Saturday, 21 August 2021

 डेल्फिक कौन्सिलच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण संपन्न

डेल्फिक कौन्सिलने महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जतन करावा: राज्यपाल

 

          मुंबई,दि.२१: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी डेल्फिक कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेच्या बोधचिन्हाचे (लोगो) शनिवारी (दि. २१) राजभवन येथे अनावरण केले. कौन्सिलच्या माध्यमातून राज्यात कलाकार, सांस्कृतिक संघटना व समूहांना दृकश्राव्य कला व साहित्य कला सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. 

       महाराष्ट्र ही कला, नृत्य, वादनकला व संस्कृतीची खाण असून डेल्फिक कौन्सिलच्या राज्य शाखेच्या माध्यमातून राज्याच्या कला, आदिवासी कला, संस्कृती व सिनेमाला चालना मिळेल. कौन्सिलने राज्याचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जगासमोर आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले.

            कार्यक्रमाला खासदार हेमा मालिनी, नेशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष अभिनेते परेश रावल व डेल्फिक कौन्सिलचे महाराष्ट्र अध्यक्ष व भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी साहिल सेठ प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य डेल्फिक कौन्सिलचे सदस्य अभी मित्तल, सुरेश थोमससिने निर्माते अली अकबर सुलतान अहमद व चित्रपट क्षेत्रातील अनेक लोक यावेळी उपस्थित होते.

       आंतरराष्ट्रीय डेल्फिक कौन्सिल ही एक जागतिक स्वयंसेवी संघटना असून कला व संस्कृतीच्या माध्यमातून जगभरात सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी काम करीत आहे.

            डेल्फिक कौन्सिलच्या वतीने विविध कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या डेल्फिक गेम्सचे आयोजन करण्यात येते. डेल्फिक गेम्सची सुरुवात ग्रीस देशातील डेल्फिक येथे ऑलिम्पिकचे जुळे भावंड म्हणून २५०० वर्षांपूर्वी झाली.

            ऑलिम्पिकमध्ये जसा क्रीडा प्रकारांचा समावेश होतो तसा डेल्फिक गेम्समध्ये कला व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होतो. भारतात २२ राज्यात डेल्फिक कौन्सिल्सची स्थापना करण्यात आली असल्याचे साहिल सेठ यांनी सांगितले.

 

Maha Governor, Hema Malini launch Delphic Council Logo

 

     The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari launched the logo of the Delphic Council of Maharashtra of Maharashtra at Raj Bhavan, Mumbai on Saturday (21st Aug).

      Member of Parliament Hema Malini, Chairperson of National School of Drama Paresh Rawal and President of the Delphic Council Maharashtra IRS officer Sahil Seth were present.

      Speaking on the occasion Governor Koshyari said Maharashtra is a repository of music, theatre, performing arts and tribal art. He expressed the hope that the Delphic Council of Maharashtra will promote arts, cinema and culture of Maharashtra.

      State Council Members Abhi Mittal, Suresh Tomas and film producer Ali Akbar Sultan and members of the film industry were also present.

      The Delphic Council Maharashtra is the State chapter of the International Delphic Council, which is a worldwide organisation promoting harmony among people through arts and culture. The Council organizes Delphic Games covering various areas of arts and culture.

      According to Sahil Seth, the Delphic Games were launched in Delphi in Greece 2500 years ago as the twin sister of the Olympic Games. He said the Delphic Games are to art and culture what Olympic Games are to physical sports.

0000

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

 

            मुंबई,दि. २१ आज वीस रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. एमएमआरडीए प्रशासकीय इमारतीशेजारी हा लोकार्पण कार्यक्रम झाला. १४ रुग्णवाहिका स्वदेश फाउंडेशनचे संचालक रोनी स्क्रुवाला३ रुग्णवाहिका पुणे शहर शिवसेना यांच्यातर्फे तर २ रुग्णवाहिका आमदार रवींद्र वायकरआणि १ रुग्णवाहिका माजी नगरसेवक शैलेश फणसे यांच्याकडून देण्यात आली आहे. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेपरिवहन मंत्री अनिल परबआमदार रवींद्र वायकरमहापौर किशोरी पेडणेकर आदींची उपस्थिती होती.

00000

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

कलिना विद्यापीठ परिसरात मुलांसाठी कोविड काळजी केंद्र सुरु

कोविडचा धोका टाळण्यासाठी जबाबदार नागरिक बना

------------------------

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्व थरांतील नागरिकांना आवाहन

            मुंबई, दि. २१ : कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. ते आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटीपार्कमध्ये उभारण्यात आलेल्या लहान मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करतांना बोलत होते.

            केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.

            मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या लाटेच्या शेवटी सणवार आले होते पण आता दुसरी लाट ओसरता ओसरता सण-उत्सवांची सुरुवात होते आहे. त्यात आपण गेल्या पंधरा दिवसांपासून निर्बंध शिथिल केले आहेतपण ही मोकळीक आपले दैनंदिन पोटापाण्याचे व्यवसाय सुरु राहावेतअर्थचक्र थांबू नये म्हणून आहे. आपल्याला संसर्ग आणि मृत्यू दर आणखी कमी करायचा आहे. त्यामुळे कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घ्या.

            आज लोकार्पण होत असलेल्या कोविड काळजी केंद्राविषयी समाधान व्यक्त करून ते म्हणाले कीतिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असल्याने राज्य शासनाने लहान मुलांसाठी कोविड टास्क फोर्स स्थापन केला असून असा टास्क फोर्स स्थापन करणारे आपले पहिले राज्य आहे. मुंबईत आधुनिक अशी जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून आपल्याला संसर्गाविषयी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित आणि त्वरेने माहिती मिळत राहील असेही ते म्हणाले.

            आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून हे केंद्र उभारण्यात आले असून ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

असे आहे लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र

            कलिना विद्यापीठ आय.टी. पार्क येथे उभारण्यात आलेले लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र हे पाच हजार चौरस फूटांचे असून रुग्ण खाटांची संख्या ३०  आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्रशस्त जागा आहे. हे केंद्र कोरोनाग्रस्त लहान मुलांना अलगीकरण व त्यांच्या उपचाराकरिता तयार करण्यात आले आहे. याठिकाणी स्तनदा मातांना स्तनपानाकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त मुलांसोबत पालकांनाही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. या कोरोना काळजी केंद्रात २४ तास स्वच्छता व सुरक्षितेसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांवर महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी लहान मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे. मुलांसाठी मनोरंजन उपक्रम उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

            या केंद्रात लहान मुलाना दवाखान्यात आल्यासारखे वाटू नये व आनंददायी वातावरण असावे असा प्रयत्न  करण्यात आला आहे. रंगीबिरंगी भिंतीवेगवेगळी खेळणीकार्डबोर्डचे बेड्सआदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

            आजच्या कार्यक्रमासपरिवहन मंत्री अनिल परबआमदार संजय पोतनीसमहापौर श्रीमती किशोरी पेडणेकर आदींची उपस्थिती होती. 

            000000

 आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी


मुलुंड शासकीय आयटीआय आणि आयटीसी हॉटेल लिमीटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार


युवक-युवतींना प्रशिक्षणाबरोबरच शाश्वत रोजगाराची संधी


                                             -   कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक


 


मुंबई, दि. २१ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकीत हॉटेलांची श्रृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमीटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत मुलुंड आयटीआयमध्ये फुड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हीस असिस्टंट या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना आयटीसी हॉटेल लिमिटेडमार्फत सहा महीन्यांपर्यंत अद्ययावत असे ऑन द जॉब ट्रेनिंग घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.


युवक-युवतींना फक्त प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना शाश्वत रोजगाराची उपलब्धता होणेही गरजेचे आहे. त्यासाठी आयटीआयसोबत विविध औद्योगिक आस्थापनांचे सामंजस्य करार करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये अशाच पद्धतीने प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत निर्णय घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक नामांकीत संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले.


सामंजस्य करारावर मुलुंड आयटीआयचे प्राचार्य प्रदीप दुर्गे आणि आयटीसी हॉटेल लिमिटेडचे व्यवस्थापक (एचआर) धनंजय कुलकर्णी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे मुलुंड आयटीआयमधील फुड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हीस असिस्टंट व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण प्राप्त होऊन हॉस्पीलिटी सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्राप्त होणार आहे. ड्युएल सिस्टीम ट्रेनिंग पद्धतीअंतर्गत हा सामंजस्य करार करण्यात आला असून यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआयमधील सैद्धांतिक प्रशिक्षणाबरोबरच औद्योगिक आस्थापना, कॉर्पोरेट तथा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची सुविधा प्राप्त होते. 


याप्रसंगी मुलुंड आयटीआय संस्थेच्या अंतर्गत डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच संगणक कार्यशाळेचे (आयटी लॅब)  मंत्री श्री. मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर मियावाकी वृक्षारोपणाची पाहणी आणि वृक्षारोपणही करण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक डॉ. अ. म. जाधव, संस्थेचे उपप्राचार्य संदीप परदेशी, निरीक्षक अनिल सदाफुले यावेळी उपस्थित होते.


दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील सर्व शासकीय तसेच खासगी आयटीआयसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया सुरु असून इच्छूक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


००००

 *बाभळीची पावडर उपलब्धता* 


 *मुंबई, बोरिवली पश्चिम*


 आजकाल, जवळजवळ प्रत्येक घरात आईवडिलांचे, वयस्कर लोकांमधे गुडघेदुखीची समस्या असतेच असते. आणि त्याकरीता डॉक्टर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊन मोकळे होतात. ज्यामुळे त्यांता धंदा जोरात चालावा ज्याची किंमत आपल्याला दोन ते तीन लाख रुपये लागते.

आणि एवढं महागडं ऑपरेशन करून ही काहींना फारसा फरक पडत नाही, दुखायचं बरं वाटंत नाही,


 यासाठी सर्वात स्वस्त, चांगला आणि सोपा उपाय म्हणजे:- *बाभूळ बि ची पावडर* कोमट पाण्यात  एक चमचा पावडर मिसळा आणि दुपारी आणि रात्री जेवणानंतर या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी घ्या...

*शस्त्रक्रियेची अजिबात गरज नाही...*

*गुडघेदुखी पुर्णपणे बरी होते व रूग्ण ठणठणीत होऊन चालायला लागतो...*


*लाखो रूपयांचे व शरिरीक नुकसान ही होण्याचे वाचते...*


 200 ग्रॅम पॅकिंग पावडर मिळते.

 फक्त ₹.30.00  प्रति पॅक


*ही पोष्ट मी आपणांस रूग्णसेवा, जनसेवा या हेतूने पाठवित आहे, यामध्ये माझे  कमिशन किंवा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही... कॄपया गैरसमज नसावा...*


 पावडर मिळण्याची जागा

 👇👇👇👇👇👇👇


  *उमेश पी दोशी*

 फ्लॅट: 52, B3 मानसरोवर CHSL, मानेक नगर, पंजाबी लेन, OPP- येस बँक, बोरिवली पश्चिम, मुंबई - 400092.

 मो - 9370231838

 **********************

 स्वस्तिक जैन जागृती परिवार (साबरमती) अहमदाबाद यांच्या सहकार्याने सेवाकार्य चालू आहे, जैन साधू भगवंतो-साध्वीजी महाराज मार्फत दिले जाईल. *बाभूळ बी पावडर* घेतल्याने वेदना दूर होतात, कोणतेही दुष्परिणाम नाहीत. हे सेवेचे काम आहे.. ही माहिती पुढे पाठवा, जेणेकरून कोणीतरी मोठी रक्कम खर्च करण्याचे टाळू शकेल.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 बाजीरावांचा आम्हाला ठाउक नसलेला इतिहास! वाचून अंगावर रोमांच उभे राहीले नाहीत तरच नवल!!!!!


आपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक

आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की,

बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त

मस्तानी. ह्या मस्तानीचं गारुड एवढं काही

गडद आहे की, त्यापलिकडचा बाजीराव

आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो.

वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा

पेशवा झालेला हो! अवघं ४० च वर्षांचं शापित

आयुष्य आणि त्यातही केवळ २० च वर्षांची

कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा! त्या

२० च वर्षांच्या काळात त्याने हिंदवी

स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं! जो संकल्प

थोरल्या महाराजांनी मनी धरला होता,

ह्या रणधीराने तो पूर्तीस नेला. महाराष्ट्रास

वाकुल्या दाखवत ४०० वर्षे खिजवणारी

दिल्ली जाळली, लुटली आणि फस्तच नव्हे, तर

अंकित केली ती ह्याच बाजीरावाने! मेघ

बेबंदपणे बरसू लागले की जसं जंगलात एकही पान

कोरडं राहू शकत नाही, तसा हा हिंदवी

स्वराज्याचा पंतप्रधान अवघ्या मुलुखभर तांडव

करत होता! राजमुद्रेतील शिवछत्रपतींना

अपेक्षित असलेले 'वर्धिष्णू' आणि 'विश्ववंदिता'

शब्द सार्थ करत होता. एवढ्या मग्नतेने की,

त्यापोटी वैयक्तिक आयुष्य, तहान-भूक सारं

सारं तुच्छ ठरलं आणि ह्या असमशौर्यधाम

वीराला मृत्यू आला तोही मोहीम

करतानाच!! पण हे आम्हाला शिकवलंच जात

नाही. शालेय इतिहासाच्या पुस्तकात

आमच्या राष्ट्रपुरुषांना स्थान दिलं न

दिल्यासारखं केलं जातं आणि रानटी मुघल

आक्रमकांच्या स्तुतीपोटी मात्र पानेच्या

पाने भरली जातात, ही इथली अवस्था आहे. अन्

वर आम्हीच चिंता करतो की, आमची पिढी

स्वदेशाभिमानी आणि कसदार का बरं होत

नाही!!

वास्तविक बाजीराव हा शतकानुशतकांतून

कधीतरीच उदित होणारा निष्णात सेनापती.

साक्षात रणपंडित!! ४० वर्षांचं आयुष्य, २०

वर्षांची कारकीर्द आणि ४१ लढाया; करा

कल्पना!! ह्या ४१ लढायांपैकी एकसुद्धा लढाई

न हरलेला नरपुंगव होता बाजीराव!! ४१ वेळा

अजिंक्य राहिलेल्या आणि तेही आपल्या

शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी युद्ध

करत अजिंक्य राहिलेल्या महारथीचा

आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे!

पण आम्ही करंटे मात्र बाजीरावाला प्रेमवीर

म्हणून रंगवतो. नाहीतर मग त्याची जात

पाहातो! वस्तुतः महापुरुषांची 'जात' नसते

पाहायची, तर त्यांनी जनसामान्यांच्या

मनामनात पेटवलेली अभिमानाची 'वात' आणि

त्यायोगे सबंध समाजाने टाकलेली 'कात'

पाहायची असते. हे आपण जेव्हा शिकू, तेव्हाच

इतिहास नावाचा खजिना आपल्या खऱ्या

स्वरुपात खुला होतो. उदाहरणार्थ - ब्रिटीश

फिल्डमार्शल Bernard Montgomery याने आपल्या

History of Warfare ग्रंथात बाजीरावाने

लढलेल्या पालखेडच्या युद्धाचं वर्णन 'A

masterpiece of strategic mobility' ह्या गौरवपूर्ण

शब्दांत केलंय! का बरं म्हणाला असेल तो असं?

मुळात दख्खनचा प्रांतपाल म्हणून आलेल्या आणि

नंतर स्वतःचीच असफजाही राजवट सुरु केलेल्या

निज़ामाने मराठ्यांच्या कोल्हापूर आणि

सातारा गाद्यांमधील दुफळीचा फायदा घेत

१७१९ चा सय्यद बंधूंशी झालेला मराठ्यांचा

करार मानायला नकार दिला. वर शहाणा

कोल्हापूरचे संभाजी आणि सातारचे शाहू

दोघांनाही म्हणू लागला 'तुमच्यातला खरा

छत्रपती कोण ते मी ठरवून देतो आणि त्यालाच

कराराप्रमाणे चौथाई-सरदेशमुखी घेता येईल'.

पंतप्रतिनिधींच्या कारस्थानामुळे कोल्हापूरचे

संभाजी निज़ामाला सामील झालेले.

महाराष्ट्राला लागलेला दुहीचा शाप, दुसरे

काय! पण शाहुंनी मात्र ह्या अपमानास्पद

गोष्टींना थारा द्यायचं नाही असं ठरवलं

आणि त्यावेळी कर्नाटकच्या मोहिमेवर

असलेल्या बाजीरावांना पाचारण केलं. ह्या

काळात निज़ाम स्वतः ऐवज़खानासोबत पुणे

जिल्ह्यात धुमाकूळ घालत होता. त्याचा

सरदार तुर्कताज़खान नाशिक व संगमनेर भागात

धुडगूस घालत होता. आणि रंभाजी निंबाळकर

साताऱ्यावर बरसत होता. स्वराज्यावर असं

चहुबाजूंनी संकट आलेलं असताना राऊंनी एक

अनोखाच निर्णय घेतला. १७२७ च्या दसऱ्याला

त्यांनी जे सीमोल्लंघन केलं ते विद्युद्वेगाने थेट

औरंगाबादच्या दिशेने आणि काही

समजायच्या आतच गोदावरीपल्याडच्या

निज़ामी प्रांताचा पार चुथडा करुन टाकला.

गडबडून गेलेला निज़ाम सारे सोडून

बाजीरावांच्या मागे! बाजीराव मात्र

वायुवेगाने हालचाली करत संचार करत होते.

वाटेत लागणारा निज़ामचा सर्व मुलूख फस्त

करत होते. बाजीरावांचा रोख पाहून

निज़ामाला वाटले की ते बुऱ्हाणपूरवर हल्ला

करणार. येडा सगळी तयारी करुन बसला, तर

बाजीराव त्याला वाईट चकवा देत पार

भरुचला उगवले!! वर अफवा पसरवून दिल्या की,

निज़ामशी हातमिळवणी करुन मी गुजरातवर

आक्रमण करतोय. निज़ामाशी उभा दावा

असलेला अलिमोहनचा सुभेदार सरबुलंदखान

हबकला, तर बाजीरावांनी त्याला अभय

दिल्याचे नाटक केले. कश्यात काही नसताना

निज़ाम हकनाक बदनाम झाला. तळतळून त्याने

पुणे प्रांत बेचिराख करुन टाकला. संभाजींना

छत्रपती घोषित केले. हेतू केवळ एकच की,

बाजीराव खुल्या मैदानात यावेत. कारण,

निज़ामाचा सगळा भर तोफखान्यावर.

त्याच्या वेगाला मर्यादा. बाजीराव सडे

स्वारी करणारे, मिळेल ती चटणी-भाकर

खाणारे आणि परमुलूख लुटून रसद मिळवणारे.

त्यामुळे त्यांच्या हालचाली जलद! ते कश्याला

निज़ामाला भिक घालताहेत? उलट निज़ाम

पुण्यावर आहे म्हटल्यावर बाजीराव थेट

औरंगाबादच्या दिशेने निघाले. पन्नाशी

उलटलेला पाताळयंत्री निज़ाम दुसऱ्यांदा

अवघ्या पंचविशीतल्या राऊस्वामींच्या

डावाला बळी पडला! आपला सारा

तोफखाना मागे अहमदनगरलाच ठेवण्याशिवाय

त्याला गत्यंतरच उरले नाही. तसाच

औरंगाबादच्या दिशेने धावला! नियती

खळखळून हसली असेल त्यावेळी!!

निज़ामाच्या एकूण एक हालचालींची वार्ता

गुप्तचरांमार्फत राऊंकडे पोहोचत होती.

बाजीरावांनी ताबडतोब गंगापूर आणि

वैजापूर लुटले व पालखेड येथे जाऊन स्थिरावले.

बिथरलेला निज़ाम पालखेडवर चालून आला.

मराठ्यांच्या चतुर पेशव्याला पालखेडचा भूगोल

व्यवस्थित ठाऊक होता. गावाच्या पूर्वेला

एकच नदी. ती राऊंनी ताब्यात घेतली.

गावाला पाणीपुरवठा करणारे सारे मार्ग

रोखले. निज़ामाची रसद मारली. मुलूख तर

केव्हाच फस्त केलेला. दग्धभू धोरण. सैन्य

घोड्याच्या नालेच्या आकारात विभागलेले.

निज़ाम चालून आला आणि अन्न नाही पाणी

नाही अश्या अवस्थेत बाजीरावांनी

लावलेल्या सापळ्यात अडकला. कुत्रे हाल

खाईनात अशी अवस्था झाली त्याची.

पोटात कण नाही आणि चारी बाजूंनी काळ

बनून उभे ठाकलेले मराठे!! दि. २५ फेब्रुवारी १७२८.

अतिप्रचंड सैन्य घेऊन आलेल्या निज़ामाने

अवघ्या पंचवीस सहस्र सैन्यासोबत लढणाऱ्या

पंचविशीतल्या तरुण पोरासमोर बिनशर्त

शरणागती पत्करली. बाजीरावांच्या

मेहेरबानीवर अत्यंत अपमानास्पद अवस्थेत

जायला वाट करुन दिली गेली त्याला. पुढे ६

मार्चला मुंगी-पैठणच्या शमानुसार त्याला

मराठ्यांची चौथाई-सरदेशमुखी तर परत

द्यावीच लागली, शिवाय मान तुकवून

शाहूंनाच छत्रपती म्हणून स्वीकारावे लागले!!

चातुर्याने हालचाली केल्या तर आपले

कमीतकमी नुकसान करुन रणमैदानात काय काय

चमत्कार करुन दाखवता येतात; याचे उत्तम

उदाहरण म्हणजे ही पालखेडची न झालेली

लढाई!! शिवरायांच्या युद्धनीतीचा विकास

ह्या हालचालींमध्ये दिसून येतो.

बाजीरावांनी ह्या युद्धाचे ठिकाणही

स्वतःच ठरवले, वेळही स्वतःच ठरवली आणि

कावेबाज म्हणून समजल्या गेलेला निज़ामाला

आपल्या तालावर अक्षरशः हवे तसे नाचवले!

याच मोहिमेने बाजीरावांचा आणि

मराठेशाहीचा डंका सर्वत्र वाजण्यास सुरुवात

झाली. अश्या कर्तबगार पेशव्याची आज

जयंती. यानिमित्ताने आज हा

मस्तानीपल्याडचा बाजीराव आठवूयात.

अभिमानाने फुलून जाऊयात!!

 राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठीत


            मुंबईदि.२१: जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्षसदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणुकीकरिता राज्य शासनास शिफारस करण्यासाठी मा.उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती डॉ. शालिनी शशांक फणसाळकर- जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षासाठी निवड समिती गठीत करण्यात आली आहेअशी माहिती  महिला व बाल विकास आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे.
            दिनांक २३ जुलै २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 च्या नियम 90 (1) मधील तरतुदीनुसार ही निवड समिती गठित करण्यात आलेली आहे. सदर समितीवर अध्यक्षपदी डॉ. फणसाळकर- जोशी तर सदस्य म्हणून अनिरुद्ध पुरुषोत्तम पाटीलगजानन नामदेव मुंढेश्रीम. निर्मला सांमत-प्रभावळकरविकास रावजी सावंतराज्य बाल हक्क संरक्षण आयोगमुंबई आणि महिला व बाल विकास आयुक्तपुणे असे एकूण 6 सदस्य आहेत. समिती बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 (2016 चा 2) मधील तरतुदीनुसार जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्षसदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणूकी करिता राज्य शासनास शिफारस करणार आहे.


0000


 🌹 *श्रीगणेश स्थापना* 🌹


मला परवापासून अनेक सदस्यांचे गणेश स्थापना मुहूर्त व अकस्मात येणाऱ्या अडचणीबद्दल फोन , मेसेज आले . मला आलेले प्रश्न व त्यांची दिलेली उत्तरे सर्वांना माहितीसाठी पाठवत आहे .


*अशोककाका कुलकर्णी*

*९०९६३४२४५१*


*प्रश्न क्र १ :-* गणेश स्थापना मुहूर्त कोणता ?

*उत्तर:-* गणेश स्थापना हे तिथीप्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शु. चतुर्थी दिवसभरात कधीही पण शक्यतो सूर्योदयापासून मध्यान्ही पर्यंत कधीही स्थापना करता येते . उशीर होणार असेल तर दुपारपर्यंत संकल्प करून दुपारी स्थापना झाली तरी चालेल . त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, स्थिर राशींचा कालावधि, भद्रा (विष्टि करण), चौघडीया मुहूर्त (अमृत, लाभ) इत्यादि पाहण्याची गरज नाही .


*प्रश्न क्र २ :-* घरातील महिला गर्भवती असल्यामुळे मूर्ती विसर्जन करावे की नाही ?

*उत्तर :-* याला काहीही शास्त्रीय आधार नाही . आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते , अशा वेळेस सर्वांची मने हळवी झालेली असतात व त्या वेळी  गणेशाचे बालरूप कसे विसर्जित करावे , असा भोळा समज त्यामागे आहे . 


*प्रश्न क्र ३* अशौच ( सोयर व सुतक ) आल्यास गणपती नंतर बसवला तर चालेल का ?

*उत्तर :-* पार्थिव गणपती पूजन हे व्रत आहे कुलाचार नाही , त्याचा एखाद्या वर्षी लोप झाला तरी चालतो , पुढील वर्षी बसवता येतो .

पार्थिव गणेश स्थापना  करण्याचा भाद्रपद शु चतुर्थी हा एकच दिवस असल्याने, त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी अशौच संपत नसेल, तर त्या वर्षी गणपति बसवू नये. येथे स्थापना दिवस महत्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येणार नाही. 


*प्रश्न क्र ४ :-* आता अशौचामुळे शक्य नसल्यामुळे अश्विन नवरात्रात गणपती बसवला तर चालेल का ?

*उत्तर:-* आश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थीस राहिलेले गणपति पूजन करू नये त्याला काहीही  शास्त्राधार नाही . अनेकजण गौरी पण अडचण आल्यास नवरात्रात बसवतात . ते पण शास्र मान्य नाही .


*प्रश्न क्र ५* यंदा कोरोनामुळे गावी दहा दिवस थांबता येणार नाही तर पाच दिवसात विसर्जन केले तर चालेल का ?

*उत्तर :-* अडचणीच्या काळात दीड दिवस , तीन , पाच , सात दिवसात विसर्जन करू शकता . 

गणेश स्थापना झाल्यावर अशौच आले तर लगेच दुसऱ्या व्यक्तीकडून गणेश विसर्जन करून घ्यावे , अशौच आल्यावर घरात पार्थिव गणपती ठेऊ नये .


*प्रश्न क्र ६:-* मागील वर्षी आम्ही बसवलेली गणेशमूर्ती भंगली होती मग आम्ही नवीन आणून बसवली . ते योग्य आहे का ? 

*उत्तर :-* गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली तर लगेच विसर्जन करावे , दुसरी मूर्ती आणून परत प्रतिष्ठा करू नये . जर प्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती भंगली तर मात्र नवीन आणून बसवू शकता .


*प्रश्न क्र ७* आमचे वडील स्वर्गवासी झाले पण सव्वा महिना झाला नाही तर गणपती बसवावा का ?

*उत्तर :-* चौदा दिवस झाल्यावर उदक शांती झाल्यावर सर्व व्रते देवकार्य करता येते . त्यामुळे आरास न करता , साध्या पद्धतीने व भक्ती भावाने गणेश स्थापना करावी .


*प्रश्न क्र ८ :-* आम्ही दरवर्षी गावाकडे मोठ्या भावाकडे  गौरी गणपतीचा सण साजरा करतो , पण यंदा कोरोनामुळे जाणे शक्य नाही . आम्ही वेगळ्या गौरी गणपती बसवू शकतो का ?

*उत्तर :-* हो , जे भाऊ वेगळे वास्तव्यास आहेत , ज्यांची चूल वेगळी आहे त्या सर्वांना वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो . प्रतिवार्षिक व महालय श्राद्ध सुद्धा वेगळे करावे लागते . 


*प्रश्न क्र ९* पार्थिव गणेश मूर्तीचा आकार किती असावा ?

*उत्तर:-* घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याचे प्रतिष्ठा व पूजन करावे व ती मूर्ती वाहत्या पाण्यात , जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे . त्यामुळे त्याबद्दलचे विशिष्ट नियम नाहीत .


*प्रश्न क्र १०:-* या वर्षी सार्वजनिक गणपती स्थापना करता येत नाही मग घरामध्ये स्वतःचा एक व सार्वजनिक एक असे गणपती बसवले तर चालतील का ?

*उत्तर :-* गणेशस्थापणा हे एक व्रत आहे , त्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिले . त्यावेळी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती . त्यामुळे घरात फक्त वैयक्तिक व्रताचा गणपती बसवावा . दोन गणेशस्थापणा एकाच घरात करू नये .


*अशोककाका कुलकर्णी*


*( कुणालाही याबद्दल काही शंका असल्यास संपर्क करावा .)*

*९०९६३४२४५१*

Featured post

Lakshvedhi