राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे काम सर्वांसाठी आदर्श
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
· राज्यातील उत्तम काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
मुंबई, दि. 3 : कोरोना काळात राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ( NSS ) स्वयंसेवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट कार्य केले असून त्यांचे काम आपणा सर्वांसाठी आदर्श असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होतो. त्यावेळी श्री.सामंत बोलत होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, कोरोना काळात राज्यातील सर्व विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान दिले आहे. एनएसएस स्वयंसेवकांनी, पोलीस मित्र, आरोग्य मित्र, महसूल मित्र म्हणून काम केले आहे. तसेच रक्तदान शिबीर, जनजागृती अभियान, परिसर निर्जंतुकीकरण , गरजूंना मास्क वाटप, भोजनाची व्यवस्था, अन्न वाटप, औषधांचे वाटप अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविले आहेत.
सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे ही जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा एकूण 37 एनएसएस स्वयंसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मान होणार आहे. त्यानंतर यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 13 कोविड योद्ध्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे, असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
राज्यामध्ये सामाजिक चळवळ निर्माण करण्यात एनएसएसचा मोलाचा वाटा असून राज्यातील एनएसएसचा आदर्श देशभरातल्या इतर राज्यांनी घ्यावा, असे काम राज्यातील चार लक्ष स्वयंसेवक करीत असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी, प्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णी, एनएसएस सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभू, प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड, एनएसएस राज्य संपर्क अधिकारी प्रभाकर देसाई, कार्यक्रम समन्वयक सुधीर पुराणिक, सिनेट सदस्य, पुरस्कारार्थी विद्यार्थी आणि संबंधित उपस्थित होते.
00000
"महा आवास अभियान-ग्रामीण" पारितोषिक वितरण
विकासयोजना राबविताना कोकण विभाग राज्यात अग्रेसर
-विभागीय आयुक्त विलास पाटील
नवी मुंबई, दि.03 : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकासयोजना राबवितांना सुसंवादाचे वातावरण ठेवले तर मोठे कार्य उभे राहते. कोकण विभाग शासकीय विकासयोजना राबवितांना राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असतो. असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री.विलास पाटील यांनी केले.
“महा आवास अभियान-ग्रामीण" अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत मूल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना कोकण भवन येथे "महा आवास अभियान-ग्रामीण" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळयाच्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास श्रीम.पुष्पाताई पाटील अध्यक्ष, जिल्हा परिषद ठाणे,श्रीम. वैदही विशाल वाढाण अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर, श्रीम. योगिता पारधीमा अध्यक्ष, जिल्हा परिषद रायगड,श्रीम. संजना सावंत अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्री.भाऊसाहेब दांडगे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.ठाणे, श्री.सिद्धराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर, श्री.डॉ.किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रायगड, श्रीम.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रत्नागिरी, श्री.प्रजित नायर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सिंधुदुर्ग, श्री.गिरीश भालेराव उप आयुक्त(विकास), श्री. मनोज रानडे उप आयुक्त (सामान्य), श्री. मकरंद देशमुख उप आयुक्त (महसुल), श्री. डी. वाय.जाधव उप आयुक्त (आस्थापना), श्री.चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर , श्री.रणधीर सोमवंशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रायगड/प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, रायगड श्री.दादाभाऊ गुंजाळ प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, ठाणे, श्री.माणिक दिवे प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, पालघर, श्रीम.नंदिनी घाणेकर प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, रत्नागिरी श्री. राजेंद्र पराडकर प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, सिंधुदुर्ग आदि मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आयुक्त श्री.विलास पाटील म्हणाले की, कोकण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक ऊर्जा ठेवून यापुर्वीही काम केले आहे. अशीच ऊर्जा पुढेही ठेवावी. कोकण विभाग नेहमीच शासकीय योजना राबविण्याबाबत आघाडीवर असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोकणातील आदर्श व सुंदर गावे आहेत. कोकणाला नेहमीच स्वच्छतेची आवड आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करतांना आयुक्त श्री.पाटील म्हणाले की, विकासकामे करतांना जिल्हा परिषद, पंचायत समिती व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते.
आगामी गणेशोत्सव लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळयांनी जागरुक राहून शासनाचे नियम पाळणे आवश्यक आहेत. लोकप्रतिनिधींनी तळागाळापर्यंत कोरोनाबाबत जनजागृती करावी. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली
सन 2020-21 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात दि. 20 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दि.20 नोव्हेंबर, 2020 ते 5 जुन, 2021 या कालावधीत “महा आवास अभियान ग्रामीण " राबविण्यात आले. अभियानात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ठाणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून संपूर्ण अभियानादरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्वात जास्त पारितोषिके पालघर जिल्ह्याला मिळाली आहेत.
पारितोषिक प्राप्त संस्था पुढीलप्रमाणे
प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे, द्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरी, तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद रायगड.
राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरी, द्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद सिंधुदूर्ग, तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे.
सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती म्हसळा जि.प.रायगड, द्वितीय क्रमांक-पंचायत समिती दापोली, जि.प.रत्नागिरी, तृतीय क्रमांक-पंचायत समिती कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग,
राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती मोखाडा जि.प.पालघर, द्वितीय क्रमांक-पंचायत समिती तलासरी, जि.प.पालघर, तृतीय क्रमांक-पंचायत समिती वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग,
प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत वाडोस, ता.कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत आखवणे भोम, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग, तृतीय क्रमांक- ग्रामपंचायत सडुरे शिराळे, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग.
राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत अणाव, ता.कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत मांगवली, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग, तृतीय क्रमांक- ग्रामपंचायत उमरोली, ता.पालघर, जि.प.पालघर.
प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजना - सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था प्रथम क्रमांक- उमेद- ता. जव्हार, जि.पालघर द्वितीय क्रमांक- उमेद- ता.वाडा, जि.पालघर तृतीय क्रमांक- उमेद- ता. डहाणू, जि.पालघर.
प्रधानमंत्री आवास योजना-शासकिय जागा उपलब्धता- प्रथम क्रमांक-तहसिलदार, ता.कल्याण,जि.ठाणे द्वितीय क्रमांक- तहसिलदार, ता.शहापूर, जि.ठाणे तृतीय क्रमांक-निरंक,
कोकण विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल पुढीलप्रमाणे आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत चिंचवली, ता.भिवंडी, जि.प.ठाणे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट गृहसंकुल प्रथम क्रमांक- श्रीम.सखुबाई दाजीबा निकम, ग्रा.पं. मुणगे, ता.देवगड, जि.प.सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहेत.
अभियानातील कार्पोरेट संस्थासाठी देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट जिल्हा पालघर रोटरी डिस्ट्रीक्ट 3141 “अशियाना” ता.वाडा जि.पालघर यांना घोषित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळयास पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त वित्तीय संस्था आणि जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न केलेले तहसिलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते. कोरोना नियम पाळून पारितोषिक वितरण कार्यक्रम करण्यात आला.