच काही पोषक घटक देखील आहेत. पण मध आणि गुळात ट्रेस मिनरल्स असतात.


नोएडामधील इंटरनल मेडिसिन-फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक आणि प्रमुख डॉ. अजय अग्रवाल म्हणाले की, गुळात ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ साखरेच्या तुलनेत गुळामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी गूळ एक चांगला पर्याय आहे. परंतु साखर, गुळ, ब्राऊन शुगर, मध यातील कोणता प्रकार निवडायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे.


ब्राऊन शुगर आणि साखर यातील कोणताही प्रकार चव आणि पोत यावर अवलंबून असेल. एखाद्या पदार्थात जिथे कॅरमेलची चव हवी असेल तिथे ब्राउन शुगर हा चांगला पर्याय आहे. कारण साखर खूप गोड असते, जी कॅरमेलची चव देऊ शकत नाही, असे डॉ अग्रवाल म्हणाले.


यावर आहारतज्ज्ञांनी पुढे असेही म्हटले की, आपण यापैकी कोणत्याही गोड पदार्थांचा तुम्ही अतिवापर तर करत नाही याची खात्री करून घेण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


काकडी बी चे फायदे.

 काकडी बी चे फायदे.

उत्तर हिंदुस्थानात काकडी, खिरा, बालमखिरा, तरकाकडी, वालूक अशा वेगवेगळय़ा नावाच्या काकडय़ांच्या बिया वाळवून त्यांच्या मगजाचा वापर पौष्टिक म्हणून केला जातो. 

*काकडीच्या बिया थंड गुणाच्या असून शरीर पुष्ट करतात. 

*मासिक स्त्रावाचा दाह, रक्त फार जाणे, कष्टाने रक्तस्त्राव होणे या तक्रारी मध्ये लाभप्रद.

* लघवी कमी होणे, अडखळत होणे या तक्रारीत बियांचा चांगला गुण येतो.काकडीच्या बियांमधील मगज व मनुका एकत्र वाटून तांदळाच्या धुवणाबरोबर घ्यावे. त्यामुळे लघवीची तिडीक कमी होते. 

*एड्स या गंभीर रोगावस्थेत ज्या स्त्री-पुरुषांना मूत्रेंद्रियांचा दाह होतो, जखम असते. उपदंशाची लक्षणे आहेत त्यांनी काकडीच्या बियांचा वापर वरील प्रकारे करून पाहावा. 

*काकडीच्या बिया या मूत्रवह स्रोते सतत मोकळी ठेवतात. *शरीरात कांती सुधारते. *रक्तामध्ये जोश आणतात. आमाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी करतात.

* शोष पडणे किंवा खूप तहान लागत असेल तर काकडीच्या बिया वाटून खाव्या. कडकीवर काकडीच्या बिया, खडीसाखर एकत्र वाटून पाण्याबरोबर घ्याव्या. कडकी कमी होते.

*काकडीच्या बियांचा वाटून केलेला शिरा फारच पौष्टिक आहे. हिवाळय़ामध्ये वजन वाढविण्याकरिता उपयोग होतो.


* खिरा किंवा खजुराच्या बियांच्या मानाने काकडीच्या बिया कमी पौष्टिक आहेत. पण त्या पित्त कमी करण्याचे कार्य चांगले करतात. 

*काकडीच्या बियांचा वाटून केलेला लेप चेहऱ्याची त्वचा सुधारते. 

*काकडीच्या बिया या उत्साहवर्धक आहेत. शुक्र धातूचे उत्साह वाढविणे, टिकविणे हे कार्य काकडीच्या बिया चांगले पार पाडतात.

* कृश व्यक्तींचा आवाज बसणे या विकारात खिरा या जातीच्या काकडीच्या बिया वाटून मधाबरोबर खाव्या, आवाज सुधारतो. 

*उन्हाळय़ात अंगावर उष्णतेचे फोड उठणे, उबाळू, उन्हाळी ताप या तक्रारींत खिरा, काकडीच्या बियांचे सरबत उत्तम काम देते.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



शासनाने ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात

 शासनाने ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. 

जी हवी ती डाऊनलोड करा.

लिंक खाली दिलेली आहे.


https://books.balbharati.in/ebook.aspx


*

शरीरातील सर्वात नाजुक आणि महत्वाचा अवयव म्हणजे डोळा!*

 *शरीरातील सर्वात नाजुक आणि महत्वाचा अवयव म्हणजे डोळा!*


 डोळ्याची नजर अबाधित राहावी आणि सध्याच्या या धावपळीच्या काळात डोळ्यांना कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून आपण आपल्या परिने बरीच काळजी घेत असतो. पण तरिही सतत लॅपटॉप आणि संगणकासमोर बसून काम केल्याने आणि त्यानंतर मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होतातच. एकदा दृष्टी कमजोर झाली की मग एकतर चष्मा सतत डोळ्यांवर ठेवून वावरावं लागतं आणि सोबतच डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सतत डोळ्यांच्या दवाखान्यात फे-या घालाव्या लागतात. म्हणूनच चष्मा लागण्याआधी किंवा दृष्टीवर परिणाम होण्याआधीच वैयक्तिक स्तरावर काळजी घेण्यासोबतच आपण काही घरगुती उपाय देखील करुन डोळ्यांना स्वस्थ ठेवू शकतो. दररोज या काही फळांचा आहारात समावेश करुन तुम्ही डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवू शकता. तर जाणून घेऊया तुमच्या उपयोगी पडतील अशा काही साध्या-सोप्या टिप्स.

गुलाबजल’ या शब्दांतच किती थंडावा दडलाय. गुलाबजल खूप थंड असल्यामुळे सहाजिकच ते डोळ्यांसाठी खूपच प्रभावी मानले जाते. तसं तर गुलाबजल हे मुड फ्रेश करणे, कांती उजळणे, त्वचा मुलायम करणे अशा अनेक गोष्टींमध्ये लाभदायक ठरते. पण एका अभ्याअंती असे सिद्ध झाले आहे की गुलाबजलचा वापर केल्याने आपली दृष्टी वाढण्यासही मदत होते. डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी किंवा आराम देण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा डोळ्यांत गुलाबजलाचे दोन ते तीन थेंब टाकू शकता. डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे किंवा काळे डाग कमी करण्यासाठी देखील तुम्ही गुलाबजलचा जरुर वापर करू शकता.मोहरीचे तेल खरोखरंच डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास लाभदायक ठरते. चाचणी दरम्यान, दररोज या लोकांच्या पायाला १० मिनिटे मोहरीच्या तेलाने मसाज करण्यात आली आणि आश्चर्य वाटेल पण त्यांच्या दृष्टीमध्ये खरोखरच सकारात्मक बदल दिसून आले. म्हणूनच वैज्ञानिक निकषांच्या आधारे, दररोज न चुकता मोहरीच्या तेलाने १० मिनिटे मसाज केल्याने डोळ्यांची दृष्टी अधिकव्यायाम केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. पण तुम्हाला माहित आहे का? डॉक्टरांच्या अभ्यासानुसार न चुकता नियमित व्यायाम करणा-या आणि वजन नियंत्रित ठेवणा-या लोकांची दृष्टी ही सामान्य लोकांपेक्षा अधिक चांगली असते. वजन वाढल्यामुळे डायबिटीज २ (मधुमेह) असलेल्या लोकांची दृष्टी कमजोर होत जाते. याच कारणामुळे नजर साफ असण्यासाठी सर्वात आधी तुमचं वजन नियंत्रित असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे नियमित व्यायाम करा आणि आपली दृष्टीत अनेक सकारात्मक बदल घडवून आणा. 

बदामाने स्मरणशक्ती वाढते, कांती उजळते आणि यासोबतच अनेक लाभ होतात हे आपल्याला माहितच आहे. पण बदामाच्या सेवनाने डोळ्यांची नजर देखील वाढते.बदामा मध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात आढळते. तुम्ही दररोज दुधात बदामाची पुड टाकून त्याचे सेवन करू शकता. असे केल्याने तुम्हाला दुध आणि बदाम असे दोन्हीतील व्हिटॅमिन ‘ए’ मिळतील आणि डोळ्यांची दृष्टी अधिक बळकट होण्यास मदत होईल. टाकलेल्याआवळ्यातील अॅंटिऑक्सिडंट डोळ्यांचा पडदा निरोगी ठेवण्याचे काम करतात. डोळ्यांतील पडदा निरोगी राहिल्याने आपली दृष्टीदेखील चांगली राहण्यास मदत होते दुधाचे सेवन करतातअसे कितीतरी पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने डोळ्यांना त्याचे फायदे होतात. या मध्ये प्रामुख्याने गाजर, अक्रोड, ब्रोकोली आणि पालक या भाज्यांचा आणि फळांचा समावेश असतो. म्हणूनच या पदार्थांना आपल्या आहारात समाविष्ट करुन तुम्ही डोळे निरोगी ठेऊ शकता.


दृष्टी आहे तर सृष्टी आहे. निरोगी आणि साफ दृष्टी असणं फार गरजेचं आहे कारण त्यामुळे आपण हे सुंदर जग पाहूच शकत नाही तर त्याचा आनंदही घेऊ शकतोय. आपण शरीरातील इतर अवयवांची जशी काळजी घेतो तसंच डोळा हा देखील एक महत्वाचा अवयव आहे आणि त्याची यथायोग्य काळजी घेणं आपल्या हातात असतं. म्हणूनच डोळ्यांची काळजी घ्या आणि दृष्टीला निरोगी बनवा.

प्रमोद पाठक.



भेंडी खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे.*

 *भेंडी खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे.*


भेंडीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यामुळं शरीरातील रक्ताचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. याशिवाय अन्नपचनक्रियाही सुधारते. त्यामुळंच भेंडीला सुपरफूड मानलं जातं. त्याचबरोबर भेंडीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील कमी असतो. त्यामुळं शरीराला आवश्यक पोषकघटक मिळतात. आणि मधुमेह, रक्तदाबाची समस्या कमी होते.


याशिवाय गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठीही भेंडी ही फायदेशीर मानली जाते. महिलांनी भेंडीचं सेवन केल्यास त्यांच्या शरीराला आवश्यक पोषकतत्व मिळतात. बाळंतपण झालेल्या महिलांनी भेंडीचं सेवन केल्यास त्यांना अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळत असतातभारतातल्या लोकांना अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करायला आवडतं. भेंडी ही त्यातलीच एक चविष्ट आणि आरोग्यदायी भाजी मानली जाते. भेंडीत असलेल्या अनेक गुणधर्मांमुळं त्याचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे असतात. भेंडीत असलेल्या फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह असल्यानं त्याचं सेवन करणं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं

वजन कमी करण्यासाठी

भेंडीमध्ये कॅलरी कमी असतात, १०० ग्रॅम भेंडीमध्ये केवळ ३३ कॅलरी असतात. त्यामुळे ही भाजी वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. पण केवळ भेंडीची भाजी खाऊन वजन कमी होईल अजिबात नाही. पण याने वजन कमी होण्यास मदत नक्कीच होऊ शकते. 


हृदयरोगांपासून बचावासाठी


भेंडीमध्ये असलेल्या पेक्टिन विरघळणारं फायबर शरीरात कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. आणि याप्रकारे भेंडी हृदय रोग रोखण्यासाठी फायदेशीर ठरते. भेंडीमध्ये असलेल्या करसेटिन तत्व कोलेस्ट्रॉलचं ऑक्सिकरण रोखण्यास मदत करतं. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होऊ शकतो. 


डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी


फायबर भरपूर प्रमाणात असलेली भेंडी पचन क्रियेसाठी आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच भेंडी अ‍ॅंटी डायबिटीक गुण एंजाइम मेटाबॉलिज्म कार्बोहायड्रेटला कमी करण्यासाठी आणि इंसुलिनचं उत्पादन वाढण्यासाठी मदत करते. 


इम्यूनिटी मजबूत करा


भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे आपली इम्यूनिटी मजबूत होते आणि वेगवेगळ्या रोगांशी आणि इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते. १०० ग्रॅम भेंडी आपली व्हिटॅमिन सी ची ३८ टक्के गरज भागवते. त्यामुळे भेंडीची भाजी खाणे फायदेशीर ठरते.


 प्रमोद पाठक.



Featured post

Lakshvedhi