अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, खाजगी कार्यालयांनी शक्य असल्यास 'वर्क फॉर्म होम'चा अवलंब करावा आणि परिस्थितीनुसार शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनाबाबत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सविस्तर निवेदन करतील, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीने सर्व जणांनी सतर्क राहून शासनाला मदत करावी. राज्यातील अतिवृष्टीची परिस्थिती पाहता आजचे कामकाज स्थगित करत आहोत, असे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment