राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की, एआय वापरासाठी एसओपी तयार करण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची समिती पुढील 30 दिवसांत स्थापन केली जाईल. ही समिती चार ते सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
याशिवाय सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये आणि संवेदनशील परिसरात एआयचा गैरवापर होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येईल. तसेच अशा तंत्रज्ञानाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांना आवश्यक पूरक प्रशिक्षणही देण्यात येईल, असेही राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment