Sunday, 29 January 2023

कृषि महोत्सव से पारंपरिक खेती समेत आधुनिक खेती को भी हो रही मदद


कृषि महोत्सव से पारंपरिक खेती समेत आधुनिक खेती को भी हो रही मदद

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

               मुंबई, दि.29 : किसान यह हमारा अन्नदाता है। कृषि महोत्सव के माध्यम से किसानों को योग्य मागदर्शन मिल रहा है। यहाँ पर लगाये गए स्टॉल की वजह से दुलर्भ औषधी वनस्पतियों की जानकारी आम लोगों को मिल रही है एवं इस कृषि महोत्सव की वजह से पारंपरिक खेती समेत आधुनिक खेती को भी बड़ी मदद मिल रही है और हमारी सरकार किसानों को केंद्रस्थान पर रखते हुए काम करनेवाली सरकार है, यह प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया. 


          नाशिक स्थित डोंगरे वसतिगृह मैदान पर श्री स्वामी समर्थ कृषि व अध्यात्मिक विकास मार्ग व श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चैरिटेबल ट्रस्ट की ओर से आयोजित 'जागतिक कृषि महोत्सव, 2023' के अवसर पर इस महोत्सव के चौथे दिन आयोजित कार्यक्रम में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोल रहे थे।        


          इस कार्यक्रम में बंदरगाह व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिले के पालकमंत्री दादाजी भुसे, सांसद हेमंत गोडसे, विधायक बबनराव लोणीकर, विधायक सुहास कांदे, विधायक सीमा हिरे, विधायक संजय शिरसाट, श्री स्वामी समर्थ केंद्र के प्रमुख आण्णासाहेब मोरे, जिलाधिकारी गंगाधरन. डी. मनपा आयुक्त, डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, पुलिस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित थे।


          कार्यक्रम में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि हमारी सरकार यह आम लोगों की सरकार है। मजदुर, विद्यार्थी, समाज के प्रत्येक वर्ग की यह सरकार है। इसलिए हम प्रत्येक निर्णय भी जनता के कल्याणार्थ ही ले रहे है। खेती पर आनेवाले भारी बारिश, रोगराई आदि संकट की घडी में राज्य सरकार और केंद्र सरकार किसानों के साथ खड़े रहे है। एन.डी.आर.एफ. के नियमों को दरकिनार करते हुए इस साल क्षतिग्रस्त किसानों को दोगुनी मदद की गई है। खेती का जो नुकसान एन.डी.आर.एफ. के नियमों में नहीं आता था, उस पर भी योग्य निर्णय लेकर किसानों को सरकार ने मदद की है।


उन्होने बताया कि राज्य के 6 लाख 90 हजार किसानों को तक़रीबन ढ़ाई हजार करोड़ रुपये की मदद दी है। किसान अच्छे उत्पन्न किस तरह से ले सकेंगे, इस सन्दर्भ में भी हम प्रयासरत है। साथ ही 450 महिला बचत गुटों के माध्यम से हजारों नागरिकों को रोजगार उपलब्ध कराया गया है। राज्य की जनता सुखी होनी चाहिए, यहीं राज्य व केंद्र सरकार का अजेंडा है। पिछले छह महीने में राज्य में लिए गए निर्णयों की वजह से विकास को अच्छी गति मिली है, जिससे सर्वत्र सकारात्मक वातावरण का निर्माण हुआ है।


          बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग को लेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि समृद्धि महामार्ग यह 'गेम चेंजर' के रूप में महामार्ग साबित होगा। इस महामार्ग की वजह से किसानों के लिए खेतमाल कुछेक ही घंटे में राज्य समेत विदेशों में भी भेजना आसान होने के साथ-साथ गतिशील हुआ है। जिससे किसानों के विकास को अधिकाधिक गति मिली है। हाल ही में केंद्रीय गृहमंत्री अमित शहा की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ भेट लेकर राज्य के शुगर उद्योगों की समस्याओं का निराकरण करने को लेकर चर्चा की है, जल्द ही राज्य के शुगर उद्योगों की समस्याओं का भी निराकरण किया जायेगा। राज्य की ओर से केंद्र की ओर से जानेवाला प्रत्येक प्रस्ताव को केंद्र सरकार की ओर से तत्काल मंजुरी दी जा रही है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र राज्य के लिए 2 लाख करोड़ रुपये का विशेष प्रावधान भी किये जाने की बात मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस दौरान कहीं।   


           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि कृषि महोत्सव का यह 12 वां वर्ष है। यहाँ पर अनेक राज्य के नागरिक, किसान आकर भेट देते हुए कृषि के संदर्भ की योग्य जानकारी लेते है। केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, कृषि विभाग की विशेषज्ञ, किसान के साथ जुड़े है। इस कृषि महोत्सव में रहीं निरंतरता से किसानों को बड़ी मदद मिल रही है। आयोजकों ने समाज के प्रति सामाजिक सरोकार को और समाज के प्रति जिम्मेदारी की भूमिका से चलाया गया यह कृषि महोत्सव विश्व के अन्नदाता रहें किसानों में उर्जा भर देता है। यहाँ पर लगाए गए 250 से अधिक स्टॉल के माध्यम से प्रगत कृषि समेत गटखेती, योग्य बीज का चयन कैसे किया जाये, इन सभी की जानकारी किसानों को मिली है। श्री स्वामी समर्थ केंद्र की ओर से जारी जागतिक कृषि महोत्सव में अनेक समाजपयोगी कार्यक्रम संपन्न हुए है। इस कृषि महोत्सव में गुरुमाऊलीं ने 11 सामूहिक विवाह संपन्न करवाए है। साथ ही सरपंच, ग्रामसेवक के माध्यम से नाशिक जिले के 51 गावे श्री स्वामी समर्थ ट्रस्ट ने सालभर के लिए दत्तक लेने की वजह से इन सभी का पुण्य गुरुमाऊली मोरे के तक़दीर में मिल रहा है और यह भी पुण्य कृषि महोत्सव से जनता तक पहुंचाया जा रहा है। इस जागतिक कृषि महोत्सव के माध्यम से किसानों के विकास को अधिकाधिक ताकद भी मिल रही है।


00000


 


 



मौनात अर्थ सारे


 

लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव

 लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव


"केवळ 'पंजाब केसरी' नव्हे; लाला लजपतराय 'हिंद केसरी'": राज्यपाल भगतसिंह कोश्यार.

            मुंबई, दि. 28 : थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे कार्यक्षेत्र अविभाजित पंजाब असले तरीही त्यांचे जीवन कार्य व योगदान संपूर्ण देशासाठी होते. शिक्षण, आरोग्य, संस्कार व समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ 'पंजाब केसरी' नव्हते तर खऱ्या अर्थाने 'हिंद केसरी' होते. विद्यार्थी व युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज व देशासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.


            लाला लजपतराय जयंती दिनाचे औचित्य साधून मुंबईतील लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित लाला लजपतराय स्मृती सुवर्ण महोत्सवी व्याख्यान देताना राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.


            लाला लजपतराय पारतंत्र्याच्या ज्या काळात जगले, त्या काळात युवकांनी उच्च शिक्षण स्वतःसाठी नाही तर समाज व देशासाठी घेतले. बाळ गंगाधर टिळक, बंगालचे बिपीनचंद्र पाल यांसह लाला लजपतराय या 'लाल बाल पाल' त्रयीनीं स्वातंत्र्य लढ्याला निश्चित अशी दिशा दिल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            स्वातंत्र्य लढ्यासोबतच लजपतराय यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून समाजातील जातीव्यवस्था, विषमता यांविरुद्ध लढा दिला तसेच अँग्लो वेदिक महाविद्यालये स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. लजपतराय यांनी लोकसेवक मंडळ ही संस्था स्थापन करून जनतेची सेवा केली असे सांगून युवकांनी नोकरी, उद्योग, नवसंशोधन आदी सर्व गोष्टी कराव्या, परंतु त्यासोबतच समाजासाठी योगदान द्यावे असे राज्यपालांनी सांगितले .


       लाला लजपतराय स्मृती न्यासाचे अध्यक्ष डॉ. कमल गुप्ता यांनी महाविद्यालयाच्या पन्नास वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला. महाविद्यालयाने 25 देशीविदेशी संस्थांशी सहकार्य करार केले असल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. सुरुवातीला राज्यपालांनी लाला लजपतराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले.

कार्यक्रमाला लाला लजपतराय स्मृती न्यासाचे विश्वस्त डॉ.सुनील गुप्ता, विनोद गुप्ता, नरेश गुप्ता, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलम अरोरा, उपप्राचार्य डॉ. अरुण पुजारी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


000

Maharashtra Governor Koshyari presides Golden Jubilee of Lala Lajpatrai College in Mumbai


Describes Lajpatrai as the 'Lion of India'

जुहू येथे रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

 जुहू येथे रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचा शुभारंभ.

            मुंबई, दि. 28 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. 


            मेळाव्यात 43 कंपन्या, उद्योग तथा आस्थापनांनी सहभाग घेत त्यांच्याकडील 9 हजार 161 रिक्त जागा नोकरीसाठी उपलब्ध करून दिल्या. कॉसमॉस इंटिग्रेटेड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ग्रुप ऑफ कंपनी, जीएस जॉब सोल्युशन, एस टेक्नॉलॉजी, डुआर्ज एच आर सर्व्हिसेस, हिंदू रोजगार डॉट कॉम, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, कोटक महिंद्रा, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक, कल्पवृक्ष, एलआयसी ऑफ इंडिया, आदित्य बिर्ला कॅपिटल आदी कंपन्यांनी आज या मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रिक्त जागा नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध केल्या. आज मेळाव्यामध्ये साधारण 304 उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांनी केली, तर पंधरा उमेदवारांची नोकरीसाठी अंतिम निवड करण्यात आली. उर्वरित उमेदवारांची निवडप्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहील. राज्य शासनाच्या विविध आर्थिक विकास मंडळांनी मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी विविध कर्ज योजनांची माहिती उमेदवारांना दिली.


5 लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा


            मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात 5 लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात 300 रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.


            मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमित साटम, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, विद्यानिधी शाळेचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, उपाध्यक्ष रमेशभाई मेहता, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, आशिष वाजपेयी, मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.वा. खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.


 


००००

लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ''महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन

 लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ''महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन.

        मुंबई, दि. 28 : यंदाच्या वर्षी “ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” हा विषय चित्ररथाव्दारे महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिमाखात सादर केला.


            यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन पिठाचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दाखविण्यात आली होती.


            चित्ररथाला दोन प्रकारचे पुरस्कार असून पहिल्या प्रकारचा पुरस्कार तज्ञ समितीच्या अहवालावरुन मिळेल तर दूसऱ्या प्रकारचा पुरस्कार लोकप्रिय चित्ररथ या सदराखाली लोकांनी ऑनलाईन मत (वोटिंग) नोंदविल्यानुसार मिळेल. त्यामुळे या लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


            लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन :


            साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या महाराष्ट्राच्या चित्ररथाला क्रमांक 1 च्या पसंतीसाठी आपल्या मोबाइल क्रमांकावरुन खालीलप्रमाणे मेसेज मंगळवार दि.31.1.2023 च्या रात्री 11.45 वाजेपर्यंत पाठवावा.


            MYGOVPOLL337011,12 हा SMS 7738299899 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा.


            MYGOVPOLL (Space) 337011,12


किंवा


(आपणास खालील लिंकवर जावून “महाराष्ट्र” या नावासमोर आपले ऑनलाईन मत नोंदविता येईल: https://www.mygov.in/group-pool/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/ )


            आपण वरीलप्रमाणे Online voting करावे व त्यानंतर आपल्या संपर्कातील सर्वांना असे करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp Group), फेसबुक (FB), व इतर समाज माध्यमांव्दारे हा संदेश पुढे पाठवावा आणि महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी विनंती करावी.  


0000


 

खेड्यामध्ये घर कौलारू

 एक साधं मातीच्या भिंतींना शेणाने सारवलेलं कौलारू घर , उन्हाळ्यात थंड अन् हिवाळ्यात उबदार , हवेशीर भरपूर उजेड येणारं , मोकळं , पैस , अनावश्यक वस्तूंची दाटी नसलेलं....


दोन चुलींचं स्वयंपाक घर , फळ्यांवर मोजकी पितळेची चकचकीत लहान मोठी भांडी आणि भिंतीला टेकवून ठेवलेल्या धान्याच्या कोठ्या....


स्वयंपाकघराला लागून जवळच एक ताज्या फुलांनी सजवलेलं , नाजूक पितळेच्या समईतील तेजस्वी ज्योतीने प्रकाशित झालेलं , उदाच्या सुगंधाने घर व्यापून टाकलेलं छानसं प्रसन्न देवघर ..


बाजूच्या खोलीत रजया अंथरून ठेवलेल्या दोन खाटा , भिंतींवर दोन चार खुंट्यांवर अडकवलेले मोजके कपडे , खाली कडेला दोन एक लोखंडी पेट्या बस एवढंच


मागे आडाची गोड्या पाण्याची विहीर , तिच्या आजूबाजूला पपई केळीची झाडे , साचलेल्या सांडपाण्यात फोफावलेला हिरव्या गार मोठ्या पानांचा अळू , मागे भरलेली कणसे डोलत असलेलं ज्वारीचं शेत....


घराच्या उजव्या बाजूला दहा फुटावर जनावरांचा कौलारू गोठा , रोज ताजा हिरवागार चारा खाऊन सुधृढ धष्टपुष्ट असलेल्या गायी म्हशींनी व्यापलेला , त्या मागे मोठ्या आंब्याच्या शेकडो झाडांची दाट हिरवीगार आमराई ...


डाव्या बाजूला बैलं मोकळी करून ठेवलेल्या बैल गाड्या , नांगरं आणि शेतीची इतर अवजारं , त्या मागे पेरु ची बाग , घराजवळच मांडवांवर चढवलेली काकड्या , कार्ली , दुधी नी लदबदलेली वेली , परिसरात अधे मधे चिचं , लिंबू , बोरं , आवळा अशा विविध फळांची झाडे...


घरासमोर वाळलेला चारा कौलारू छतावर पसरवलेली प्रशस्त हवेशीर पडवी ज्यात फक्त बसाय उठायला दोन चार खाटां अन् भिंती शेजारी थंडगार पाण्याचा काळया मातीचा माठ ....


बस , हीच काय ती प्रॉपर्टी ...


सकाळी सूर्योदयापूर्वी ताजे तवाने होऊन उठायचं की एका पाठोपाठ एक कामे सुरु...


गोठ्याची स्वच्छता , जनावरांची देखभाल , दूध संकलन झालं की समोरच्या पडवीत बसून नाश्ता...


नाश्ता म्हणजे काय , गूळ शेंगदाणे , ऋतू नुसार चुलीवर भाजलेले सोलाणे , हुरडा , वाटाणे , दही , भरीत , काकडी पेरु , त्यावर चुलीवर ताजं तापवलेल वाडगं भर दूध


सूर्य डोक्यावर येई पर्यंत शेतात किंवा मळ्यात कष्टाचं काम , आल्यावर चुलीवरचं ताजं जेवण कांदा भाकरी भरीत पिठल्याचं , मग थोडी वामकुक्षी की पुन्हा काम , सुर्यास्ताला कामं आटपून पडवीत येऊन निवांत हवेशीर बसायचं , फलाहार करायचा , पुन्हा हलका फेरफटका मारुन येऊन जेवायचं अन् लवकरच झोपायचं ..!


 जीव थकलेला , छान झोप लागते स्वस्थ ..!


सकाळी उठले की पुन्हा रूटीन सुरू...


एवढं सरळ साधं सोपं छान आयुष्य , ताजं स्वतः पिकवलेलं उच्य प्रतीचं पौष्टिक अन्न खाऊन , छान शुद्ध हवेत आरोग्याला पोषक अस हे सुखी जीवन


दगदग , टेन्शन , धावपळ , पळापळ , खाण्या पिण्याची हेळसांड , तब्येतीच्या तक्रारी ह्या पासून दूर...


ते सगळं आपण शहरी लोकांनी ओढवून घेतले आहे विनाकारण आपल्या अंगावर आपल्या नाही त्या गरजा वाढवून


त्या पूर्ण करता करता सुख शांती गमावून बसलो आहोत आपण , तब्येतीची वाट लावून बसलो आहोत आपण ..!


सरळ साधं आयुष्य गुंतागुंतीचं करुन बसलो आहोत आपण


स्पर्धा , अहंकार , क्रोध , द्वेष , मत्सर , हाव ह्या सगळ्यांना हृदयात कायमची जागा देऊन बसलो आहोत आपण


ह्यातून परतीचा सोपा मार्ग एकच , आपल्या गरजा कमी करण्याचा जो गमावून बसलो आहोत आपण...


आयुष्य होतं निवांत जगण्यासाठी जे धकाध


कीचं करून बसलो आहोत आपण....

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लिखित ‘भारत मार्ग’ पुस्तकाचे

 परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लिखित ‘भारत मार्ग’ पुस्तकाचे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली-उपमुख्यमंत्री.

       मुंबई, दि. 28 : भारत मार्ग हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारीत सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


         विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित 'द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड' या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद 'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर, विजय चौथाईवाले, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ.गिरीश आफळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.


         युरोपचा विचार म्हणजे जगाचा विचार नाही हे सुनावण्याचे काम परराष्ट्रमंत्री डॉ.जयशंकर यांनी केले, ही खंबीरता भारताच्या परराष्ट्र मंत्र्यात अनेक वर्षांनी पहायला मिळाली असे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे धोरण देशाहिताचा विचार करणारे असून कोणाच्याही दबावात येणारे नाही हे जगाला दाखवून दिले. भारत जगाच्या पाठीवर मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे आणि त्याचवेळी अमेरिका किंवा रशिया यांच्या दबावात ज्यांना यायचे नाही असे सगळे देश मोदींजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारताच्या पाठीशी उभे आहेत. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे.

जगातील देशांचा विश्वास हेच आपले यश

      जी-२० पूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चर्चा करून आपली भूमिका भारताने मांडावी असे सांगतात तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना पंतप्रधानांसोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या डॉ.जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे ही पर्वणी आहे, असे त्यांनी सांगितले.


परराष्ट्र धोरणासंदर्भात भारतीय विचार दर्शविणारे पुस्तक


       उपमुख्यमंत्री म्हणाले, पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन ओझी सांगितली आहेत. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही पुस्तकात आहे. आत्ताची भूराजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात आहे.


       अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रभावीपणे लेखन झालेल्या पुस्तकाचा तितक्याच सोप्या आणि सुंदर भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. विविध समूहांना भारताचा विचार या पुस्तकातून समजेल. जागतिकीकरणाच्या संपूर्ण परिस्थितीत भारताची भूमिका स्पष्टपणे कळली पाहिजे. परराष्ट्र धोरणाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो म्हणून त्याची माहिती प्रत्येकाला मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने हे पुस्तक महत्वाचे असून ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले. 

क्षमता आणि सहकार्याचा भारत मार्गच देशासाठी उपयुक्त-डॉ.एस.जयशंकर


           परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर म्हणाले, जागतिकीकरण हे आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारतमार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.


परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्वाची सूत्रे


         स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशातील भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत भारताने हेच केले. विविध क्षेत्रात सामंजस्य प्रस्थापित करताना आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारनुसार जगाच्या कल्याणाचा विचार योग्य ठरतो, हा विचार भारत मार्ग दर्शवतो.


सर्व राज्यांच्या कल्याणाच्या विचार करणारे परराष्ट्र धोरण हवे


            चांगले परराष्ट्र धोरणासाठी देशातील राज्यांचाही सहभाग आणि सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार असायला हवा. परराष्ट्र धोरण ठरवतानाही सामान्य जनांच्या भावनादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. इतिहासापासून आपल्याला शिकायला हवे, लक्षात ठेवायला हवे, त्याची समीक्षा व्हायला हवी. भविष्यात जगाच्या बाबतीत जागरूक रहायला हवे. जग आज आपल्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. जगात होणाऱ्या घटनांचे परिणाम आपल्या देशावरही होतात. जग बदलत असताना आपल्यालाही त्या वेगाने बदलावे लागेल आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढीला जगाच्या बाबतीत अधिक माहिती असणे आवश्यक आहे.


       चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनिती तयार करावी लागेल. जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल असे पुस्तकात मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


       श्री.चौथाईवाले यांनी यावेळी ‘भारत मार्ग’ या पुस्तकाविषयी माहिती दिली. पररराष्ट्र धोरणाविषयी अत्यंत सोप्या शब्दात मांडणी पुस्तकात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


       डॉ.आफळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भारतीय विचार साधनाने आतापर्यंत 630 पुस्तके प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्रकाशन संस्थेसाठी असलेला श्री. पु. भागवत पुरस्कार मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली.


       तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या सविता आठवले यांचा परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


000

Featured post

Lakshvedhi