Tuesday, 16 August 2022

 


स्वराज सप्ताह.

 स्वराज्य सप्ताह अंतर्गत 17 ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम.

            मुंबई, दि. 11: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्यभर समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे.


            राज्यातील खाजगी, शासकीय आणि इतर सर्व प्रकारच्या शाळा/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था/विद्यापीठे यामधील विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग असेल. सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल आणि सकाळी 11 ते 11.01 मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अनिवार्य असेल. समूह राष्ट्रगीताच्या वेळी राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक असून याबाबत नागरिकांमध्ये सर्व स्तरावर जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

            खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था,शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभागी होणे आवश्यक राहील. शाळा/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था/विद्यापीठे यामधील विद्यार्थ्यांना अगोदरच माहिती देणे आवश्यक आहे. सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था/शासकीय आणि निम शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदर उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य असल्याचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


           

ध्वजारोहण.

 मुंबई उपनगरात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण.

मुंबई,दि. 15 : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटन, कौशल्‍य विकास व उद्योजकता, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व) येथे झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यास आमदार झीशान सिद्दिकी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त डी.एस.स्वामी, पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2019-20 मध्ये उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात रेयान इंटरनॅशनल स्कूलची खुशी रविंद्र वांडीले, ॲटोमिक एनर्जी स्कूलची श्रीष्टी रजीतराम यादव, विद्याभवन हायस्कूलचा जय गंगाधर गायकवाड, रेयान इंटरनॅशलन स्कूलचा केशव कमलेश माहेश्वरी, रेयान इंटरनॅशनल स्कूलचा रिषभ रामचंद्र गुप्ता, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा आर्य विनय साहनी, डॉन बास्को हायस्कूलचा अरिन प्रशान वेलींग, डॉन बॉस्को हायस्कूलचा सोहम समीर पालकर आणि ए.पी.संघ सुविद्यालयाचा तेजस जगदिश लांडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ७५ फूट राष्ट्रध्वजाचे अनावरण मंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते इलेक्ट्रिक कळ दाबून स्वयंचलित पद्धतीने करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव शिल्पाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्याचे आले. त्यानंतर मंत्री श्री.लोढा यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महात्मा गांधी विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका दिपिका गावडे यांनी केले.

00000



सुप्रभात

 🙏 जितके मोठे मन❤ तितके सोपे जीवन... वादाने अधोगती संवादाने प्रगती... जग काय म्हणेल हा विचार करु नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात. आणि यशस्वी लोकांना विरोध करतात.!!

     🙏तुमचा दिवस सुखाचा जावो 🙏

            🌹 *शुभ सकाळ* 🌹

ध्वजारोहण

 स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्तविधान भवन येथे ध्वजारोहण.

मुंबई, दि.15: विधान भवन, मुंबई येथे आज स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, राहूल नार्वेकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.


       या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव (समिती) तथा वि.का.अ. अनिल महाजन, उप सचिव विलास आठवले, शिवदर्शन साठ्ये, ऋतुराज कुडतरकर, मेघना तळेकर, राजेश तारवी, ना.गो.थिटे, अध्यक्ष यांचे सचिव महेंद्र काज, उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. विधानमंडळाच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूला करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने या वास्तूचे सौंदर्य उजळून निघाले आहे.


000

शुभेच्छा

 पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा


           मुंबई दि. 15 : पारशी नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या असून देशाच्या विकासातील पारशी समाजाचे महत्त्वही अधोरेखीत केले आहे.


पतेती सण व पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘व्यापार ही पारशी बांधवांची अंगभूत कला असल्यामुळे देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. समाजातील अनेक यशस्वी उद्योगपतींनी युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सामाजिक दायित्वचे भान राखत सामाजिक उपक्रमांमधील त्यांचा सहभागही उल्लेखनीय आहे.’


यंदाचा पतेती सण व नववर्ष सर्व पारशी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येईल, अशा भावनाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.



शपथ प्रगतीची

 Continue ....  शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चांगली अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. आमचे गुरुजी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यात वर्गामध्ये शिक्षकांचे छायाचित्र लावण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना शिक्षकांची ओळख होईल. राज्यातील कोणतीच शाळा एक शिक्षक राहणार नाहीअसे नियोजन आम्ही केले आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले                             .                    शहरी भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी

राज्यातील शहरी भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी पीएम गती शक्ति मॉडेलचा उपयोग देखील आम्ही करणार आहोत. राज्यात ग्रीन फिल्ड शहरे निर्माण करण्यावर भर देत आहोत. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग विकासाचा महामार्ग ठरेल यात काही शंकाच नाही. येत्या काही दिवसांत या महामार्गाचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल.

पाणीघरे यांना प्राधान्य

पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशनसारख्या योजनेची ७५ टक्के अंमलबजावणी झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून आम्ही बेघरांना निवारा दिला आहे. पोलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.  

कौशल्य विकासास प्राधान्य

राज्यात उद्योग- रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकतीच रतन टाटा व इतर उद्योजकांशी भेट घेऊन चर्चा केली आहे. कौशल्य विकासास प्राधान्य देणार असून त्याद्वारेही रोजगार कसा वाढेल हे आम्ही पाहणार आहोत. आज सकाळीच मी स्टार्टअप व नाविन्यता यात्रेला झेंडा दाखवून सुरुवात केली आहेअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन

कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे सागरी किनाऱ्यालगतच्या पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचे आहे.  याशिवाय स्थानिकांना रोजगार देखील मिळणार आहे. हे लक्षात घेता येत्या वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणण्यासाठी नियोजन करणे सुरू आहे.

गेल्या दीड महिन्यात आम्ही जनहिताचे निर्णय घेतले आहेत. लोकांच्या हिताची कामे थांबविलेली नाहीत. शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देत आहोत. विद्युत वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करीत आहोत. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना सवलत दिली आहे. ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनांतील भूमीहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी सवलती दिल्या आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) दुसरा टप्पा राबविणार आहोत. प्लॅस्टिकला पूर्णपणे बंदी घातली आहे. एमएमआरडीएला 50 हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास मान्यता दिली आहेत्यामुळे प्रकल्पांना वेग आलेला दिसेल.

आज कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही. कोविडचा बूस्टर डोस मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे हयगय  करू नका. कोविड लसीमुळे या जीवघेण्या संकटातून संरक्षण मिळते आहे हे कृपया लक्षात घ्याअसे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

ध्वजारोहण समारंभानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राजमाता जिजाऊछत्रपती शिवाजी महाराजभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्रालयातील प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

००००


Featured post

Lakshvedhi