केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, भारतातील एकही गरीब कच्च्या घरात राहणार नाही. सर्वांसाठी पक्की घरे हा प्रधानमंत्री मोदींचा संकल्प आहे. त्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्राला एक वर्षात 30 लाख घरांचे उद्दिष्ट दिले. देशातील कोणत्याही राज्याला इतके उद्दिष्ट दिले गेले नाही. ही कमाल केवळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने उद्दिष्ट मिळविले, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. प्रत्येक घर सौर ऊर्जेवर आणून शून्य वीज बिल हे उद्दिष्ट असेल, अथवा विक्रमी कमी वेळेत पाच लाख घरे पूर्ण करणे असेल, भूमिहिनांना 1 लाख रुपयांची मदत असेल या सर्व क्रांतिकारी कामाबद्दल त्यांनी अभिनंदन करुन उर्वरित घरे लवकरात लवकर पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला. महिला सक्षमीकरणाबद्दल बोलताना, देशात 3 कोटी दिदी लखपती झाल्या आहेत. आत्ता 6 कोटी लखपती दिदींचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात 1 कोटी लखपती दिदी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगून 1 जुलै पासून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विकसित भारत जी रामजी योजना सुरु होत आहे. यातून ग्रामीण भागाचा कायापालट होईल. गावच्या विकासाचा आराखडा गावातच बनविला जाईल, ग्रामीण भागाच्या विकासाचा वेग वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment