मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सांगितले आहे की, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक रुग्णालयांना अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची जोड मिळत असल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होत आहे. यामुळे रुग्णांना जलद आणि अचूक सेवा देण्यास मदत होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे आधुनिकीकरण वेगाने सुरू असून, हा उपक्रम त्याच दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे रुग्णालयाच्या निदान क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. मोठ्याप्रमाणात रक्त तपासण्या अधिक वेगाने आणि अचूकपणे करता येणार आहेत. नियमित तसेच तातडीच्या बायोकेमिकल चाचण्या कमी वेळेत पूर्ण होणार असल्याने डॉक्टरांना त्वरित वैद्यकीय निर्णय घेणे अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, रुग्णांना उपचार लवकर सुरू करण्यास मदत मिळणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावणार आहे
No comments:
Post a Comment