Wednesday, 15 April 2026

क्वांटम संगणन ही केवळ तांत्रिक क्रांती नसून आर्थिक, औद्योगिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची

 क्वांटम संगणन ही केवळ तांत्रिक क्रांती नसून आर्थिकऔद्योगिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. योग्य वेळी पावले उचलल्यास भारताला या क्षेत्रात आघाडी घेण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचे मत सिंघी यांनी यावेळी व्यक्त केले.

 

अमित सिंघी म्हणाले कीक्वाटम संगणनाचा वापर रसायनशास्त्रऔषधनिर्मितीशेतीलॉजिस्टिक्समशीन लर्निंग तसेच हवामान अंदाज यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. विशेषतः जटिल गणिती समस्या सोडविणेमोठ्या प्रमाणातील डेटामधून नमुने शोधणे आणि प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास करणे यामध्ये या तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती अपेक्षित आहे. आर्थिक क्षेत्रातही क्वाटम संगणनामुळे अचूक अंदाज बांधण्याची क्षमता वाढत असून काही उदाहरणांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक अचूकता सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

 

जागतिक स्तरावर क्वाटम संशोधनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असताना भारतात या क्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 2035 पर्यंत भारताला ‘क्वाटम सक्षम अर्थव्यवस्था’ बनविण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले असून त्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आल्याचे  सिंघी यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi